Sunday, June 27, 2021

जेव्हा_चांगल्या_लोकांच्या_बाबतीत_वाईट_गोष्टी_घडतात

#जेव्हा_चांगल्या_लोकांच्या_बाबतीत_वाईट_गोष्टी_घडतात

                लेखक : हेराँल्ड कुशनर
                प्रकाशक : जयको पब्लिकेशन

लेखकाविषयी:
हेराँल्ड कुशनर हे वर्ल्ड बेस्ट सेलर लेखक असून ते मँच्युसेट येथे सन्माननीय रब्बाय (ज्यू धर्मगुरू, शिक्षक काउन्सेलर) 
आयुष्यातील अवघड घटनांना कसे सामोरे जायचे हयाबद्दल त्यांनी विपुल लेखन केले आहे.

पुस्तकाविषयी
लेखक कित्येक जणांचे सांत्वन आणि समुपदेशन करायचे पण त्यांच्या आयुष्यात दुर्दैवी घटना घडली त्यांच्या मुलाला आरोनला प्राजेरिया (लवकर वयस्क बनवून मृत्यू देणारा रोग )झाला. त्यामुळे तो दिवसेंदिवस जर्जर होऊन मरणाच्या वाटेवर जात होता. त्याला त्रासात पाहून वडिलांच्या काळजाला पीळ पडत होता.
शेवटी तो वयाच्या चौदाव्या वर्षी हे जग सोडून गेला. पण त्या मधल्या काळात त्यांनी जे अनुभवले त्यावरून हे पुस्तक लिहिले.

पुस्तकाचे सार : 
सर्वप्रथम वाईट गोष्टी काय काय घडू शकतात ते समजून घेऊया 
1.  आजारपण आणि मृत्यू
आपले किंवा प्रियजनांना झालेले आजार मग ते दुर्धर, अनुवांशिक ,बरे होणारे,जीवनशैलीचे कसेही असू शकतात
आणि त्या आजारपणांमुळे स्वतःला किंवा कुटुंबाला भोगावा लागणारा त्रास किंवा अपमृत्यू
2 . अपघात आणि दुर्घटना (भूकंप, पूर इत्यादी ) यांचा बळी ठरणे
3. घटस्फोट
4. गरिबी
5. नोकरी न मिळणे किंवा गमावणे
6. व्यवसायधंद्यातील अपयश

लेखकाच्या मते या वेगवेगळ्या अवस्थेमागची कारणे जेव्हा आपण शोधतो तेव्हा बर्याचदा माणूस स्वतः च कारणीभूत असतो, पण तो दोष परमेश्वराला देत असतो.
परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केल्यानंतर निसर्गनियम ठरवले तसेच मानवाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले त्यामुळे परमेश्वर नियम आणि स्वातंत्र्यात बाधा आणत नाही 
आपल्या धर्मशास्त्राने माणसाने नैतिक आचरण करावे हयासाठी पापपुण्याच्या संकल्पना आणल्या आहेत.
पण त्यामुळे आपण चांगले वागलो की पुण्यकर्मामुळे आपल्याला देवाने बक्षीस द्यावे असे वाटते पण घडते भलतेच आपल्यासोबत वाईट घडते म्हणून मात्र माणसे दुखावली जातात. 
माणसात न्यूनगंड निर्माण होतो, माणूस स्वतः चा तिरस्कार करतो आणि त्याचबरोबर परमेश्वराचाही तिरस्कार करू लागतो.
कारण जेव्हा कुणीही सोबत नसते तेव्हा देवच आपला सोबती वाटतो पण जेव्हा परमेश्वरच दुरावतो तेव्हा माणसाला अगदी असहाय्य वाटते आणि याचे पर्यावसान नैराश्य आणि शेवटचा आत्महत्येचा पर्यायही स्वीकारला जातो.
पण एवढे होऊनही हयामागची कारणे किंवा आपण कुठे चुकलो का हे मात्र शोधले जात नाही. 
कधीकधी चुका हया नकळत अजाणतेपणी,अज्ञानामुळे होतात तर कधी  आपल्या मनाच्या इच्छेमुळे...
कधी चुका धर्माने निषिध्द ठरवलेल्या गोष्टी (काम, क्रोध, मोह , मत्सर, अहंकार , आळशीपणा, अधाशीपणा ) यामुळे झालेल्या असतात 
कधी कधी कितीही शोधले तरी चूक कुणाची हेच समजत नाही
 त्यामुळे
➡️आपण स्वतःला क्षमा करायला हवी 
➡️ दुखापासून दूर न पळता दुखाचा सामना करायला हवा.
➡️ सदासर्वकाळ आपण आनंदी राहू शकत नाही हे सत्य स्वीकारा
➡️ गोष्टीमागचे कारण नाही समजले तर निरर्थक त्रागा नको.
➡️ माझ्याच बाबतीत का  असे वाटून स्वतःला दुख करून घेऊ  नये 
➡️ आपल्याला दुख झालेय म्हणून इतरांना दुखवू नये
➡️ दुख करूणेतूनच माणूस सृजनशील होतो हे ध्यानात घ्यावे 
➡️ जे स्वतःला दुखावणे थांबवतात त्यांनाच देव मदत करतो
➡️ वाईट घटनांना आपल्या आयुष्याचा एक भाग समजा
➡️ वाईट घटना म्हणजे संपूर्ण आयुष्य नाहीत. 
➡️जे झाले त्यातून धडा घेत आयुष्यात पुढे जात राहणेच श्रेयस्कर 
➡️ घडलेल्या घटनांपेक्षा आपला प्रतिसाद भविष्यकाळ ठरवतो
➡️ परमेश्वर आपल्या आयुष्यातील वाईट घटना थांबवू शकत नाही ➡️ जे घडते आपण निवडलेले असते किंवा तशी अंतप्रेरणा असते ➡️परमेश्वर आपले दुख हलके करण्याला मदत करू शकतो,
➡️ परमेश्वर आपल्याला मानसिक दृष्टीने खंबीर बनवू शकतो 
➡️ परमेश्वर इतर लोकांना आपले दुख हलके करण्याची प्रेरणा देऊ शकतो.
➡️ गतकाळातील स्मृती तर धुवून काढणे तर आपल्याला शक्य नसते पण आपण विचार प्रक्रियेतून, आत्मचिकित्सेतून ,स्पष्ट अवधान राखून आपले मन दुखापासून मुक्त ठेवू शकतो
➡️ कधीकधी दोष आपला नसतो तर परिस्थितीचा असतो तिथे आपल्याला निवडीचा पर्यायच उपलब्ध नसतो तेव्हा जे होईल ते हसत हसत ते दुखणे सहन करण्याशिवाय आपल्या हाती काहीच नसते
➡️ आपले अंतकरण वैर द्वेष हिंसा हयापासून मुक्त ठेवायचे असेल तर निर्हेतूक खरे प्रेम ईश्वरावर आणि आपल्या जिवलगांवर करू शकतो 
प्रेम आणि चांगुलपणा हे सद्गुण ह्दयात असलेला मनुष्य आपल्या कृत्यांसाठी परमेश्वराला दोषी मानत नाही.
➡️आपल्या अंतकरणातील प्रेम आणि चांगुलपणा हेच आपल्याला सद्गुण आणि सद्बुद्धी देतात त्यामुळे नकारात्मक गोष्टींना बळी न पडता परमेश्वरावर विश्वास ठेवा

समाप्त
Nilesh Shinde 

Tuesday, June 22, 2021

द_ग्रेटेस्ट_सेल्समन_इन_द_वर्ल्ड भाग 1

#द_ग्रेटेस्ट_सेल्समन_इन_द_वर्ल्ड
(जगातील सर्वोत्तम विक्रेता)

          लेखक : आँग मँन्डिनो
        अनुवाद : राजेश आजगावकर
       प्रकाशन : जयको पब्लिकेशन

लेखमाला: भाग पहिला

लेखकाविषयी :
आँग मँन्डिनो हा लहानपणापासूनच हुशार विद्यार्थी होते .त्यांच्या आईचे स्वप्न होते की आपल्या मुलाने मोठ्ठा लेखक व्हावे
त्यासाठी अगदी पहिलीत जायच्या आधीपासूनच त्यांना वाचनालयातून पुस्तके आणून द्यायची 
माध्यमिक शाळेत जाईस्तोवर ते लघुकथा लिहत आणि शाळेच्या हस्तपुस्तिकेचे संपादक होते.
माध्यमिक शिक्षणानंतर मोठ्या विद्यापीठात जाऊन शिकायचे , मोठा पत्रकार आणि उत्तम लेखक व्हायचे हे मुलासाठी आईचे स्वप्न होते.
पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते, एके दिवशी स्वयंपाक घरात आई जी कोसळली ती पुन्हा उठलीच नाही.......
त्या धक्क्यातून सावरायला कित्येक वर्षे लागली ,तोवर सगळी स्वप्ने विरून गेली होती.
महाविद्यालयीन शिक्षणाऐवजी लेखक कागदाच्या कारखान्यात कामाला आणि पुढे आर्मीत बाँम्बर असा जीवनप्रवास झाला.
युद्ध संपल्यावर घरी परतल्यावर कुणीही बाँम्बर ला काम द्यायला तयार नव्हते, कित्येक महिन्याच्या बेकारीनंतर एका विमा कंपनीच्या विक्रेत्याची नोकरी कशीबशी मिळाली.. लग्न झाले
पण दुर्देवाचे फेरे अजूनही संपले नव्हते
अपार कष्ट करूनही संसारात पैसा पुरत नव्हता. कर्जाचा बोजा दिवसेदिवस वाढत होता.
कर्जाच्या ओझ्याबरोबर लेखक निराशेच्या अंधकारात खोलवर जात होता. मग डोक्यावरचे टेन्शन जाण्यासाठी दारूचा गुत्ता जवळचा झाला. आणि तोही आपला हक्क वाटू लागला.
पेग वाढत गेले आणि मग रोज कुठल्यातरी गटाराजवळ रात्र सरून जायला लागली. लेखकाच्या वर्तणुकीला कंटाळून बायको मुलीला घेऊन कायमचे घर सोडून गेली.
निराशेचा अंधकार अजूनच दाट झाला होता
जीवन जणू नरकच बनला होता.
निराशा ,असह्यता यामुळे जीव द्यायचा विचार बळावला होता .
अगदी बाजारातून बंदुक विकत घेऊन जीव देण्याचा प्रयत्न होता पण जीव जायची हिंमत झाली नाही शेवटी चालते चालते एका वाचनालय पर्यंत आले असंख्य यश आणि प्रेरणेची ची पुस्तके त्यातली काही घेऊन लेखकाने वाचन चालू केले
हाच त्यांचा आयुष्यातला टर्निंग पाँइंट ठरला आपलं काय चुकलं होतं कसे चुकलं होतं त्या प्रश्नांची उत्तर शोधायचे  काम चालू झालं यशावर 100 च्या वर पुस्तके त्यांनी वाचून काढली पण डब्ल्यू क्लेमेंट स्टोन लेखकांचं  Sucess thru positive Mental attitude पुस्तक वाचून त्यांच्या आयुष्याला खर्या अर्थाने कलाटणी मिळाली.
शहरातील त्यांचीच एका उपकंपनी शोधून लेखक आँग तिथे कामाला लागले.
त्याच दरम्यान स्वतः पेक्षा जास्त विश्वास आँगवर असणारी जीवनसाथी मिळाली
त्यांना जी शाखा मिळाली तिथे त्यांनी उज्ज्वल यश मिळवले, पदोन्नती मिळाली
खेड्यात विमा कसा विकावा हयावर लेखक आँग हयांनी लिहिलेल्या माहिती पुस्तिकेला त्यांच्या मुख्य कार्यालयाने त्यांना अक्षरक्षः डोक्यावर घेतले
त्यांच्या प्रतिभेमुळे त्यांना विक्री विभागाच्या बुलेटिनवर त्यांना काम करायची संधी मिळाली.
त्यानंतर यशाच्या पायर्या चढतच अनुभव नसतानाही नियतकालिकाचे संपादक बनले, क्लेमेंट स्टोन यांचे मित्र बनले
नियतकालिकांसाठी लेख लिहिता लिहिता 
हया पुस्तकाची कल्पना सुचली 
प्रकाशकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक बनले.

पुस्तकाविषयी:
हया पुस्तकात एका छोट्या इंटरेस्टिंग,वाचनीय कथेच्या माध्यमातून विक्रीकौशल्याची महान दहा तत्त्वे लेखकाने सांगितली आहेत. हसतखेळत ,प्रेरक ,ओघवत्या भाषेत महान विक्रेता आणि चांगला माणूस कसे बनायचे हयाबद्दल अमूल्य मार्गदर्शन केलेय.

हया तत्वांबद्दल जाणून घ्यायला वाट पाहा उद्याच्या भागाची.....
Nilesh Shinde 

Monday, June 21, 2021

स्मार्ट उद्योजक® मासिकाचा जून २०२१ चा अंक

 उद्योजक® मासिकाचा जून २०२१ चा अंक प्रसिद्ध झाला आहे. खालील लिंकवरून तो डाउनलोड करू शकता. 



Sunday, June 20, 2021

द_5_ए_एम_क्लब भाग 5

#द_5_ए_एम_क्लब

                       लेखक : राँबिन शर्मा
                   प्रकाशक : जयको पब्लिकेशन

लेखमाला : भाग पाचवा : जीवन सुधारणारी दहा जादूई सूत्रे

1️⃣ #स्वतः मध्ये_किमया_करा
जेव्हा तुमचे स्वतः बरोबर नाते सुधारता तेव्हा आपोआपच इतरांबरोबर तुमचे नाते सुधारते त्यामुळे ध्यानधारणा, शांतीद्वारे स्वतःला जाणून घ्या, स्वतःमधील महानता,प्रतिभा सृजनशीलता समजून घ्या

2️⃣ #आश्चर्यकारक_अनुभव_मिळवा
भूतकाळाच्या जुन्या जखमा कुरवाळत बसू नका, हसा खेळा नाचा आणि साधे सोपे जीवन जगून वर्तमानातील प्रत्येक क्षण जगून घ्या पण आरोग्य आयुष्याचा दर्जा खालावू देऊ नका

3️⃣ #अपयशाने_निर्भयता_वाढते
भयाच्या विचारांनी स्वतःच्या इच्छा, महत्वाकांक्षा, कल्पनाशक्ती दबून देऊ नका
स्वतःच्या मनाप्रमाणे जगा, आपल्या आतील महानता नाकारू नका.
सकारात्मक बोलायला आणि विचार करायला शिका.धैर्याने भीतीला सामोरे जा.

4️⃣ #व्यक्तिगत_रामराज्य_निर्माण_करा
      आपल्या सार्वभौम बनवणाऱ्या अंगभूत गुण आणि शक्तींकडे  तसेच इच्छांना मूर्तरूप देणारे साधन (विचार, भावना ,शब्द ,कृती) याकडे दुर्लक्ष करू नका.

5️⃣ #वाईट_माणसांना_टाळा
संगतीतून माणसाचे चरित्र्य घडते त्यामुळे इतरांचे वाईट इच्छिणार्या ,आपला उत्साह नष्ट करणाऱ्या, अडचणी आणणारया नकारात्मक ,त्रासदायक लोकांपासून दूर रहा त्याऐवजी उद्योगी,उत्साही ,नीतीवंत , प्रेमळ आणि सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा.

6️⃣ #पैसा_म्हणजे_औदार्याचे_प्रतीक 
गरीबी ही मानसिक अवस्था आहे त्याचा बाहयस्थितीशी संबंध नाही.त्यामुळे पैसा फक्त साठवून ठेऊ नका त्याला वाहता ठेवा
उदारमनाने (उधळया वृत्तीने नाही) खर्च करा,
कमतरता आणि अभावाचे विचार मनातही येऊ देऊ नका.
अपेक्षित, अनपेक्षित सर्व मार्गांनी पैसे येत राहतील अशी मनोभूमिका ठेवा.
दानशूरपणा आणि समृद्धीवर पूर्ण विश्वास ठेवा.
पैसा आणि मदतीबद्दल नेहमी कृतज्ञ रहा,
अपेक्षेपेक्षा जास्त सेवा,मदत,पैसे आपल्या ग्राहकांना, मित्रांना, कुटुंबीयांना देत राहा.

7️⃣ #निरोगीपणा_कमवा
उत्तम शारिरीक आणि मानसिक आरोग्य ही खूप मोठी संपत्ती आहे ती जपा
आहार ,विहार, आचार,विचार, निद्रा,व्यायाम हयांच्या चांगल्या सवयी लावून निरोगी व्हा.

8️⃣ #जागतिक_दर्जाची_जीवनमानके
आयुष्यात जे काही कराल ते जागतिक दर्जाचे करा.
स्वतः चे भरपूर लाड ,कौतुक करा
स्वतः मध्ये गुंतवणूक करुन सर्वोत्कृष्ट माणूस बना, स्वतः ची कौशल्ये सुधारा,फुलांच्या सहवासात रहा.
आनंद देणारे उत्तम संगीत ऐका.

9️⃣ #मनपूर्वक_प्रेमातून _शाश्वत_आनंद 
सगळयांशीच शक्य तितक्या प्रेमाने वागा
माणसांना आनंदी बनवा ,त्यांच्याशी प्रेमाचे चार शब्द बोला, पाठीवर कौतुकाची थाप द्या. मदत करणाऱ्यांना धन्यवाद द्या
भेटणाऱ्या प्रत्येक माणसाचे चांगले गुण आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
प्रियजनांवर प्रेम करण्याच्या आड येणाऱ्या भावनिक जखमांकडे दुर्लक्ष करा.

🔟 #पृथ्वीलाच_स्वर्ग_बनवा
स्वर्ग हे ठिकाण नाही तर उत्तम मनस्थितीचे प्रतीक आहे त्यामुळे आपले मन,बुद्धी, ह्रदय स्वच्छ ठेवा
स्वतःची आत्मिक पातळी वाढवून घडणाऱ्या घटनांचे अर्थ समजून घ्या.
स्वतःच्या अस्तित्वाची किंमत समजून शंका,भीती,संशय ,असुरक्षितता,जुन्या चुकीच्या धारणा,मर्यादा घालणारे विचार यांना दूर सारा.
Nilesh Shinde 

Saturday, June 19, 2021

द_5_ए_एम_क्लब भाग 4

#द_5_ए_एम_क्लब

                       लेखक : राँबिन शर्मा
                   प्रकाशक : जयको पब्लिकेशन

लेखमाला : भाग चौथा

#दिनचर्या

पहाटे उठून व्हिक्टरी अवरनंतर काय करायचे आणि एकूणच दिनचर्या कशी असावी हयाबाबत सुद्धा लेखकाने अमूल्य असे मार्गदर्शन केले आहे.
हया दिनचर्येचे नित्यनेमाने आयुष्याच्या अंतापर्यंत पालन केल्यास आयुष्य आनंददायी तर होतेच त्याबरोबरच माणूस सृजनशील बनतो आणि ध्येयवादी बनतो त्यामुळे हमखास निष्पत्ती मिळते

1️⃣ सकाळचा वेळ
कालावधी : पहाटे ६ ते ८ वाजेपर्यंत
कृती :  
▪️छंद कला आवडीनिवडी यांची जोपासना, 
▪️कुटुंबीयांना वेळ (बातम्या आणि मिडीयापासून दुरावा)
▪️मसाज (आठवड्यातून दोनदा)
▪️ प्रवासात असल्यास आँडिओबुक श्रवण
फायदे:
➡️ आनंद आणि शांततेत वाढ
➡️ वेळेचा उत्तम विनियोग
➡️ मानसिक क्षमतामध्ये वाढ
➡️ आरोग्यात सुधारणा
➡️ मसाजने शरीराची स्नायूंची लवचिकता टिकवून ठेवणे
➡️ ताणतणाव व्यवस्थापन
➡️ भीती कमी करून आनंद वाढल्यामुळे माणूस दीर्घायुषी होतो

2️⃣ दिवसभराचा वेळ
कालावधी : सकाळी ८ ते संध्या.५ वाजेपर्यंत
कृती :  
ध्येयनिश्चिती आणि कार्यपद्धती
▪️ #TBTF (संपूर्ण एकाग्रतेचा हवाबंद फुगा )
या पद्धतीने व्यत्ययरहित एकाग्रतेने जागतिक दर्जाचे काम आपल्या हातून घडेल याची दक्षता घेत आपला वेळेचा सदुपयोग करत मोहाच्या आकर्षणाच्या क्षणांना बळी न पडता,नकारात्मक व्यक्ती, मिडीया,वायफळ खर्च यापासून दूर राहण्यासाठी आपल्या प्रतिभेभोवती रूपकात्मक खंदक उभारून तिचे रक्षण करायचे

▪️ #time_९०_९०_१ 
या नियमानुसार ९० दिवस  रोज कामाची पहिली ९० मिनिटे प्राधान्याने महत्त्वाची कामे करणे
 काम आणि मोहाच्या गोष्टींमध्ये सीमारेषा आखायची.
नंतरच्या काळात बाकीची कामे

▪️ #time_६०_१० 
या पद्धतीने ६० मिनिटे काम आणि त्यानंतर १० मिनिटे विश्रांती असा कामात समतोल साधायचा

▪️  #स्वप्नसंघ : जी कामे करण्यात आपल्याला आनंद मिळत नाही, जी आपल्याला येत नाही ती कामे त्या विषयातील तज्ञांना सोपवून आपली कामगिरी सुधाराची

फायदे:
➡️ आनंद आणि शांततेत वाढ
➡️ दिवसभर स्फूर्ती टिकवून ठेवणे
➡️ मानसिक क्षमतामध्ये वाढ
➡️ आरोग्यात सुधारणा
➡️ क्षुल्लक आकर्षणापासून माणूस दूर जाऊन महानतम कार्यासाठी प्रयत्न करतो
➡️ विनागरजेच्या वस्तू, नोटिफिकेशन तसेच वेळखाऊ लोकांपासून माणूस दूर राहतो
➡️ एकाग्रता, उर्जा, वेळ, बुद्धिमत्ता, इच्छाशक्ती हयांचे रक्षण आणि योग्य वापर
➡️ आपल्या हातून जगदकल्याण होणार असल्याची सुखद भावना निर्माण होते

3️⃣ संध्याकाळचा वेळ
कालावधी : संध्याकाळी ५ ते रात्री ७ वाजेपर्यंत
कृती :  
▪️दिवसभराचा आढावा
▪️जर्नल /रोजनिशी/ध्येय लेखन
▪️समाजोपयोगी काम
▪️ एक तासाचा नेचर वाँक किंवा योगा किंवा स्विमिंग
फायदे:
➡️ स्व - सुधारणेवर भर
➡️ उत्तम व्यक्तिमत्त्व
➡️ वेळेचा सुनियोजित वापर
➡️ स्वतःच्या ध्येयावर लक्ष
➡️ मानसिक शांती
➡️ उत्तम पचनशक्ती आणि आरोग्य
➡️ सामाजिक जाणीव

 
4️⃣ रात्रीचा वेळ
कालावधी रात्री 8 ते पहाटे ५
▪️कुटुंबासाठी वेळ
▪️जेवण
▪️जर्नल /रोजनिशी/ध्येय लेखन
▪️साप्ताहिकी (दर रविवारी पुढच्या आठवड्याच्या कामाचे नियोजन )
 ▪️झोप (रोज आठ तासाची झोप)
फायदे:
➡️ उत्तम नातेसंबंध
➡️ उत्तम आहार
➡️ कामाचे उत्तम नियोजन
➡️ अपमृत्यू टाळणे
➡️ उच्च सृजनशीलता आणि उत्पादकता
➡️ हार्मोनल बँलन्स

अपूर्ण
Nilesh Shinde 

Friday, June 18, 2021

चिकन सूप फॉर द सोल

*चिकन सूप फॉर द सोल*
       ( मानवी मनोगुणांचा वेध घेणाऱ्या कथा)
    *लेखन व संकलन*
        जॅक कॅनफिल्ड
        मार्क व्हीकटर हॅन्सन
       
        *अनुवाद*
        उषा महाजन

जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन या अमेरिकेतल्या. सर्वप्रिय, सुप्रसिद्ध अशा दोन वक्त्यांनी मिळून संकलित केलेल्या या कथा जगाच्या कानाकोपऱ्यातल्या जनमानसाच्या मनाला जाऊन भिडल्या आहेत, भावल्या आहेत.

या कथांमधील आशावाद, बुद्धीवाद तुम्हाला येणारं नैराश्य झटकून टाकायला मदत करेल. अतिशय विचारपूर्वक निवडलेल्या या कथा म्हणजे 'अशक्य' शब्दप्रयोगाला झुगारून देऊन आपल्या

आयुष्याचा मार्ग उजळून टाकणाऱ्या आहेत. जेव्हा कधी तुम्हाला तुमचा मुद्दा ठामपणे मांडावासा वाटेल, एखाद्या मित्र-मैत्रिणीला स्फूर्ती द्यावीशी वाटेल किंवा लहान मुलाला शिकवण द्यावीशी वाटेल, तेव्हा या पुस्तकातील अनेक हृदयस्पर्शी कथांचा हा ठेवा नक्कीच उपयोगी पडेल..

   "लोकं फार वाईट वागतात...!” “जिकडे बघावं तिकडे निराशाजनक चित्र दिसत असतं.” “चांगलं असं काही घडतच नाही का?” “सगळीकडेच परिस्थिती कशी खराब झाली आहे नाही?" इ.इ. असे उद्गार वेळोवेळी आपल्याला ऐकायला मिळतात. कधी कधी आपणही त्याच सुरांत सूर मिळवतो. हे उद्गार अगदीच निरर्थक असतात असं नाही, पण वाईटाबरोबरच जगात थोडं का होईना चांगलंही घडतं आहेच की! चांगलंही वागणारी, विधायक कामं करणारी माणसंही आहेतच की!

आपल्याला अनेक वेळा माणुसकीचे सुखद अनुभव येत असतात. आशादायक असं काहीतरी घडतंय असं जाणवतं. कधी कधी एखादी अगदी सामान्य व्यक्ती देखील अशी काहीतरी असामान्य, अद्भुत कृति करून दाखवते की जी आदर्श ठरावी. जिच्यापासून सर्वांनी बोध घ्यावा- शिकावं असं तीव्रतेनं वाटतं!

आजच्या ताणतणावाच्या, हिंसेच्या, दहशतवाद-द्वेषानी भरलेल्या जगात गरज कशाची आहे तर- प्रेमाची, परोपकाराच्या भावनेचं पुनरूत्थान करण्याची! पाश्चिमात्य व पौर्वात्य देशातील अनेक सामान्य (क्वचित सुप्रसिद्ध) व्यक्तींनी असंच काहीतरी जगावेगळं करून दाखवलंय जे सगळ्यांच्याच मनाला भावण्यासारखं आहे. अशा या सत्यकथा 'Chicken Soup for the Soul' ह्या Best Sellers च्या यादीतील इंग्रजी पुस्तकांतून १९९२ साली प्रसिद्ध झाल्या आहेत. ह्याचे पुढील भाग Second, Third, Fourth Serving of Chicken Soup for the soul या शीर्षकाखाली..

मराठी भाषांतर पण खूप सुंदर रित्या
केलेलं आहे..

    इंडीयन सोल, मदर्स सोल  ही पुस्तके अजून वाचनीय
आहेत.

                        .......ममता मुनगीलवार

द_5_ए_एम_क्लब भाग 3

#द_5_ए_एम_क्लब

                       लेखक : राँबिन शर्मा
                   प्रकाशक : जयको पब्लिकेशन

लेखमाला : भाग तिसरा

#पहाटे_उठून_काय_करायचे

बर्याच जणांना हा प्रश्न सतावतो त्यामुळे ते झोपणेच पसंत करतात त्यामुळे लेखकाने पूर्ण टाइमटेबलच फायद्यासहित सादर केले आहे 
लेखक म्हणतात की सकाळी ५ ते ६ हा कालावधी व्हिक्टरी अवर म्हणून ओळखला जातो यात माणूस स्वतःचा शारिरीक, आध्यात्मिक, मानसिक आणि कौशल्य विकास करून स्वतःला विजयी बनवता येते

1️⃣ पहिला टप्पा : शारिरीक व्यायाम🏋️
कालावधी : पहाटे  5.00 ते पहाटे 5.20 
कृती : 
▪️शरीरातून घाम निथळेपर्यंत व्यायाम
 (वेगानं धावणे,दोरीवरच्या उड्या ,सपाट्या)
▪️दीर्घश्वसन आणि पाणी पिणे
फायदे : 
➡️पचनशक्ती सुधारणा ,
➡️आनंदाचे हार्मोन्स वाढणे, 
➡️तणावाच्या हार्मोन्सवर नियंत्रण
➡️ वाढलेली उर्जा आणि उत्पादकता
➡️ आयुर्मानात वाढ

2️⃣ दुसरा टप्पा : मानसिक व्यायाम 🤹
कालावधी : पहाटे 5.20 ते पहाटे 5.40
कृती : 
▪️ध्यानसाधना, 
▪️दिवसाचे नियोजन ,
▪️जर्नल (रोजनिशी) लेखन ,
▪️ध्येय लिहून काढणे 
फायदे : 
➡️ ध्यानाने मनशांती मिळते आणि स्वतः मधील शक्तिमान अस्तित्वाशी संपर्क होतो
➡️ कामाच्या नियोजनामुळे कामे उत्तम होतात
➡️ जर्नल (दैनंदिन रोजनिशी ) लिखाणामुळे आपल्या आयुष्यात काय चांगले वाईट घडतय ते कळते तसेच काय सुधारणा करून आयुष्य समृद्ध करता येईल हयावर सृजनशील विचार होतो आणि एकूणच आयुष्य सकारात्मक होते
➡️ आपल्या आयुष्यातील ध्येय लिहून काढल्याने कमिटमेंट वाढून रोजच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो
➡️ स्वतः मधील गुण अवगुणांची ओळख होते 
➡️ स्वतः मध्ये जे चांगले आहे त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करता येते
➡️ अपेक्षाभंग, तिरस्कार, निराशा रोजनिशीत लिहिल्याने मन साफ राहते

3️⃣ तिसरा टप्पा : कौशल्य विकास 📻📚📡
कालावधी : पहाटे 5.40 ते पहाटे 6.00
कृती : 
▪️पुस्तक वाचन
▪️आँडिओबुक/पाँडकास्ट श्रवण
▪️आँनलाईन लर्निंग
फायदे : 
➡️ कार्यक्षेत्रातील ज्ञानात वृद्धी
➡️माणसाचा उत्पन्न ,प्रभाव दुपटीने वाढतो आणि प्रभुत्व ,क्षमता तिपटीने वाढतात
➡️ माणसाचा आत्मविश्वास शतपट वाढतो
➡️ अचूक निर्णय घेण्याची क्षमता येते
➡️ माणसाची प्रगतीच्या दिशेने जोरदार वाटचाल

अपूर्ण
Nilesh Shinde 

पुस्तकाचे नाव - एक पोकळी असतेच(फिरस्ती) लेखक- उत्तम कांबळे

*पुस्तक क्रमांक-📗89...🖋️*

 पुस्तकाचे नाव - एक पोकळी असतेच(फिरस्ती)     
 लेखक- उत्तम कांबळे
 प्रकाशन - सकाळ प्रकाशन

मराठी साहित्यसृष्टीतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे लेखक उत्तम कांबळे यांनी वैविध्यपूर्ण विषयावरती दर्जेदार लेखन केलेले असून यामध्ये कादंबऱ्या, कथासंग्रह,ललित, संशोधनपर ग्रंथ, चरित्रपर ग्रंथ, कवितासंग्रह, अग्रलेखांचे संपादन, मुलाखती संपादन आत्मकथने, अशा कितीतरी प्रकारात विपुल प्रमाणामध्ये त्यांनी हे लेखन केलेले आहे.

लेखक उत्तम कांबळे हे साहित्य क्षेत्रांमध्ये, सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असल्याने त्यांना विविध ठिकाणी फिरण्याचा योग आला. ते फिरत असताना त्यांना जे जे काही अनुभव आले ते ते अनुभव या पुस्तकातून आपणा समोर आले आहेत. यामध्ये माणूस विरुद्ध माणूस, माणूस विरुद्ध व्यवस्था, माणूस विरुद्ध पर्यावरण इत्यादी विविध घटकावर परखड लेखन केले आहे.

*एक पोकळी असतेच(फिरस्ती) 
 या पुस्तकामध्ये एकूण 26 घटकांचा या ठिकाणी लेखकाने  अत्यंत समर्पक शब्दात लेखन केलेले आहे. ही सर्व ज्वलंत उदाहरणे असून त्यांनी स्वतः अनुभवलेली उदाहरणे असल्याचे आपल्याला दिसून येते.

"नोटांवर उतरतोय गर्भाचा गोळा"
 या घटकात एक हृदय पिळवटून टाकणारे घटनेचे वर्णन केलेले आहे. काही ठिकाणी  महिलांचा नवरा मेल्यानंतर कालांतराने त्या विशिष्ठ व्यक्तीशी संबंध ठेवून स्वतःला ज्यावेळेस मूल होतं त्यावेळेस ते मुल गरजू व्यक्तींना, निपुत्रिक व्यक्तींना विकली जातात. अशी कितीतरी बाळंतपणं त्यांची होत असतात. माणूस माणसाला विकत घ्यायला लागतो, ही खरोखरच खूप शोकांतिका आहे.आभाळभर माणसं,आभाळभर दारिद्र्य, आभाळभर वेदना जरी असल्या तरी अर्भकाची विक्री हे उत्तर कसं काय होऊ शकते. पिठाचा गोळा मिळवण्यासाठी गर्भाचा गोळा विकणे हे विलक्षण विचित्र आहे..... 

"डी.एड. इज डाईंग" या घटकांमध्ये लेखकाने सध्या डी.एड, बी.एड कॉलेजची असणारी अवस्था, बंद पडण्याची कारणे अतिशय योग्यरीत्या या ठिकाणी मांडलेली आहेत. खाजगी शिक्षणाचा झालेला बाजार दिसून येत आहे. महाराष्ट्रातील सुमारे 400 च्या आसपास डी.एड महाविद्यालये अलिकडच्या काही वर्षात बंद पडलेली आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणारे शिक्षक त्यांना न्याय मिळत नाही असं त्यांचे मत आहे.या घटकातून, विविध उदाहरणातून सद्य परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेल्या शिक्षित लोकांच्या वाट्याला येणारी करूण कहाणी यात वर्णन केलेली आहे.

"अस्वस्थ करतोय हा उजेड"
 या घटकांमध्ये चांदोली धरणाच्या ठिकाणी 34 टीएमसीचे पाणी साठा असणारे धरण आहे. हे धरण होत असताना त्या ठिकाणी ज्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत,ज्या लोकांची घरे उध्वस्त झालेली आहेत. अशा लोकांना पुढं शासन दरबारी जमीन मिळवण्यासाठी, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी होणारी हेळसांड प्रामुख्याने या ठिकाणी मांडलेली आहे. धरणापासून मुबलक प्रमाणात वीज ही बनवली जाते परंतु ही वीज बनवत असताना कितीतरी घरे या ठिकाणी अंधारात गेलेली दिसून येतात. धरणग्रस्तसाठी केलेले सुंदर कायदे केवळ कागदावरच राहतात असं लेखकाला व तेथील लोकांना जाणवते.त्यावेळेस एका कवितेच्या चारोळीचे वर्णन केले आहे.
            तुकोबाची गाथा तरंगावी,
            तशाच चिरंतन 
            धरणात बुडालेल्या गावाच्या
             या काही आठवणी....
 त्यामुळे लेखक ज्या ज्या वेळेस विजेचे बटन चालू करण्यास हात ठेवायला जातो. त्यावेळेस तो उजेड लेखकाला अस्वस्थ करताना दिसून येतो.

      "अपघात " या घटकात सुंदर अशी घटना या ठिकाणी लेखकाने मांडलेली आहे.मखमलाबादला जोडणाऱ्या गोदेच्या पुलावरून सायंकाळी घरी जात असताना एका ठिकाणी त्यांना रस्त्यावर अपघात झालेला दिसला. अपघातग्रस्त एक मुलगी खाली पडली होती. तिला बऱ्या प्रमाणामध्ये खरचटले होते.बघ्यांची नुसती गर्दी जमली होती. सर्वजण केवळ चर्चेतच वेळ घालवत होते. परंतु मदत कुणीही करत नव्हते. त्यामुळे लेखकाला त्या ठिकाणी आलेले अनुभव त्यांनी अतिशय परखड शब्दात याठिकाणी मांडलेले आहेत. माणूस हा माणसाला मदत करत नाही. नुसता मोकळा वेळ कसा घालवतो आणि दोष कुणाचा आणि चुकी कोणाची याचीच वकिली करत बसतो.

"बोकड इकॉनोमी" या घटकांमध्ये आटपाडी भागातील बोकड व्यवसायांची म्हणजेच शेळीपालन करणारा वर्ग आणि त्यांची होणारी आर्थिक उलाढाल आजकालच्या व्यावसायिकांना  दिशा देणारी माहिती आपल्याला दिसून येते. याचे सुरेख वर्णन या ठिकाणी लेखकाने केलेले आहे.

"हंबरणाऱ्या गायीचा धनी....."
या घटकांमध्ये लेखक उत्तम कांबळे हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यावेळची ही गोष्ट. लेखक अध्यक्ष असताना जे साहित्यिक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असतील त्यांच्यासाठी निधी उभारण्याचा संकल्प त्यांनी डोळ्यासमोर उभा केला होता. त्यावेळेस" हंबरुनी वासराला चाटते जवा गाय" या कवितांचा मुख्य कवी कोण याची त्यांनी माहिती काढून घेतली. बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपल्याला असे दिसून येते की, एकच कविता कित्येक जणांच्या नावावरती फिरत असताना आपल्याला दिसून येते. 
परंतु" माय "ही कविता मनाला स्पर्श करून जाते आणि त्या कवितेचा मुख्य व्यक्ती कोण आहे याचा शोध घेतल्यानंतर तयार झालेला कविता संग्रह याचा उल्लेख लेखक आवर्जून करतात.

"लग्न : एक बिग बजेट शो" 
या घटकांमध्ये आधुनिक काळामध्ये लग्न ही खरंतर संपत्ती, प्रतिष्ठा दाखवण्याचे एक महत्त्वाचं साधन झालेले दिसून येते. कारण लग्न पत्रिकेतील मोठमोठ्या व्यक्तींच्या नावाबरोबरच लग्नामध्ये असणारे किमती डी.जे. या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी लग्नघरातील व्यक्ती बारकाईने विचार करत असतात त्यातून त्यांची प्रतिष्ठा ते दाखवत असतात. हे लग्न म्हणजे बिग बजेट हिंदी चित्रपटच असे जाणवते....

 "गर्भाशयाचे संपादन"
या घटकांमध्ये लेखकाने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ या विद्यापीठामध्ये जवळपास 7ते 8 हजार एकर शेतकऱ्यांची गेलेली जमीन आणि ही जमीन जात असताना त्या प्रकल्पग्रस्त मुलांना नोकरी देण्याचे दिलेले आश्वासन हे केवळ कागदावरच...  आणि त्यावेळी महाविद्यालयांमध्ये 90 टक्के पेक्षा जास्त शेती पडून होती.परंतु हे करत असताना तेथील शेतकरी बांधव जे चांगले शेती पिकवायचे ते सध्या कित्येक गावांमध्ये विखुरले गेलेचे दिसून येते. खडकाळ, मुरमाड जमीन त्यांच्या वाट्याला आल्या. काही थोड्याफार मुलांना नोकऱ्या लागल्या ,पण ती शेतकऱ्यांची मुले जास्त न शिकल्यामुळे शिपाई सारख्या नोकरीवर त्यांना समाधान मानावे लागले. प्रकल्पग्रस्तांना अर्पण केलेल्या 
"संपादन" या कवितेतील काही ओळी याठिकाणी मांडले आहेत

       कसं जगायचं आम्ही,
       तुम्ही वावर घेताय 
       म्हणजे नुसतं वावर घेताय का?    
       वावर म्हणजे नुस्ती जमीन.
       नुस्ती लँड नाही हो सरकार,
       माझ्या कित्येक पिढ्यांचा भूगोलय, इतिहासय 
       सगळी शास्त्र, पुराणं सगळंच हो, 
        दुर्बिणीने नका बघू 
        माझ्या नजरेणं बघा ना - नजरेच्या एका टप्प्यात 
अख्खं वावर..मला गर्भाशयासारखं दिसतंय माईच्या....
        आणि तुम्ही अचानक
        संपादन करणार - 
        हजारो पिढ्यांच्या गर्भाशयाचं.....

अक्षरशः हि काव्यपंक्ती वाचून हृदय हेलावून टाकते अंगावर अक्षरक्षा काटा उभा राहतो.....

अशाप्रकारे " एक पोकळी असतेच " (फिरस्त्या)या पुस्तकांमध्ये लेखक सर्वत्र  फिरत असताना त्यांना ज्या घटना त्यांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या, अनुभवल्या या  प्रातिनिधिक स्वरूपात या पुस्तकात मांडल्या आहेत. अशा बऱ्याच ठिकाणी असणारे सामाजिक प्रश्न, लोकांच्या व्यथा, तऱ्हा, अनुभव, प्रसंग त्यांनी या पुस्तकात वास्तव स्वरूपात मांडले आहेत. अत्यंत सुंदर असे पुस्तक आपण सर्वांनी वाचावे.
 *पृष्ठसंख्या-127* 
  *मूल्य - 150*
*अभिप्राय शब्दांकन*
        *सिंधुसूत....🖋️*
Ganesh tambe

Thursday, June 17, 2021

द_5_ए_एम_क्लब भाग 2

#द_5_ए_एम_क्लब

                       लेखक : राँबिन शर्मा
                   प्रकाशक : जयको पब्लिकेशन

लेखमाला : भाग दुसरा

#पहाटे_पाच_वाजताच_का_उठायचे ?

➡️ लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य संपदा लाभे हया उक्तीनुसार माणसाला निरोगी शरीर लाभते तसेच माणूस दीर्घायुषी होतो.
➡️ पहाटेच्या शांत निरामय वातावरणात मन लवकर एकाग्र होते आणि एकाग्र मनाने केलेली कामे यशस्वी होतात.
➡️ पहाटेचा एकांत शांत वातावरण मेंदूच्या लहरी परिवर्तन करण्यास उपयुक्त ठरतो.
➡️ पहाटेच्या वेळी मन निशेष आणि रिक्त असते त्यामुळे मनाच्या ग्रहणशक्तीला मर्यादा नसतात त्यामुळे नव्या गोष्टी लवकर आत्मसात केल्या जातात.
➡️ पहाट ही सृजनशील प्रतिभेसाठी नवी संधी व समृद्धता देते.
➡️ पहाटे उठल्याने मिळणारी मनशांती आपला संपूर्ण दिवस आनंदात घालवते.
➡️ पहाटे उठून कामाला लवकर केलेली सुरुवात वेळेचा सुयोग्य वापर करायला शिकवते.
➡️ पहाटे उठल्याने आपली उर्जा दुप्पट आणि उत्पादकता तिप्पट वाढते.
➡️ पहाटे उठल्याने मनशांती भेटते त्यामुळे मन-शरीर-बुद्धी यात लयबद्धता साधता येते आणि त्यातून जीवन सुंदर बनते
➡️ पहाटेची वेळ माणसाला आत्मज्ञानी बनायला मदत करते.
➡️ पहाटे उठणारी माणसे जास्त सकारात्मक ,जास्त जबाबदार, जास्त कर्तृत्ववान होतात.
➡️ पहाटेच्या वेळेचा वापर करून माणूस आपल्या आतील उर्जेला चैतन्याला मुक्त करतो आणि त्यामार्फत आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणतो.
➡️ पहाटे आपण आपल्या अंतरगातील मनोवस्था ,ह्रदयावस्था, आरोग्यावस्था, आत्मिकावस्था हया चारही अवस्थांवर विजय मिळवून लवचिक मन, सकारात्मक भावना निरोगी देहयष्टी, आत्मिकज्ञान प्राप्त करू शकतो.

#पहाटे_उठताना_येणाऱ्या_अडचणी
➡️ उशिरापर्यंत जागायची सवय
➡️ रात्रीचे उशिरा घेतलेले जड जेवण आणि कँफेनयुक्त पदार्थ
➡️ सोशल मिडीयाचा अतिवापर
➡️ उशिरापर्यंत चालणारे चँट
➡️ रात्रीची निष्फळ संभाषणे
➡️ उशिरापर्यंत बातम्या ,बाष्कळ मालिका टीव्ही पाहणे
➡️ पहाटे उठून काय करायचे याचे ध्येय नसणे.
➡️ अलार्मची सवय नसणे
➡️ बेजबाबदारपणा
➡️ क्षुद्र आणि सामान्य विचार
➡️ स्वतःच्या विकासाला प्राधान्य नसणे
Nilesh Shinde 

द_5_ए_एम_क्लब भाग 1

#द_5_ए_एम_क्लब

                       लेखक : राँबिन शर्मा
                   प्रकाशक : जयको पब्लिकेशन

लेखमाला : भाग पहिला

लेखकाविषयी:
राँबिन शर्मा हे मूळचे भारतीय वंशाचे आणि कँनडात सेटल झालेले मोटिव्हेशनल स्पीकर ,लीडरशीप कोच आणि अनेक कंपन्या, अब्जाधीश, खेळाडू यांचे ते मार्गदर्शक आहेत.
वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत ते वकीली करत होते पण त्यात ते खुश नव्हते 
त्यानंतर त्यांनी Megaliving हे ताणतणाव व्यवस्थापन हयावर पुस्तक लिहिले आणि स्वतःच प्रकाशित केले
पण खरी प्रसिद्धी त्यांना The monk who sold his Ferrari हया पुस्तकाच्या सिरीज मुळे मिळाली. ते पुस्तक अत्यंत गाजले आणि ते बेस्टसेलर लेखक झाले तसेच जगभरात त्यांच्या पुस्तकांचे भाषांतरही झाले

पुस्तकाविषयी
पहाटेला आपलेसे करून आपल्या जीवनाला कसे समृद्ध करायचे हयाबाबत हया पुस्तकात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
एक नैराश्याचे अंतिम टोक गाठलेली उद्योजिका आणि आयुष्याचा सूर हरवलेला चित्रकार हया दोघांनी एक शिबीराला हजेरी लावली तिथे त्यांची भेट एक अवलिया बेफिकीर फकीराशी झाली.
पुढे तोच अजागळ फकीर अब्जाधीश रिले असल्याचे त्यांना कळले. त्याने दोघांना 5 Am क्लबचे मेंबर करून घेतले आणि त्यांना दररोज पहाटे पाच वाजता 
माँरिशस, भारत, रोम, इटली, ब्राझील, साऊथ आफ्रिका अशा विविध ठिकाणी
मार्गदर्शन केले. पुढे त्या दोघांनी लग्नही केले आणि दोघेही आपआपल्या क्षेत्रात यशस्वी झाले 
ते जीवन बदलवणारे मार्गदर्शन काय आहे हे आपल्याला  लेखमालेतून पुढील काही भागातून शिकायला मिळेल.

भाग पहिला समाप्त
Nilesh Shinde 

वन मिनिट मॅनेजर

.       वन मिनिट मॅनेजर 
   ‌‌.                   लेखक -केनेथ ब्लॅन्चर्ड 
                                  स्पेन्सर जाॅन्सन 
                       अनुवाद - प्रा. विनय बोरीकर 
       मनुष्यबळाच व्यवस्थापन हे इतर व्यवस्थापनाचे मानाने गुंतागुंतीच असतं ;कारण त्यात माणसांच्या मानसिकतेचा ,त्यांच्या भावभावनांचा ,विविध स्थितीला मिळत असलेल्या प्रतिसादांचा प्रभाव पडत असतो. या पुस्तकात लेखकव्दयांनी  याबद्दल सुलभ तंत्र सांगितले आहे.
           एक युवक प्रभावी व्यवस्थापकाच्या शोधात होता. छोट्या मोठ्या  अत्याधुनिक-जुनाट ,वैभवशाली -किरकोळ प्रकारच्या विविध क्षेत्रातील , कार्यालयातील व्यवस्थापकांना तो भेटला ,काहींनी गुपित सांगायला नकार दिला, काहींनी मी कसा चांगला ,, मी लोकशाहीवादी ,सर्वांचा सहभाग घेणारा,मी पाठबळ देणारा ,मी विवेकी,मी विचारी असे सांगणारेच भेटले.आपल्याला खरा प्रभावी व्यवस्थापक कसा घडतो हे कधीच कळणार नाही असे त्याला वाटत असतांनाच,एका विशेष व्यवस्थापकाबद्दल त्याला कळले. त्यांच्याबरोबर काम करणारे आनंदी ,उत्साही असतात त्यामुळे चांगले परिणाम ही मिळतात अशा व्यवस्थापकांला भेटून ,त्यांचं गुपित जाणून घ्यायचं त्यांनी ठरवलं . त्यावेळी त्याने जे सांगितले ते म्हणजे हे पुस्तक .
            मी वन मिनिट मॅनेजर आहे.अशी ओळख त्याने स्वतः:ची करुन दिली .  अर्थ असा की, आपल्या कर्मचाऱ्यांकडून अतिशय थोड्यावेळात आणि दर्जेदार काम करुन घेतो.
            एक मिनिट हे व्यवस्थापनाचे प्रतिक आहे.  या व्यवस्थापनाच्या यशाची तीन रहस्ये आहेत.
    १)एका मिनिटांचे उद्दिष्ट 
     २)एका मिनिटांची प्रशंसा 
      ३)एक मिनिटांचा ठपका 
 ‌.   आपल्या बरोबर काम करणाऱ्याला एक मिनिटात उद्दिष्ट आखून द्या;चांगलं काम केलं तेव्हाच एकाच मिनिटांची प्रशंसा करा ;चुकलं तर एकाच मिनिटांचा ठपका ठेवा.मात्र व्यक्ती म्हणून त्यांचा आदर‌ कायम ठेवा हे या पुस्तकाचे सूत्र आहे.
                    एक मिनिटात उद्दिष्ट म्हणजे  ठरविलेल्या उद्दिष्टांची सहमत असण ,आपली उद्दिष्ट थोडक्यात लिहून काढण ,पुन्हापुन्हा वाचणं , दिवसभरात  एक मिनिटात कामाचा आढावा घेणं ,उद्दिष्टानुरुप आपलं वागणं होत किंवा नाही ते बघण .
         कामावरील या लोकांची प्रशंसा करण्यास उशीर करु नका .स्पष्ट शब्दात कोणत्या कामासाठी प्रशंसा होतेय ते सांगा ,चांगल्या कामासाठी उत्तेजन द्या.यशाबद्दल हस्तांदोलन करा,पाठीवर थाप मारा.
       लोकांचे दोष त्वरित दाखवा आणि ठपका ठेवला.काय चुकले हे नेमकेपणाने  नि स्पष्ट  सांगा. ते आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत तेही त्यांना कळू द्या.एकदा ठपका ठेवण संपलं ,की,ते सगळं संपलं याची जाणीव ठेवा..
       ही तीन रहस्ये अनेक उदाहरणांनी, स्वतः:जवळच्या अनुभवांनी,आपल्या सहकाऱ्यांच्या चर्चेतून पटवून दिले.सांगितले. युवकाने हे सगळं  आत्मसात करुन त्याप्रमाणे काम केल्यावर त्याला वन मिनिट मॅनेजरच महत्त्व त्याला कळलं.
          अनेक वर्षांनी जेव्हा युवकांनी हे सगळं आठवलं आणि‌ स्वतः:घ्या कार्याचा आढावा घेतला तेव्हा तो वन‌मिनिट मॅनेजर झालाय हे लक्षात आलं. एक व्यक्ती आणि मॅनेजर म्हणून तो समाधानी होता. त्यांनी घेतलेल्या नोंदी आणि टिपण पुस्तकरुपान छापली नि अनेकांना भेट दिली. 
   पुस्तकाचा खास वैशिष्ट्य असं की, अमेरिका ,जपान मधील बहूतेक सर्व उद्योजकांनी  आपल्या व्यवस्थापकांना हे पुस्तक वाचणं सक्तीचं केलं आहे.
      हे छोटंसं १११ पानाच परिणामकारक ,यश संपत्ती आणि फायदे मिळवून देणार ,साकेत प्रकाशनाच ,१००रु. किंमतीची पुस्तक नक्की वाचू या.  
                              कल्पना कोलारकर.

*एका अवलियाचा प्रपंच

*पुस्तक क्रमांक-📗88...🖋️* 
*पुस्तकाचं नाव* -
       *एका अवलियाचा प्रपंच*
 *लेखिका - अंजली ठाकूर*

सर्व सुख-सुविधा पायाशी लोळण घालत असतानाही केवळ समाजसेवेचा एक वसा घेतलेल्या आमटे कुटुंबाची थक्क करणारी एक संघर्षमय कहाणी......

बाबा आमटे यांच्यासारख्या असामान्य व्यक्तिमत्त्वा विषयी लिहिणं वाटते इतकं सोपं नाही. बाबा आमटे यांच्या तिन्ही पिढी समाज सेवेमध्ये तन-मन-धन अर्पण करून काम करत असताना अवघ्या जगाने पाहिले आहे, पाहत आहेत. बाबा आमटे यांचे अतुलनीय कार्य, त्यांच्या मुलांचे कार्य हे खरं तर वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासण्याचा विषय आहे. कारण ते कार्यही तितक्याच तोडीचे आहे. लेखिका अंजली ठाकूर यांनी "एका अवलियाचा प्रपंच" या पुस्तकामध्ये बाबा आमटे यांच्यापासून त्यांच्या सर्व पिढ्यांच्या कार्याचा झंझावत या ठिकाणी अत्यंत बारकाईने सुंदररित्या मांडलेला आहे. त्यामुळे या एका पुस्तकातच या सर्वांच्या कार्याची माहिती आपणाला जाणून घेताना एक वेगळीच अनुभूती येते.

मुरलीधर देवीदास आमटे हे संपूर्ण नाव परंतु आई लाडाने त्यांना "बाबा " म्हणत आणि खरोखरच हा अवलिया पुढे शेकडो लोकांचा काळजातील बाबा झाला. श्रीमंतीत वाढणारे बाबा मोटरसायकल चालवायचे, शिकारीला जायचे, कुस्ती खेळायचे, कित्येक वेगवेगळे शौक लहानपणा पासून त्यांना होते. रसिक तर होतेच त्याच बरोबर चित्रपट पाहण्याची त्यांना आवड भरपूर होती.. बाबा आमटे यांचा  एक विशेष गुण होता तो म्हणजे प्रत्येक गोष्ट जीव ओतून आणि मनापासून करायची. जिथे साहस आहे,संकट आहे त्याठिकाणी त्यांना धावून जायला फार आवडायचे. शिकार करताना  समोर समोर करायचे, मटण सकाळ-संध्याकाळ खायचे, परंतु त्यांनी ज्या वेळेस या सर्व गोष्टी सोडायचे ठरवले त्या पुन्हा आयुष्यात कधीच केल्या नाहीत. 

बाबा हे पेशाने वकील होते. वकिली करून ते स्वतःसाठी खूप काही करू शकले असते. परंतु दोन तास कोर्टात युक्तिवाद करून 50 रुपये आपण कमवतो पण शेतातील मजूर मात्र दिवसभर राबून केवळ 12 रुपये कमवतो. हे योग्य नाही असे त्यांना मनापासून वाटले.बाबा आमटे यांच्यावर महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे,
 सानेगुरुजी इ.लोकांचा त्यांच्या मनावर खोल असा परिणाम झाला. बाबा आणि ताईंचे लग्न झाल्यावर दोघांचे घरातील वातावरण यामध्ये जमीन-असमानचा फरक, परंतु तरीही साधनाताईंनी प्रत्येक गोष्टीत बाबांची साथ दिली.श्रीमंतीतल्या माणुसकीपेक्षा गरिबीच्या  माणुसकीचे पारडे नक्कीच जड ठरत असते अशी बाबांची मनोधारणा होते.

आपल्या मुलांची नावे त्यांनी एक विकास आणि दुसरा प्रकाश अशी ठेवली. नाव ठेवतानाही त्यांची दूरदृष्टी खूप वेगळी होती.कारण डॉ. विकासने आनंदवनाचा विकास केला आणि डॉ.प्रकाशने आदिवासी लोकांचे जीवन प्रकाशमय केले.

 1949 मध्ये बाबांनी "महारोगी सेवा समिती "स्थापन केली. केवळ कुष्ठरोग्यांची सेवा करणे त्यातून त्यांना बरे करणे हा केवळ हेतू नक्कीच नव्हता, तर या सर्व रोग्यांना स्वावलंबी  बनवणे आणि स्वतःच्या पायावर उभं करणे हा त्यांचा मूळ हेतू होता. दुःखी, कष्टी शरीराला पूर्ण व्याधीने जखडलेले घरातील आपल्याच माणसांनी अशा व्यक्तींना घरापासून बाहेर काढले, त्या व्यक्तींच्या मनामध्ये आनंद निर्माण व्हावा, आनंदी वातावरण तयार व्हावे.म्हणूनच आनंदवनाची स्थापना केली.

चंद्रपूर- नागपूर मार्गावर 50 एकर जागा सरकारनी बाबा आमटे यांना दिली की, ज्या ठिकाणी केवळ खडकाळ भाग साप,विंचू चित्ते,अस्वल, यांचा सुळसुळाट होता. अशा ठिकाणी थोडीशी झाडेझुडपे साफ करून तिथं प्रथमतः दोन झोपड्या उभ्या राहिल्या. एक आमटे कुटुंबियांसाठी आणि दुसरी कुष्ठरोग्यांसाठी. भिंती नसलेल्या झोपडीत सुद्धा साधनाताई राहिल्या. हे एक दांपत्य खूप वेगळं  असेच होते.  एके काळी रेसर गाड्या फिरवणारे बाबा आमटे आणि रेशमी साड्यांच्या दुकानाच्या मालकिणीची मुलगी साधनाताई. अशा दाम्पत्यांना कोणत्या मुलखावेगळ्या स्वप्नांचे वेड लागलं होतं.......

हिंस्र श्वापदांची भीती, कुष्ठरोग्यांची लागण होण्याची भीती, निसर्गाच्या रुद्र रूपाची भीती, या सगळ्या गोष्टी असतानाही सर्व संकटांना तोंड देत त्या निर्जन खडकाळ माळरानावर हे दांपत्य पाय रोवून उभे राहिले..... अगदी कायमचे.

स्वतः हातामध्ये टिकाव, खोरे, घेऊन 30-40 फूट विहिरी खोदल्या आणि त्या खडकातून पाणी बाहेर काढले. खरंतर पाण्यापेक्षा किती तरी पट जास्त घाम तिथं बाबा आमटे व त्यांच्या सहकार्यानी गाळला होता. त्यांच्या सोबतीला काम करायला कुष्ठरोगी स्वतः बरोबरीने काम करत. पाण्याच्या वापरामुळे त्याठिकाणी शेती ही चांगल्या प्रकारे होऊ लागली. आनंदवनातील उदरनिर्वाहासाठी लागणारा भाजीपाला त्याठिकाणी पिकू लागला. आणि कुष्ठरोगी ही स्वतःच्या पायावर उभे राहायला लागले. कुठल्याही व्यक्तीला दया करून भीक नको असते, तर हवा असतो तो आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि स्वावलंबन आणि हेच बाबांनी ओळखून हळूहळू पावले उचलायला सुरुवात केली.....

अल्पावधीतच आनंदवनाने खूप मोठी भरारी घेतली, कुष्ठरोगाचे काम करणाऱ्या बाबांच्या विषयी भारतातच नव्हे तर जगात सुद्धा त्यांच्या कामाची दखल घेऊ लागले. आनंदवनात दूध निर्मिती सुरू झाली, अनाथालय सुरू झाले, करमणुकीची साधनं त्याठिकाणी सुरू झाले, शाळा, महाविद्यालय  या ठिकाणी उभारी घेऊ लागले...बाबा हे सर्व करत असताना आपले लेखन ही चालू ठेवत." ज्वाला आणि फुले", 
"करूणेचा कलाम" अशी कितीतरी दर्जेदार काव्य तयार झाली. ही काव्य अतिशय सुंदर व वास्तवातून तयार झालेले दिसून येतात.अजिंठा,वेरूळ येथील कोरीव मूर्ती आपण मोठ्या उत्साहाने पाहतो परंतु आनंदवनात स्वतः हरितक्रांती घडवून आणलेल्या कुष्ठरोग यांचा पराक्रम आपण आवर्जून पाहिला पाहिजे.....

बाबा आमटे म्हणजे मूर्तिमंत चैतन्यशिस्त आणि व्यवहारज्ञान यांचा संगमच त्यांची ऊर्जा फार अफाट होती. आनंदवनातील  काम करत असताना त्यांना अतिशय आनंद होत होता.

भारत जोडो, नर्मदा बचाव आंदोलन अशा कामी बाबांनी सायकलीवर जास्तीत जास्त प्रवास करून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला... पुढे आनंदवनासारखीच
 अशोकवनाची सुद्धा निर्मिती केली.

बाबा आमटे यांच्या या असामान्य कार्याबद्दल त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण असे असंख्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.त्यांच्या जीवनावर आधारित वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित केलेली असंख्य पुस्तके निर्माण झाली अभ्यासक्रमांमध्ये आली

डॉ.विकास आमटे - 

वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी चुली पुढे बसून स्वयंपाक करतानाचा त्यांचा फोटो पाहिला तर आपण एवढेच म्हणू," उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी". डॉ.विकास स्वतः डॉक्टर असल्यामुळे आनंदवना मध्येच त्यांनी नवनवीन उपक्रम चालू केले, विविध फॅक्टरी निर्माण झाली. तीन चाकाची सायकल बनवणारे आनंदवन ही एक नंबर कंपनी झाली. दरवर्षी 1000 पेक्षा जास्त सायकली तिथं बनवल्या जातात. पाव बनवणे, पॉपकॉन बनवणे या गोष्टीही तिथं निर्माण होऊ लागल्या.

डॉ. विकास यांची पत्नी डॉ. भारती ह्या बालरोग तज्ञ आहेत. त्यामुळे आनंदवनातील मुलांच्या आरोग्याची जबाबदारी आपोआपच त्यांच्याकडे आली. 14 रुपया पासून सुरु झालेली "महारोगी सेवा समिती" ही समिती 27 कोटी पेक्षा जास्त रकमेची बनली आहे. हे डॉ.विकास अभिमानाने सांगतात, आणि ही किमया केवळ आनंदवनातील कुष्ठरोगी बोटांनी केलेल्या कामाची आहे.1997 पासून डॉ.विकास यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड सुरू केले पक्ष्यांचे अभयारण्य बनवावे हा त्यामागचा विचार होता. आनंदवन येथील 200 एकर जमिनीवर शेती सुरू केली.गाया वाढवल्या, सलाईनच्या बाटल्यापासून आकर्षक कलाकृती बनू लागल्या. कुष्ठरोग यांचा त्याचप्रमाणे अपंग व्यक्तींचा एक ऑर्केस्ट्रा तयार केला त्याला "स्वर आनंदवन ऑर्केस्ट्रा" असे नाव देण्यात आले. यातील कलाकार अंध,अपंग,रुग्ण हे स्वतः बरोबर दुसऱ्यांनाही आनंद देत आहेत.

सुसज्ज कॅम्पुटर लॅब, इंटरनेट कनेक्शन, इ. सर्व सुविधा त्या ठिकाणी आहेत. "आनंद निकेतन"  कॉलेजमधून आत्तापर्यंत हजारो मुले- मुली पदवीधर होऊन बाहेर पडले. 

शेतकऱ्यांचा  आत्महत्या सारखा  ज्वलंत प्रश्न त्या वेळेस खूप गाजत होता. त्या वेळेस  डॉ.विकास व त्यांचे सहकारी अक्षरक्षा गावभर हिंडून त्यांनी शेतकऱ्यांचे मूळ अडचण समजावून घेतली. त्यांना आनंदवनातील शेतीची माहितीही देण्यात आली. डॉ.विकास यांना एकच व्यसन लागले होते ते म्हणजे नवनवे प्रयोग करण्याचे आणि त्यांनी ते आनंदवनमध्ये योग्यरीत्या केल्याचे आपणाला दिसून येते.

डॉ.प्रकाश आमटे-

"हेमलकसा" येथील लोकबिरादरी प्रकल्प म्हणजे बाबा आमटे यांच्या मनातील आणखीन एक स्वप्न. जिथे यांचे धाकटे चिरंजीव डॉ.प्रकाश आमटे यांनी साकारले. या कामी त्यांना सोबत मिळाली  त्यांची पत्नी डॉ.मंदा आमटे यांची. मंदा आमटे यांचे आई, वडील शिक्षक, घरचे वातावरण उच्चशिक्षित असे असतानाही त्यांनी अत्यंत मोकळेपणाने प्रकाश आमटे यांच्याबरोबर लग्न करून त्यांना मोलाची साथ दिली.
"हेमलकसा" म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील अतिशय मागासलेला भाग.घनदाट जंगल अगदी सूर्यप्रकाश जिथे जमिनीवर पोहोचत नाही अशी दमदार जाळी, केवळ हिंस्र पशु पक्ष्यांचे त्याठिकाणी आवाज येत. तिथे राहणारे स्थानिक लोक भिल्ल,वारली,ठाकर जमातीतील त्यातही माडिया हि जमात सर्वात मागासलेली. आदिवासी लोक हे  नवीन लोकांना भिऊन पळून जात असत.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदा आमटे यांनी आरोग्य वैद्यकीय सुविधा पुरवणे हाच एकमेव उद्देश त्या ठिकाणी समोर ठेवला. दोघेही डॉक्टर असल्यामुळे फारशी अडचण नव्हती. हळू हळू  तेथील लोकांची मनं जिंकत त्यांनी लोकांना आपलेसे केले. स्वतः हाफ पॅन्ट, बनेल घालू लागले, केसांना तेल न लावणे, रबरी चपला वापरत, याचा एकच हेतू होता की अशा प्रकारचा पोषक पाहून  आदिवासींना देखील आपण त्यांच्यासारखेच एक आहोत असं जाणवू लागले. पण हा डॉ. प्रकाश आमटे यांचा किती मोठा त्याग...

हेमलकसा येथे प्रथम सर्वात मोठी अडचण आली ती लोकांच्या मधील भाषेची, परंतु त्या भाषेचा अभ्यास करून ही हळूहळू लोकांची जवळीकता ते करू लागले. तेथील लोकांनाही  दवाखानामुळे चांगला फरक पडू लागल्याने जवळीकता जास्त वाढली. हळूहळू त्या ठिकाणी शाळा सुरू झाली, अनाथ जंगली पशुपक्षी यांचा सांभाळ त्या ठिकाणी होऊ लागला.

जंगलातील जीवन म्हणजे रोजच धोकादायक, कधी कुठला प्रसंग समोर उभा राहील याची कल्पना आपण करूही शकत नाही. पण केवळ सामाजिक कार्य आणि काहीतरी करण्याची जिद्द त्यांनी मनावर घेतली. वाघ,चित्ता, अस्वल, हरीण अशी अनेक प्रकारची त्याठिकाणी पक्षी- प्राणी आहेत.

प्रकाश आमटे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.काही पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे व मंदा आमटे या दोघांना संयुक्तरीत्या मिळाले. त्याचबरोबर इतरही अनेक पुरस्कार त्यांना त्याठिकाणी मिळाले.

आमटे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या परीने समाजासाठी अतुलनीय, असामान्य असे योगदान दिले आहे. प्रत्येकाची कार्यक्षेत्र वेगवेगळी असली तरीही त्यांचं उद्देश  हे मात्र एकच.... पीडित, दुःखी लोकांसाठी  काहीतरी भरीव कार्य करायचं आणि हे आमटे कुटुंबियांनी केले आणि या कार्याची फलनिष्पत्ती  संपूर्ण जगाने पाहिली.एकाच कुटुंबामध्ये अनेक व्यक्तींना पुरस्कार मिळणे हा खरंतर त्यांच्या कार्याचा केलेला गौरव आहे. आणि हे कार्य करत असताना त्यांना सहकार्य करणाऱ्या त्यांच्या घरातील सर्व लोकांचा मित्र परिवारांचा हा बहुमान आहे.... असा बहुमान होणे दुर्मिळच...

"एका अवलियाचा प्रपंच" हे पुस्तक एकदा हातात घेतले की ते वाचल्याशिवाय ठेवूच वाटत नाही. कित्येक 
सहर्षमय कहानी,अडचणी, अपार कष्ट अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी हे सुंदर पुस्तक सहज, सोप्या भाषेत लेखिकेने उत्कृष्टरित्या मांडणी केलेली आहे. हे पुस्तक आपण सर्वांनी अवश्य वाचावे.
 पृष्ठसंख्या - 272 
 मूल्य- 330 
अभिप्राय शब्दांकन
      Ganesh Tambe

Tuesday, June 15, 2021

द रेनमेकर

द रेनमेकर 
By ---जॉन ग्रिशम

मेहता पब्लिशिंग हाऊस 
अनुवादक --अनिल काळे 

   जॉन ग्रिशम यांच्या कादंबऱ्यांच वैशिष्ट्य म्हणजे.. कथानायक एक वकील...जो न्याय व्यवस्थेला जिवंत ठेवण्याच काम करतो...कधी मोठमोठ्या कंपन्यापासून, उद्योगलॉबीपासून, राजकारणी, माफियापासून तर कधी यांच्याशी हातमिळवणी करून सामान्य जनतेला न्यायापासून दूर ठेवणाऱ्या वकीलफ़र्म पासून... 

      यामध्ये.. हालाखीच्या परिस्थितीतुन.. नुकताच वकील झालेला, परंतु कोणत्याच वकीलफ़र्म मध्ये नोकरी न मिळालेला  रुडी बेलर.. त्याच्या हातामध्ये फक्त एकच केस... 
       एक बलाढ्य इन्शुरन्स कंपनी.. जी  आपल्या विमाधारक डॉट ब्लॅक या महिलेच्या आजारी मुलाचा 'मेडिकल इन्शुरन्स क्लेम ' नाकारते...  परिणामी त्या मुलाचा मृत्यू होतो... 
        डॉट ब्लॅक.. रुडी बेलर मार्फत... त्या कंपनीवर नुकसान भरपाईचा दावा करते... 
        यामध्ये... बलाढ्य इन्शुरन्स कंपन्या कशा नियमबाह्यपणे विमाधारकांचे क्लेम नाकारून गडगंज नफा कमावतात,  कदाचित कुणी कोर्टात गेल्यास त्याचबरोबर सेटलमेन्ट करतात,  यातूनही कोर्टात केस  उभी राहिल्यास...विम्यापेक्षा जास्त पैसा मोठमोठ्या वकील खर्च करतात परंतु क्लेम द्यायाच टाळतात... याच वास्तववादी चित्रण लेखक डोळ्यासमोर उभ करतो... 

         सर्व सत्य परिस्थिती माहित असूनही मोठमोठ्या वकीलफ़र्म पैशासाठी,  कायद्याच्या नावाखाली, कशी नैतिकता गुंडाळून ठेवतात...हेही लेखक कसलाही आडपडदा न ठेवता स्वछपणे मांडतो.. 

   त्याच बरोबर रुडी बेलरच समांतर आयुष्य, त्यातील चढउतार, स्वतःच्या इच्छा आकांशा याही गोष्टी छानपणे मांडल्या आहेत... तसंच यातील प्रत्येक व्यक्तीरेखेला योग्य न्याय दिल्याने त्याही मनात घर करून बसतात.. मग तो त्याचा मित्र बेकर, कोर्टकेस मध्ये जीव तोडून मदत करणारा डेक,  न्यायाधिश हार्वे हेल, किल्पर  असोत कि विरोधी वकील ड्रमंड असो... कि प्रेयसी केली रिकर.... 

   खरंतर,  इन्शुरन्स, कायदे, कोर्ट केसेस म्हणजे अगदी रटाळवाने विषय... परंतु जॉन ग्रिशम इतक्या रोमांचक पद्धतीने मांडतात की पुस्तक हातातून अर्धवट बाजूला ठेवणं जीवावर येत... इतक हे उत्कंठावर्धक  आहे.. 

तर तर... 
रुडी बेलर चमत्कार करून, 'इन्स्टंट रेनमेकर ' म्हणजे तो  ही केस जिंकणार का आणि कशी? 

त्यासाठी तुम्हाला हे पुस्तकं वाचावं लागणार... 

--#संदीपबडे#--

वाट तुडवताना

वाट तुडवताना...

Two roads diverged in a wood and I...I took the one less travelled by, and that has made all the difference...
रॉबर्ट फ्रॉस्ट च्या या ओळी आठवण्याचं कारण म्हणजे नुकतच वाचलेलं पुस्तक.. 'वाट तुडवताना'. करियर च्या एका टप्प्यावर सरकारी नोकरी मिळत असतानाही ती नाकारून पत्रकारीता क्षेत्रातच एक नवी वाट तुडवण्याचा लेखकाने घेतला निर्णय फ्रॉस्टच्या वरील ओळींशी साधर्म्य सांगतो.उत्तम कांबळे या पत्रकारिता क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तीने प्रामाणिकपणे मांडलेलं आत्मचित्रण.पुस्तकाने त्यांना कसं घडवलं आणि बदलवलं हे सांगणारं, विचार करायला लावणारं पुस्तक.ग्रंथांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करणारं.  बालवयापासूनच त्यांना वाचनाची ओढ  होती मात्र जिथे दोन वेळच्या भाकरीची भ्रांत तिथे पुस्तकासाठी कसले आले पैसे. पण सुप्त इच्छा या केव्हा तरी जाग्या होतातच. पुढे या बुद्धीच्या भुकेने भाकरीच्या भुकेवर मात केलीच आणि शाळा-कॉलेज, लेखन ,पत्रकारिता, संपादक हा प्रवास व्हाया विविधांगी वाचन कसा  सुकर होतो ते वाचण्याची मजा प्रत्यक्ष पुस्तकातच मिळेल. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी जरी केली तरी एक मोठी wish list तयार होईल. शेवटपर्यंत साधेपणाने व निरपेक्षपणे जीवन जगणे अजूनही शक्य आहे हे ते स्वतःच्या उदाहरणातून दाखवून देतात.एका बातमीने काय होऊ शकते याची काही उदाहरणेही  पुस्तकात आहेत. ती वाचून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे काय ते कळते. (आज अशा खंबीर व निःपक्ष आधारस्तंभची गरज वाटते)
चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे, साध्या माणसाला कसे फसवतात याचाही प्रत्यय लेखकाला आला आणि कळत नकळत झालेल्या चुकीचा पश्चात्तापही. एक साधं, प्रामाणिक आणि बरच काही शिकवणारं,नवी वाट तुडवू  इच्छिणार्‍यांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणारं नक्कीच वाचावं असं पुस्तक... वाट तुडवताना...
 प्रशांत सुसर 
 बुलडाणा

समांतर

समांतर
लेखक - सुहास शिरवळकर

असं म्हणतात की जन्माला येणारा प्रत्येक माणूस आपलं नशीब बरोबरच घेऊन येत असतो. त्याच्या आयुष्यात त्याच्या वाट्याला तेवढीच सुखदुःख येतात जेवढी नशिबात लिहून ठेवलेली असतात. पण जर तुम्हाला तुमचं भविष्य समजलं तर? तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे हे जर तुम्हाला आधीच समजलं तर तुम्ही तुमचं नशीब बदलू शकाल? याच कथासूत्राभोवती विणलेली आहे प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांची  'समांतर' ही कादंबरी.

या कादंबरीचा नायक आहे कुमार महाजन. कुमार  हा साधारण तिशीचा मध्यमवर्गीय तरुण आहे. त्याच्या आयुष्यात काहीच चांगले होत नाहीये. त्याचा एक मुलगा काळाने लहानपणीच त्याच्यापासून हिरावून घेतलाय. आपल्या बायको आणि मुलाला सुखात ठेवण्यासाठी आपण पुरेसे पैसे कमावू शकत नाही यामुळे तो खूपच निराश आहे. कुमारचे वर्तमान चांगले नाही पण भविष्य तरी चांगले आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याचा मित्र वाफगावकर त्याला एका स्वामींकडे घेऊन जातो. तेथे त्यांच्या बरोबर एक आश्चर्यकारक घटना घडते. कुमारच्या हाता सारखा हुबेहूब हात ३० वर्षापूर्वी पाहिल्याचे स्वामी कुमारला सांगतात. सुदर्शन चक्रपाणी असे त्या व्यक्तीचे नाव होते. परंतु कुमारचे भविष्य सांगण्यास मात्र स्वामी नकार देतात. स्वामीजींच्या या वागण्याचे कुमारला आश्चर्य वाटते आणि त्याच्या मनात एक विचार तरळून जातो, की जर सुदर्शन चक्र पाणी याचा हात हुबेहूब माझ्या हाता सारखा आहे, तर दोघांचे नशीबही सारखेच असेल का? या विचाराची पडताळणी करण्यासाठी तो शोध सुरू करतो सुदर्शन चक्रपाणीचा. हा सुदर्शन चक्र पाणी कुमारला भेटतो का? खरेच दोघांचे नशीब सारखे आहे का? सुदर्शनचा भूतकाळ म्हणजेच कुमारचा भविष्यकाळ आहे का? जर असेल तर त्याचा वापर करून कुमार आपले भविष्य बदलू शकतो का? स्वामींनी कुमारचे भविष्य का सांगितले नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला कादंबरीच वाचावी लागेल. 

समांतर ही अतिशय छोटी कादंबरी आहे. केवळ दोनशे पृष्ठसंख्या असलेली. त्यामुळे एका बैठकीत चार पाच तासात देखील तुम्ही ती संपवू शकता. खरे तर एकदा सुरुवात केली की शेवट होईपर्यंत तुम्हाला ती खाली ठेवताच येत नाही. शिरवळकरांनी वाचकांना अगदी सुरुवातीपासून शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवलेला आहे. याच पुस्तकावर आधारित स्वप्निल जोशीची एक वेबसिरिज देखील आहे. वेब सिरीजचा पहिला भाग प्रदर्शित झाला असून दुसरा भाग प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. वेब सिरीज मध्ये कादंबरीतील कथेला थोडा मॉडर्न टच देण्याचा प्रयत्न केला असून कथेचा मूळ गाभा मात्र सारखाच आहे. कादंबरीचा शेवट तर इतका अनपेक्षित आहे की असं काही होईल अशी कल्पनादेखील तुम्ही आधी करू शकत नाही. त्यामुळे एखाद्या दिवशी मस्त चहा अथवा कॉफीचा वाफाळता कप हाती घेऊन 'समांतर' वाचायलाच हवी.
Vinod thorat

पुस्तकाचं नाव- कोल्हाट्याचं पोर लेखक - किशोर शांताबाई काळे

पुस्तक क्रमांक-📗87..🖋️ 
   पुस्तकाचं नाव- कोल्हाट्याचं पोर
   लेखक - किशोर शांताबाई काळे

1994 मध्ये M.B.B.S शिक्षण पूर्ण.... 27 वर्षापूर्वीचा काळात उच्च प्रतीचे शिक्षण घेणे कदाचित त्याकाळी तारेवरची कसरतच... मागासलेल्या समाजामध्ये जन्माला येऊनही आयुष्य हे शिवधनुष्य पेलण्याइतकं महाकठीण तरीही कोल्हाटी समाजातील एक मुलगा स्वतःच्या अपार परिश्रम , जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास या जोरावर डॉक्टर झाला.. कारण विशिष्ट जातीवर किंवा नावावर किंवा उच्च कुळात कोणाच्या पोटी जन्म घेतला याच्यावर आपलं शौर्य अवलंबून नसतं तर आपल्या कृतीवर अवलंबून असतं आणि ज्याने हे शक्य करून दाखवलं त्याचं नाव किशोर शांताबाई काळे...

हो.... किशोर शांताबाई काळे कारण नाचणारीच्या मुलाच्या पुढे आईचं नाव लावलं जातं, कारण बापाचा पत्ताच नसतो.... बापाचे नाव लावण्यापासूनच जीवनाचा संघर्ष सुरू होतो.वैवाहिक जीवन हे तर त्यांच्या वाट्याला येतच नाही. घरातील वडीलधार्‍या बाप माणसांचा फक्त पैसा हाच उद्देश... पैशापुढे सर्व नातीगोती कवडीमोल... आई, बहीण,भाऊ कुणाचा तिथं पैसा फक्त गुणाचा.....

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजाने नाकारलेल्या समाजाच्या,आई-वडिलांच्या, नातेवाईकांच्या प्रेमाला पोरके झालेल्या आणि आयुष्यभर पोरकेपणाची वागणूक मिळालेल्या एका मुलाची ही हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट स्वतः लेखकाच्या शब्दात....

"कोल्हाट्याचं पोर" हे आत्मचरित्र संपूर्ण समाज व्यवस्थेवर आणि समाज व्यवस्थेचा पाया असणाऱ्या सर्व जबाबदार घटकांना ही खूप मोठी चपराक आहे...
 नाचणे ही तर कला आहे, त्याचबरोबर स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी केलेले हे दिव्यकार्यच.... लहान मुल भुकेने व्याकुळ जरी झाले तरीही लोकांच्या मनोरंजनासाठी त्या मुलांना दूध न बसता नृत्य 
करायला जाणारी आई,एक- एक पैसा अंगावर फेकताना तो नाचत गोळा करायचा आणि गोळा करत असताना अक्षरक्षा थकून जाणे... 

     पाहणारा हा केवळ कला म्हणून पाहत नव्हता तर त्याच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारची वासना होती.... पैशाची मस्ती होती.... आणि त्या जोरावरच ती धनदांडगे लांडगे  बायांना मालकी हक्क समजायचे.. बाया नाचत असताना कोणी खडे मारत, कोणी डोळा मारत, एखादं गाणं म्हणायला,नाचता आलं नाही तर मोठमोठ्याने ओरडत. कोलाटी समाजामध्ये पुरुष मंडळींनी बसून खायचं आणि त्यांच्या घरातील स्त्रियांनी मात्र त्यांच्या हाऊस भागवण्यासाठी नाचत राहायचं ही कोणती परंपरा आणि हा कोणता न्याय... हा आपणाला योग्य वाटतो का? आणि आजही काही बदल झाला असेल...?

लेखकाची आई शांता अतिशय हुशार सातवीपर्यंत शाळा शिकलेली शिक्षिका होण्याचं तिच्या डोळ्यासमोर स्वप्न.... आपण शिकल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल असं तिला वाटायचं... परंतु शिकणं हे त्या समाजाच्या नशीबीच नव्हतं. ज्या वयात हातामध्ये पेन वही असावे त्या वयामध्ये पायामध्ये घुंगरू बांधावे लागले. आईला नाचता येत नव्हतं, अंग लवत नसायचे तरीही  ती हे अग्निदिव्य कार्य इच्छा नसतानाही करावे लागले... 

त्याकाळची चिरा उतरवणे ही एक अत्यंत भयानक पद्धत होती. जो व्यक्ती जास्त पैसे देईल त्या व्यक्तीचा त्या महिलेवर मालकी हक्क असायचा... सर्व काही उपभोगायचं, मनाला वाटेल तेव्हा यायचं, परंतु लग्न हा विषय नाही लेखकाच्या आजोबांनी सुरू केलेली हि परंपरा आपल्याच पोटच्या मुलीचे,बहिणीचं शरीर विकणारा या नात्याला कोणतं नाव द्यायचं... बाप म्हणावं तर बाप हा शब्द बदनाम होईल, अपवित्र होईल..... 

लेखकाच्या आईचा ही चिरा नेरल्याच्या एका आमदाराने उतरवला दोन अडीच महिने आनंदात गेले. आईला दिवस गेले आणि तिथून पुढे आमदारांनी आईकडे येणेच बंद केलं.. केवळ शरीरावर प्रेम करणारी किडा-मुंगी सारखी हजारों स्वार्थी माणसं आपल्या अवतीभवती भेटतात... परंतु मनापासून मनापर्यंत प्रेम करणारे मोजकेच आणि विरळच आणि अशी माणसे मिळणे खरंतर भाग्यच.....
पैसेवाले, धनदांडगे लोक तर शेवटी नाचणारी यांना बाजारातील वस्तूच समजत आणि त्यातूनच लेखकाचा जन्म झाला.....

काही दिवस सुखाचे गेले की मोज- मजा झाली की तो मालक पुन्हा एकदा सोडून जायचा आणि स्वार्थी दुनिया मुळे पुन्हा एकदा पायात घुंगरू, पुन्हा काही दिवस संसार पुन्हा पायात घुंगरू ही अशी सतत सुरू असलेली ही ससेहोलपट.... कधीही न संपणारी  म्हणावी लागेल का?

नाच- गाणं पाहायला येणारे लोक खूप गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात स्त्रियांना अडकवत असत आणि स्त्रियांच्या घरातूनच त्यांना त्यासाठी जबरदस्ती असत.असंच पुन्हा एकदा एका व्यक्तीच्या प्रेमात आई पडली .परंतु यावेळी मात्र आई  कायमस्वरूपी त्यांच्या बरोबरच राहिली. परंतु तिलाही खुप काबाडकष्ट करावे लागले.कारण जोपर्यंत चेहऱ्यावरती सुरकुत्या पडत नाही तोपर्यंतच स्त्रियांचे जीवन हे गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत पण एकदा का चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागल्या की  मित्र... प्रेम... कुणीच कुणाचे नसतं.... 

 आई बरोबर लेखकाला मात्र त्यांच्या नवीन घरी जाता आलं नाही. कारण मी आईबरोबर गेलो तर आई घरी पैसे पाठवणार नाही आणि मग आमच्या आजोबांना दारू, मटण खायला पैसे कुठून मिळणार ? जणूकाही आई मुलाचे नात ह्या गोष्टीसाठी गहाणच ठेवल्यासारखे, आणि बरच काही...

लेखकाला घरातील सर्व कामे दररोज करावी लागायची स्वयंपाक ,दळण आणणे असेल, किंवा जे सांगेल ते काम त्यांना करावे लागत असे. परंतु घरातील त्यांच्या मामांना मात्र जागेवर बसून सगळं आयते खायला मिळायचे. या गोष्टीचा लेखकाच्या बाल मनावर काय परिणाम होत असेल ही कल्पनाही करणे शक्य नाही. अशा परिस्थितीतही शिकण्याची जिद्द, चिकाटी शेवटपर्यंत लेखकाने सोडली नाही.

आईची आणि लेखकाची असणारी ताटातूट ही तर काळीज पिळवटून टाकणारी हृदयद्रावक गोष्ट.. काही दिवस लेखक आईजवळ राहिले परंतु दुरून डोंगर साजरे त्याप्रमाणे तिथे गेल्यानंतर ही तेथील वडिलांचा त्यांना खूप त्रास झाला. खूप काम करावे लागले.

लेखकाला शाळा शिकत असताना पावलोपावली जात आडवी येत असे." किशोर शांताबाई काळे "असं नाव पुकारलं तरी सगळ्यांच्या नजरा  लेखकाकडे वळत.वडिलांचे नाव काय आहे? असे अनेक वेळा प्रश्न एम.बी.बी .एस चे शिक्षण घेत असतानाही विचारले जायचे, रूम मिळण्यापासून जात विचारली जायची आणि रुम मिळाल्यावर ही नाव समजल्यावर रूम सोडून जावे लागे. अशा परिस्थितीमध्ये एक वेळेस परीक्षा पास होणे सोपे,परंतु जीवनाची परीक्षा पास होणे म्हणजे अग्निदिव्य....

समाजामध्ये काही चांगल्या प्रकारची लोक ही असतात. त्याप्रमाणेच  लेखकाला खरोखरच खूप चांगल्या प्रकारचे सहकार्य करणारी  जिवाभावाची माणसेही भेटली त्यामध्ये खासदार रामराव लोणीकर,त्यांच्या पत्नी नागिण मावशी या सर्वांनी त्यांना खूप सहकार्य केले...

 मेडिकलमधील प्रत्येक वर्षाला पैशाची भासणारी चणचण त्यासाठी लेखकाला करावा लागणारा संघर्ष आजच्या तरुण पिढीला खूप काही सांगून जाण्यासारखा आहे...

"कोल्हाट्याचं पोर" हे किशोर काळे यांचे आत्मचरित्र हे प्राप्त परिस्थितीमध्ये न डगमगता यशस्वी वाटचाल कशा प्रकारे करायची याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक. सर्वांनी आवश्य वाचावे व आपल्या संग्रही ठेवावे.
 
पृष्ठसंख्या-116
 मूल्य -125 
   अभिप्राय शब्दांकन
         सिधुसूत....🖋️

पुस्तकाचे नाव : स्वप्नातील चांदणे (कथासंग्रह)

पुस्तकाचे नाव :  स्वप्नातील चांदणे (कथासंग्रह) 
लेखक : श्री रत्नाकर मतकरी
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठ संख्या : 64
पुस्तक परिचय क्रमांक :   पाच

    लेखक श्री रत्नाकर मतकरी यांनी नऊ परिकथा लिहून त्यांचा 'सोनेरी मनाची परी' या नावाने कथासंग्रह तयार केला. या परिकथा म्हणजे लहान मुलांच्या विश्वातील परिकथा नसून प्रेमात पडलेल्या तरुणांच्या आजूबाजूच्या परिस्थिती मधील वास्तवाचे  दर्शन घडवणार्‍या कथा होय. अशा या दुर्मिळ 'सोनेरी मनाची परी' या कथासंग्रहाची नवीन प्रकाशित आवृत्ती म्हणजेच' स्वप्नातील चांदणे' हा कथासंग्रह होय.
     अशा या कथा संग्रहाचे श्री चंद्रमोहन कुलकर्णी यांनी रेखाटलेले आकर्षक मुखपृष्ठ पुस्तकातील कथांचे प्रतिनिधित्व करते. आकर्षक कपड्यांमध्ये तरुण तरुणी आकाशामध्ये अधांतरी, लुकलुकत्या चांदण्या, चंद्राच्या अस्तित्वात, तुरळक ढगांच्या सोबतीने विरह करताना, पुस्तकातील कथा रसग्रहण करण्यासाठी वाचकांची उत्कंठा वाढवितात.
     कथासंग्रहाचे नाव आणि मुखपृष्ठानंतर आता येवू या मतकरींच्या कथाशैलीकडे. मुळातच या परिकथा किंवा प्रेमकथा अशा वाचकांसाठी लिहिल्यात कि जे मनाने तरुण आहेत, त्यांना जीवनातील लपलेले काव्य, सौंदर्य यांची पारख आहे. प्रेमातील विरह, संवेदनशीलता यांची जाणीव आहे.   
     पहिली कथा 'जादूचे फुलपाखरू' मध्ये पस्तीस वर्षीय प्राध्यापक रुक्ष जीवन जगत असतात. बालकवींच्या कवितेत त्यांना कधीही प्रेमभाव ओतता येत नाही. त्यांचे जीवन एकाकीपणा आणि नैराश्य यांनी काठोकाठ भरलेले असते. त्यांच्या खोलीतील अडगळच त्यांची सोबत असते. त्यांच्या अस्तित्वाने सभोवतालचे वातावरण वैराण बनत असते. अशातच त्यांच्या वर्गातील एक अल्लड मुलगी  सुरवंटाचे फुलपाखरू अथवा कळीचे फुलात रूपांतर झाल्याप्रमाणे तरुणी बनून त्यांच्या सानिध्यात येते.  तिच्या बरोबर असलेले जादूचे फुलपाखरू , तिचे प्रेम काही कालावधीसाठी प्राध्यापकाची हरवलेली वर्षे हंगामात मोहोर परत यावा, तशी परत आलीत, असे वाटते. मात्र ते प्रेम दुसर्‍या कुणाचे ठेव असल्या कारणाने प्राध्यापकाला लाभत नाही. परिणामी  जीवनात अंधकार होवून बालकवींची फुलराणी कविता प्राध्यापकांना वर्गात कधीच नीटशी शिकवता आली नाही. 
     यानंतरच्या कथा  वाचावयास मिळतात 'दुखऱ्या गुडघ्याची गोष्ट', 'स्वप्नातील चांदणे', 'फाटक्या कपड्यातील राजकन्या' , 'लाकडातील चेहरा' , 'वनराणी आणि फुल' , 'कुंभ' , 'कवीची प्रिया' आणि 'सोनेरी मनाची परी'. 
     या सर्व कथा आपल्या आयुष्यातील सत्य कथा आहेत अशा वाटतात. स्री पुरूष नात्यातील आकर्षण वेगवेगळ्या पद्धतीने दाखवतात. मनाला स्पर्शून जाणार्‍या या कथा मध्ये वाचकाला नकळत कुठे तरी स्वतः ला तुलना करण्यास भाग पाडतात. म्हणुनच जंगल, झाडे, फुले, कळ्या, नदी, समुद्र हे सर्वच आपल्या दैनंदिन जीवनातील सोबती आहेत, आपणही त्यातीलच एक भाग आहे हे वाचक स्विकारतो. कथे मधील दुःख, प्रेम, विरह, त्याग, वेदना वाचकांच्या हृदयाला हात घालतात. 'कवीची प्रिया' मधील धरित्री मनुष्य कसा असतो हे समजावून सांगताना आकाशदेवता आणि जलदेवता यांना म्हणते, "माणूस असाच वेडा असतो. एकदा प्रेम केले की त्याला बरेवाईट, कुरूपसुंदर काही समजत नाही. आणि म्हणुनच त्याचे विरहदुःख हिर्‍यासारखे तेजस्वी नि बाणासारखे तीक्ष्ण असते." 
       या सर्व कथा सन 1959 ते 1964 या कालावधी मध्ये वेगवेगळ्या मासिकात प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावेळी असलेली सामाजिक परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामधे जमीन अस्मानाचा फरक आहे. मात्र आजही वाचकांना प्रत्येक कथा मंत्रमुग्ध केल्या शिवाय आणि आपल्याच जीवनाशी कुठे तरी निगडित असल्याची जाणीव करून दिल्या शिवाय राहात नाही. 
 वाचकांची उत्सुकता कमी होवू नये म्हणुन प्रत्येक कथेचे विश्लेषण जाणीवपूर्वक टाळले आहे. टीका टिप्पणी स्वागतार्ह.

@मंगेश काटकर 

बोर्डरुम

*बोर्डरुम*
आज पुन्हा एक पुस्तक वाचून संपवले अप्रतिम लेखन, माहिती आणि तीही आपल्या मातृभाषेतून मराठीतून. अच्युत गोडबोले अतुल कहाते यांच आणखीन एक अप्रतिम पुस्तक. मॅनेजमेंट हा विषय किंवा हा शब्द आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो. परंतु ही मॅनेजमेंट मोठमोठ्या कंपन्यांची चालते कशी याची माहिती देण्याचा प्रयत्न या पुस्तकांमध्ये केला गेला आहे. परदेशातील शक्यतो अमेरिकेतील कंपन्या त्याच्या अवतीभवती की माहिती फिरते कारण त्यांच्याकडे औद्योगिक क्रांती फार मोठ्या प्रमाणावरती फार लवकर झालेले आहे. वेगळ्या मॅनेजमेंट गुरूंनी लिहिलेल्या पुस्तकांचा देखील यामध्ये उल्लेख आहे व त्यांनी काय तत्व लिहिली होती व त्याचा कसा फायदा तोटा झाला हे देखील त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती कळते.  
खरंतर आजकाल बरेच निराशेचे वातावरण आहे. परंतु पूर्वीदेखील असं वातावरण किंवा अशी वेळ येऊन गेलेली आहे. बर्याच व्यक्ती या नैराश्याच्या अंधारातही न हरता वाटचाल करत राहील्या, राखेतून पुन्हा फिनिक्स पक्ष्यासारख्या उभ्या राहील्या याची अनेक उदाहरणे येथे या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात.
फोर्ड, मॅकडोनाल्ड, बोईंग, जिलेट, केलॉग, गुडइयर टायर, कोकाकोला, पेप्सी, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, सिंगर, वॉर्नर ब्रदर्स, सोनी, कोड्याक, वॉल्ट डिस्ने या आणि यासारख्या बऱ्याच कंपन्यांची नावं आपण ऐकलेली आहेत परंतु त्या तयार कशा झाल्या त्यासाठी काय कष्ट घेतली गेली. एखादी कंपनी तयार होत असताना त्याच्या निर्मात्याने काय विचार केला किंवा एखादा प्रॉडक्ट बनवत असताना त्याची आयडिया त्या निर्मात्याला कशी सुचली हे वाचण्याजोगे आहे. एखादी कंपनी बुडत असताना त्याने त्यांचे निर्णय कसे बदलले व त्या कंपन्या कशा प्रगतीपथावर गेल्या हे वाचण्याजोगे आहे. यातून आपल्यामध्ये देखील व्यवसाय करणे, व्यवसाय मध्ये कसे निर्णय घ्यावेत, निर्णय चुकले तरी घाबरून न जाता पुन्हा कसे उभे रहावे. याचे बऱ्याच प्रकारे आपल्याला मार्गदर्शन होऊ शकते. 
ज्यांना मॅनेजमेंट मध्ये जायचं आहे जॉब करायचा आहे आणि मुख्यत्वेकरून ज्यांना व्यवसाय मध्ये यशस्वी व्हायच आहे अशा सर्वांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.
*शिवराज आरती विश्वासराव जुवेकर*.

स्वामी.....📖

स्वामी.....📖 🚩📖

रणजित देसाई ह्यांची लोकमान्यता पावलेली ऐतिहासिक कादंबरी. ह्या कादंबरीला रणजित देसाईंची "मानसकन्या" म्हटलं तर वावग ठरणार नाही. लिखाणाच्या क्षेत्रात देसाईंना स्वतःच अस्तित्व निर्माण करून देणारी ही  "साहित्य अकादमी पुरस्कार" प्राप्त कादंबरी...!!!

"पेशवे" हे नाव ऐकल्यावर अपल्याला फक्त श्रीमंत बाजीराव पेशवे व्यतिरिक्त अन्य कोणी पेशवे फार कमी माहिती आहेत . अशाच एका इतिहासाला विसर पडलेल्या योध्याची कथा. पानिपतच्या लढाई नंतर अवघे १६ वर्षाचे असताना पेशवाईची जबाबदारी अंगी येऊन पडलेल्या माधवराव पेशव्यानी स्वतःचा गृहकलह सोडवत मराठी दौलतीची जी जपवणूक केलीये ती वाचताना विस्मयकारक वाटते...

आपल्या अल्प आयुष्यात त्यांनी मराठी सत्तेचा दरारा पुन्हा एकदा बसवला. अशा माधवराव पेशव्यांचे राजकीय आणि वैयक्तिक जीवन खूप जवळून पाहायला मिळत ते ह्या कादंबरीतून...

ऐतिहासिक कादंबरी एवढ्या सोप्या पण प्रभावी शब्दांत मांडणे ही कला रणजित देसाईंकडेच आहे. प्रत्येक पात्र मग ते रमाबाई असो किंवा राघोबादादा किंवा गोपिकाबाई, खूप सुंदर रेखाटलंय. आयुष्याच्या शेवटी रमा-माधव ह्यांच्यात होणारी संभाषणे तर जीवाला वेगळाच चटका लावून जातात...

सती जाण्याइतपत रमेच प्रेम, तिला तिच्या आयुष्यात काही देऊ न शकल्याची माधवरावांची खंत, जीवघेण्या आजारातूनही कर्नाटकच्या मोहिमेवर जाण्याची माधवरावांची जिद्द आणि शेवट पर्यंत मराठी दौलतीचा सांभाळ करण्याबद्दलचा त्यांचा विचार हे सारं मांडताना लेखकाची मेहनत पदोपदी दिसून येते...

रमेला हरिहरेश्वरला पाठवताना, सागराचं वर्णन लेखकाने जे सुरेख रंगवलं आहे त्याला तोडच नाही...

शेवटी मात्र, मृत्यूची चाहूल लागल्यावरचे माधवरावांचे बोलणे, हे वाचताना देसाईंच्या लेखणीठायी असलेल्या अलौकिक प्रतिभेचे दर्शन होते...

वाचकाला खिळवून ठेवणारी ही रणजित देसाईंची अप्रतिम कलाकृती नक्की वाचा....!!!

#स्वामी 📖

#रणजितदेसाई  🙏

~ हितेश...✒️😊❤️

* समिधा * ------- साधना आमटे

*  समिधा *
  ------- साधना आमटे

बाबा आमटे यांच्या लोकविलक्षण जीवनाला साथ देत असताना साधनाबाईंनी अपार  कष्ट केले, अग्निदिव्ये म्हणावीत अशा प्रसंगांतून आमटे निर्भयपणे वाटचाल केली आणि हे सारे सहजतेने व आनंदाने सोसताना त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्यही टिकविले. बाबा आमटे यांचे कार्य किती महान आहे याचे अधिक वर्णन करण्याची आवश्यकता नाही. पण त्याचबरोबर त्यांच्या स्वभावात अद्वितीय सहानुभूती आणि जबरदस्त तापटपणा, असामान्य सहृदयता आणि तत्त्वांचा आग्रह धरताना पत्नीच्या होरपळीकडे त्यांनी काही वेळा केलेली डोळेझाक अशी एक विलक्षण विसंगती आहे. बाबांच्या वादळी जीवनात त्यांना साधनाताईंनी जी आयुष्यभर साथ दिली तिची अद्भुतरम्य कहाणी असे या आत्मकथेचे स्वरूप आहे.

आत्मकथेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे साधनाताईंनी कोठेही तात्त्विक विवेचन केलेले नाही. परंतु त्या ज्या रीतीने जगल्या ते वाचताना म. गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची शिकवण त्यांना सतत मार्गदर्शक होत होती याचा प्रत्यय वाचकाला येतो. उदात्त विचारांच्या या अंतःप्रवाहामुळे ही केवळ अनुभवांची गाथा न राहता तिला व्यापक अधिष्ठान प्राप्त होते.

त्यांच्या आठवणी मांडताना त्या म्हणतात----

हिमालयाची सावली

नागपुरातील जुन्या वेदशास्त्रसंपन्न घराण्यातील सोवळे वळण असलेली एक तरुण व सुंदर मुलगी एके दिवशी दाढीजटा, कफनी व दंडधारी अशा व्रतस्थ तापसाला पाहते, दृष्टादृष्टीच्या त्या एका क्षणात त्याचा आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याचा निर्धार गळून पडतो व तिच्या मनावरील परंपरेची सर्व बंधनेही निखळून पडतात. तसे त्या दोघांमध्ये बऱ्याच बाबतींत अंतर असते. पण वयाचे, रंगरूपाचे, स्वभावाचे व जीवनदृष्टीचेही अंतर परिवर्तनाच्या त्या एका क्षणाने दोघांच्याही नकळत कसे भरून निघाले, ते दोघांनाही कळले नाही. सौंदय हे स्त्रीचे सामर्थ्य, तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य मानले जाते. दोघेही एकमेकांच्या अशा सौंदर्यावर लुब्ध होतात. यातील नायिका असामान्य रूपवती, तर नायक लोकोत्तर कर्तृत्वाचा. त्याने तिच्याजवळील मानसिक लावण्य तिच्या आचारगौरवावरून हेरले होते; तर त्याच्या वृत्तीची काव्यात्मता, भव्य स्वप्ने पाहण्याचे वेड, व ती कार्यान्वित करण्याचा आत्मविश्वास तिला आवडला होता. गांधीजी व रवीन्द्रनाथ यांचे त्याच्या व्यक्तित्वावरील संस्कार व विदेशी अभिनेत्रींशी पत्रव्यवहारातून सूचित होणारी रसिकता, त्याच्या आंतरिक सौंदर्यावर प्रकाश टाकत होती. पैकी त्याच्या साहसप्रियतेची व निर्भय विक्रमशीलतेची ओळख एका प्राणघातक आपत्तीच्या निमित्ताने तिला लग्नापूर्वीच पटली होती व आपला निर्णय अचूक असल्याचा दिलासाही मिळाला होता.

इंदू घुले व मुरली आमटे यांच्या वादळी पण उन्मादक सहजीवनाची कहाणी-- 

त्या वादळातल्या स्मृतिच्या हिंदोळ्यावरील समिधा त्या अक्षरं रूपाने मांडतात.
हे पुस्तकं म्हणजे
मराठी साहित्यातील " स्त्री आत्मचरित्रा " तील हा एक मैलाचा दगड होय.

                                 .......ममता मुनगीलवार

पुस्तकाचे नाव :- राजमाता जिजाऊसाहेब


पुस्तकाचे नाव :- राजमाता जिजाऊसाहेब
लेखक :-           डॅा. सुवर्णा नाईक निंबाळकर 
प्रकाशन :-         संस्कृती प्रकाशन 
किंमत :-            ३२५/- 
पृष्ठे  :-              २७२ 

     स्वराज्यसंकल्पक राजमाता जिजाऊसाहेब आहेत हे आपल्याला फार उशीरा समजले. स्वराज्य निर्मितीचे शहाजीराजांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊ बालशिवबाला घेऊन पुण्यात आल्या. त्या वीरकन्या, वीरपत्नी, वीरमाता झाल्या पण यामागे त्यांचे कष्ट व कर्तृत्वाचा परिचय आपल्याला अगदी अलीकडच्या काळात थोडाफार होऊ लागला. अगदी त्यांचे चित्रसुध्दा उपलब्ध नव्हते. सुमारे ३०/४० वर्षांपूर्वी त्यांच्यावर काही लेखक लिहिते झाले. त्यांच्यावर चित्रपटही निघाला. परंतु त्यांचे संशोधनपर लेखन डॅा. सुवर्णा निंबाळकर यांनी या पुस्तकात केले आहे. 
      हे चरित्र म्हणजे समस्त मराठेशाहीची स्वराज्याची वाटचाल आहे. जिजाऊसाहेब सक्षम, संयमी, कर्तबगार पण विनम्र, कोमल मनाच्या शत्रूच्या कर्दनकाळ ठरणाऱ्या होत्या. 
     स्वराज्याचे दोन छत्रपती घडवणाऱ्या त्या राष्ट्रमाता होत्या. राजांसमवेत सर्व राज्यकारभारात त्या सल्ला मसलत करत असत. 
     यात एकूण २९ प्रकरणे आहेत. जिजाऊंचे लहानपण, भोसल्यांचा उदय व कारकीर्द, शहाजीराजांचा उदय, विवाह, जाधव-भोसले वैर, लखुजीराजांचा वध, शहाजीराजांचे कर्तृत्व, शहाजीराजे व जिजाऊ सहजीवन, शिवरायांचा जन्म, शिवरायांचा विवाह, बालशिवाजीसह कर्नाटकात, स्वराज्य उभारणी, शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाची फजिती, पन्हाळ्याचा वेढा, शहाजीराजांची महाराष्ट्र भेट, शाहिस्तेखानाला शिक्षा, सुरतेची लूट, पुरंदरचा तह, आग्रातून सुटका, जिजाऊंची सुवर्णतुला, कोंढाण्याचे लगीन, राज्याभिषेक इ. इतिहासातील महत्वपूर्ण विषयाचे संशोधनपर लेखन सुवर्णा निंबाळकर यांनी केले आहे. 
    डॅा. सुवर्णा निंबाळकर यांनी भोसले घराण्यातील राजमाता जिजाऊसाहेब, महाराणी सईबाई, महाराणी येसूबाई व महाराणी ताराराणी अशा चार कर्तृत्ववान महिलांवर संशोधनपर चरित्रपर लेखन केले आहे. आपण ते जरूर वाचायलाच हवे..!!! 
आपल्या संग्रही हवीतच ही ऐतिहासिक चरित्र..!!

*विशेष टीप :- शिवस्पर्श प्रकाशनाची आणि डॅा.आ.ह. साळुंखे व प्रा. मा.म.देशमुख तसेच पुरोगामी चळवळीच्या लोकांनी वाचायलाच हवीत अशी इतर अनेक पुस्तके आमच्याकडे उपलब्ध. जरूर मागवा*

*परस्परांना पुस्तके भेट द्या. वाचन चळवळ जोपासा* 

-ॲड.शैलजा मोळक 
मी वाचक-लेखक # वाचन संस्कृती
शिवस्फूर्ती मीडिया सेंटर व शिवस्पर्श प्रकाशन पुणे

Monday, June 14, 2021

छत्रपती थोरले शाहूमहाराज (सातारा)

छत्रपती थोरले शाहूमहाराज (सातारा)

छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील राज्याचा विस्तार खऱ्या अर्थाने छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या नेतृत्वात झाला.ज्यांनी कील्यांचे दरवाजे दिल्लीकडे ठेऊन भविष्यातील योजना केली होती ती प्रत्यक्ष आकारात छत्रपती शाहू महाराजांनी आनली!

९ मे १७०३ रोजी औरंगजेबाने शाहू महाराजांना धर्मांतरण करण्यास सांगितले.शाहू महाराजांनी औरंगजेबाला निर्धाराने नकार दिला.हा निर्धार इतिहासातील फार मोठी गोष्ट आहे.ही केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील अतिशय प्रभावी आणि महत्वाची घटना आहे.

औरंगजेबाने शाहू महाराजांना धर्मांतरण करण्यास सांगितले.' तू मुसलमान हो ' असे औरंगजेबाने म्हटल्याचा लेखी पुरावा 'अखबार' मध्ये मिळतो.

शाहू महाराजांनी औरंगजेबाला निर्धाराने नकार दिला....धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे ते चिरंजीव! कैदेत असूनही नकार दिला.कोणत्याही प्रलोभनाला बळी नाही पडले.....

वयाच्या १८ वर्षापर्यंत शाहू महाराज आई सह औरंगजेबाच्या ताब्यात होते.स्वातंत्र्य नव्हते. शाहू महाराजांना एवढा ठाम निर्धार आणि निर्णय घेण्याची शक्ती कुठून आली असावी? याचे उत्तर शोधताना आपल्याला येसूबाई आठवतात.त्यांनीच धर्म रक्षणासाठी शाहू महराजांचे हे मनोबल निर्माण केले होते.त्या त्यासाठी शाहू महाराजांच्या सोबत सावलीसारख्या राहत होत्या.

पण शाहू महाराजांनी धर्मांतरण केले असते तर काय घडले असते?इतिहास जर तर वर ठरत नाही हे जरी खरे असले तरीही इतिहासात ही घटना किती महत्वाची आहे हे समजण्यासाठी हा विचार!स्वराज्याचा विस्तार ,चिमाजी बाजीरावांचा पराक्रम, शिंदे ,होळकर यांचा उदय,मराठ्यांचा जगभर निर्माण झालेला दरारा या पैकी काहीही घडले नसते....या देशाच्या इतिहासाला कसे वळण लागले असते? समाजावर काय परिमाण झाला असता हे सांगणे कठीण आहे.म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या चरित्राची ओळख आवश्यक आहे.

छ्त्रपती शाहू महाराज थोरले यांचे चरित्र!

पुस्तक: छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा)

लेखक: आसाराम सैंदाणे

प्रकाशन:प्रतिमा 
Yash Maske

जंगलाचं देणं

# वाचनसाखळी 
पुस्तकं परिचय क्र. -1 
पुस्तकाचे नाव  :- जंगलाचं देणं 
लेखक  :- मारुती चितमपल्ली 

 निसर्ग आणि मानवाचं अतूट असं नातं आहे. हे नातं आपल्याला खेचत असतं ! खुणावत असतं! साद घालत असतं. खर तर या निसर्गामुळे,  त्यातील घटकांमुळे आपल्या अस्तित्वाला आधार दिला आहे. आपल्या जगण्यातली एक भक्कम बाजू म्हणजे हा निसर्ग होय! निसर्ग आपल्याला दोन्ही करे जे जे म्हणून देता येईल ते ते आनंदाने भरभरून कायम देताच आला आहे! हा निसर्गच आहे जो आपल्या जगण्यातील क्षण अजरामर करतो. आयुष्यातील दुःख दुःखाचे चटके कसे सहन करायचे,  संयमी वृत्ती कशी राखायची,  नाती कशी जपायची, परोपकार, दयामाया,  प्राणीमात्रांविषयी चा कळवळा,  भूतदया, हे सारे  कधी गुरु तर  कधी माता बनून  तो आपल्या बदलातून की सारी जीवन मूल्ये  आपल्याला शिकवत जातो! इतकेंच नव्हे तर आनंदाचे क्षण द्विगुणीत करण्याचेही कार्य निसर्गाच करत आला आहे. अशा या अद्भुत,  चमत्कारिक पण विलोभनीय रुतूप्रमाणे बदलत जाणाऱ्या या रूपाचे आकर्षण साहित्यिकाला न होणे म्हणजे नवलच! नाही का!
              साहित्यिकांच्या कितीतरी पिढ्या या निसर्गावर पोसल्या गेल्या आहेत. तो कायम आपल्याला खुणावत,  आणि साद घालत,  शीळ घालत,  आपल्याला मोहित,  अचंबित करत,  आनंदाचे तुषार शिंपडत, ओलावा, गारवा देत,  चेतना पल्लव जागृत करत आला आहे! केशवसुत, बालकवी,कवी बी, कुसुमाग्रज,बोरकर, शांता शेळके,  अरुणा ढेरे अशी किती नावे सांगितली तरी ही यादी न संपणारी आहे. प्रत्येक साहित्यिक निसर्गातील तरल, कोमल जाणीवा,  भावना असणारे घटक सजीव करून आपल्या पुढ्यात आणतात आणि आपणही त्याचाच एक अविभाज्य घटक आहोत ही सुप्त जाणीव अगदी नकळत चेतवून जातात! मग ज्यांचा या निसर्गाशी अगदी जवळून संबंध येतं असणाऱ्या व्यक्तींना तर खजिनाच गवसल्याचा आनंद होत असेल! असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. वन अधीक्षक असलेले मारुती चितमपल्ली यांना आपण सारेच ओळखतो यांचे दुसरे घर म्हणजे जंगल होय! मग अशा या गूढ रहस्यमय मूक  असले तरी विशिष्ट शब्दात खुणा व संकेत देणारे,  आपल्या रुक्ष व नीरस अशा जगण्यातून एका सचेतना च्या पातळीवर घेऊन जाणारे,  अंतर्मुख करणारे,  अद्भूत अशा विश्वाची बाजू उलगडून दाखवणारे" जंगलाचे देणे" हे पुस्तक होय!
            आतापर्यंतचा जंगलाचा इतिहास आपल्याला हेच सांगतो की मनुष्य निसर्गाच्या सानिध्यात गेला की प्रगल्भ, परिपूर्ण होत जातो! जगण्याची कला जर कोणी शिकवत असेल तर तो निसर्ग !आणि लेखक मारुती चितमपल्ली यांचे हे पुस्तक आपल्याला बरेच काही देऊन जाते. ते मी पुढे सांगणार आहेच.  गो नी दांडेकर, ग्रेस,  शांता शेळके,  रवींद्र पिंगे, डॉक्टर सुरेश मिश्रा यासारख्या साहित्यिक दिग्गजांनी आपला अभिप्राय त्यांच्या या पुस्तकावर नोंदवला आहे त्यांची ही कौतुकाची मोहर त्यांच्या पुस्तकाला लाभली यातून मारुती चितमपल्ली यांचे हे पुस्तक किती उच्च दर्जाचे आहे याची साक्ष पटते.
             लेखक मारुती चित्तमपल्ली यांनी हातचं न राखता जंगलाच देणं भरभरून दिले आहे. यात कथात्मकता आहे, काव्यात्मकता आहे. संवेदनशील मनाची स्पंदने आहेत,  तरल सौंदर्यदृष्टी आहे! चिंचा आल्यात पाडाला,  पळस,  निंबोणीचं झाड,  फुललेला  मोहा,  देवदार वृक्ष या झाडांचे वर्णन त्यांनी आपल्या तरल शब्दातून जिवंत केले आहे! नुसते जीवंतच  नव्हे तर वर्षानुवर्षे आपली भव्यता,  उदात्तता जपत थोर माणसांसारखे ही झाडे आपल्याशी असणारे अतूट नाते अगदी सहज सांगून जातात !पक्ष्यांच्या जन्माचे गुढ  या त्यांच्या लेखात ते पक्षांच्या जन्माची रहस्ये मोठ्या प्रभावीपणे उलगडत जातात! पक्षिगान  या त्यांच्या लेखात पक्षांचे संगीत हे जगातलं सुंदर काव्य आहे याची प्रचिती ते आपल्याला करून देतात. पाखरांच्या जाती,  त्यांचे प्रकार,  त्यांचे रंग, व त्यांची घरटी या सार्‍या सार्‍या गूढ रहस्याची उकल  करता करता पाखरांचे आपले असे एक वेगळे विश्व असते याची ओळख ते मोठ्या सुरेख पद्धतीने करून देतात! तसेच नक्षत्रांचे देणे हा लेख तर वाचक रसिकांच्या मनात नक्षत्रांचे तेज  अलगद ओतून निसर्ग विभ्रमांचे भव्य आणि विशाल असे दर्शन घडवतो! सरोवर,  जलाशय आणि तळी यांनी निसर्गाला जे सौंदर्य बहाल केले आहे! याच्या वर्णनाने जलाला जीवन का म्हणतात,  यामागचा हेतू स्पष्ट होतो. पाण्याचे महत्व पटवून देणारा हा लेख वाचला की आपण आतापर्यंत वाचलेल्या काव्य व विशेषतः संस्कृत खंडकाव्य ची आठवण आपल्याला इथे प्रकर्षाने होते. त्यातील त्यांचे वर्णन वाचताना निसर्गातल्या इतर अनेक अलंकारांपैकी  तळी हा किती मौल्यवान अलंकार आहे याची साक्ष पटते! देवतळ,  गंगाझरी,  जलकन्या,  दारू बंद ही  गंधर्व नगरीशी नातं सांगणारी तळी आपल्याला भेटतात! लेखक म्हणतात गांधारी तळं  ही निसर्गातील अद्भुत किमया आहे.
            असं आपलं तुमचं माझं आणि सगळ्यांचंच जीवन समृद्ध करणारे जंगलं आणि त्यांचं वैभव जर कुठे सापडेल तर ते मारुती चितमपल्ली यांच्या "जंगलाचं देणं" या पुस्तकात !
             अलिबाबाच्या गुहेत कुबेराचा खजिना सापडावा त्याप्रमाणे या पुस्तकातील जंगलाच्या गुहेत संपूर्ण सृष्टीला संजीवनी देणारे,  चैतन्याचे अमृत प्राशन करायला देणारी,  रूप रस गंध असे नानाविध रसांचे रसपान करायला लावणारी,  तळ्यांच्या हिरव्या पाण्याची चव चाखायला देणारी,  आणि आपल्याला तृप्त,  शांत आणि परिपूर्ण करणारी ही अद्भुत गुहा आहे असे मला वाटते! तेव्हा अशा या रहस्यमय जंगली गुहेची सफर तुम्ही नक्की कराच !
             माझ्या या पुस्तक परिचयाने  जर तुम्ही चेतविल्या गेला असाल तर ती ठिणगी विझायच्या आत हे पुस्तक जरूर वाचाचं !  

            धन्यवाद ! 🙏🙏
Mruga Pagey

"मऱ्हाटा पातशाह

"मऱ्हाटा पातशाह - केतन कैलास पुरी"

इतिहासातील एखाद्या घटनेचा अथवा व्यक्तीचा चित्रमय प्रवास वाचलेला व पाहिलेला आहे. पण चित्रांचाच चित्रमय प्रवास पहिल्यांदाच वाचला आणि पाहिला. महाराष्ट्रात १ वर्षाच्या लहानमुलापासून ते ८०-९० वर्षाच्या वृद्धांपर्यंत ज्या एका नावाचं आदरयुक्त वेड असते ते म्हणजे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचा इतिहास आठवला तर त्यांच्या चरित्रातील ठराविक चार ते पाच घटना सोडल्यातर त्यापुढे सामान्य माणूस सरकत नाही. काहींना तर त्यांच जन्मसाल पण सांगता येत नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांचे असे हाल असतील तर बाकी राज्यातल्या आणि देशातल्या लोकांचा विषय सोडून देणेच बरे. पण तुमचा असा विचार असेल तर मऱ्हाटा पातशाह वाचून हा समज चुकीचा ठरेल. 
               उस्मानाबाद येथे राहणाऱ्या केतन पुरी तरुण इतिहास अभ्यासकांनी शिवछत्रपतींच्या इतिहासाच्या संदर्भाने असे काही संदर्भ खोडून व नव्याने मांडले आहेत की गेली कित्येक वर्ष आपण त्या गोष्टीचा विचारही करत नव्हतो. त्यातला एक मुद्दा सांगायचा झाला तर आजपर्यंत आपण सर्वांनी इयत्ता चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचे एक चित्र पाहिलेले आहे ज्यात महाराज घोड्यावर बसलेले आहेत व आजूबाजूला काही माणसे आहेत. आजवर सर्वच असे मानत आले की हे चित्र मीर महंमद नावाच्या चित्रकाराने काढलेले आहे. गेले १०० हून अधिक वर्षे सर्व इतिहासकार देखील हेच मानत आले. मुळात हे चित्र दुसऱ्याच चित्रकाराने काढलेले आहे पुस्तक वाचले की तुमचा हा समज दूर होईल. 
               शिवछत्रपतींचा इतिहास अभ्यासताना आपण फक्त स्वदेशी व्यक्तींनी लिहिलेल्या लिखाणाकडे लक्ष देत गेलो. परकीय लोकांच्या नोंदीकडे वा.सी.बेंद्रे, ग.ह.खरे, द.बा. पारसनीस, डॉ. बाळकृष्ण यांच्यासारखे इतिहास संशोधक सोडले तर आजवर कोणीही फारसे लक्ष घातले नाही. पुस्तकात वापरलेल्या परकीय साधनांमध्ये सर्वात जास्त नोंदी ह्या डचांच्या आहेत. आताच्या काळी एखाद्या इंग्रजी साधनाचे मराठीत भाषांतर करायचे म्हटले तरी असंख्य अडचणी येतात. शब्दांचे अर्थ व्यवस्थित लागत नाहीत. केतन पुरी यांचे यासंदर्भात खुप कौतुक करावं वाटते. त्यांना काही परदेशी लेखकांचे शोधनिबंध मिळाले जे डच भाषेत आहेत. आताच्या घडीला डच भाषा येणारे लोक सापडत नाहीत. अश्यावेळी काय करायचे ? एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो १९७१ साली डॉ. कमल गोखले यांचा शिवपुत्र संभाजी हा संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथ अभ्यासताना त्यांना काही डच साधनांचा शोध लागला. आता त्या काळी देखील डच भाषा समजणारे त्यातल्या त्यामध्ये १७ व्या शतकातील डच भाषा समजणारे लोक सापडणे तर खुपचं अवघड होते तरीदेखील त्यांच्या एका मित्राने काही डच साधने व पत्रे इंग्रजीत भाषांतरीत केले व नंतर गोखले यांनी ते मराठीत भाषांतरीत केले. ही गोष्ट आहे ५० वर्षांपूर्वीची. अगदी अशीच परकीय साधने वा.सी. बेंद्रे यांनी देखील संभाजी महाराजांवरील लिहिलेल्या ग्रंथात वापरली आहे. या दोन्ही इतिहास संशोधकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र लेखनात वापरलेली साधने आजही अप्रकाशित आहेत. त्यांच्यानंतर कोणत्याच इतिहासकाराने ती साधने वापरल्याचे आढळून येत नाही. केतन पुरी यांनी यात एक मार्ग काढला तो म्हणजे गुगल ट्रांसलेशनचा वापर करत डच भाषेतील शोधनिबंध भाषांतरीत केले. यात त्यांचा बराच वेळ गेला पण इतिहासातील बरीच रहस्य उलगडली. हे केवळ इतिहासाशी इमान राखणाराच करु शकतो.
               वरील डच शोधनिबंधातून त्यांना शिवछत्रपतींच्या काही चित्रांची माहिती मिळाली. महाराजांची चित्रे कुठे काढली गेली ? भारतामध्ये असणारी चित्रे लंडन, पॅरीस, अमस्टरडॅम, रशिया येथे कशी पोहोचली ? शिवाजी महाराजांचे प्रथम चित्र कोणी काढले ? हा सर्व शोध घेत असताना शिवछत्रपतींविषयी काही अन्य नोंदी उजेडात ज्या इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या अश्या की १६७७ साली दक्षिण दिग्विजयानंतर स्वराज्यात परतत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना तामिळनाडू मधील वलीकंडापूरम येथे हर्बर्ट डी यागर या डच राजदूताची भेट झाली. या भेटीत एक कौलनामा तयार झाला. इतिहासातला एक प्रवाद असे सांगतो महाराजांनी गुलामांच्या खरेदी-विक्री वर जबर कर आकारला होता पण कौलनाम्यातील नोंदी वाचल्यावर तुम्हाला महाराजांच्या एका मानवतावादी विचारांचे दर्शन घडेल. याच भेटीमध्ये हर्बर्ट डी यागर याने इतिहासाच्या दृष्टीने आणखी एक जबरदस्त नोंद करुन ठेवली आहे. शिवाजी महाराजांची एक सर्वात मोठी ताकद म्हणजे गुप्तहेर खाते. दुर्दैवाने हेर खात्याविषयी अगदी कमी ठिकाणी उल्लेख येतो आणि तोही बखरींमध्ये. पण या हर्बर्ट डी यागरने हेर खात्या संदर्भात नोंद करुन ठेवली आहे. ही नोंद वाचली आणि मला अक्षय कुमार आणि तापसी पन्नू यांच्या नाम शबाना या रॉ या गुप्तचर संघटनेवरील चित्रपटाची आठवण झाली. चित्रपटात मनोज बाजपेयी यांना त्या तापसीच्या मिनिटा मिनिटाची बातमी असते. ही नोंद वाचल्यावर तुम्हाला त्या काळातील हेर खात्याची कामगिरी किती चोख आणि परिपूर्ण होती हे कळेल.
               छत्रपती शिवाजी महाराज दिसायला कसे होते याविषयी परकालदास, हेन्री ऑक्झिंडन, थेव्हेना, कॉस्मो दी गार्दा यांच्याव्यतिरिक्त काही अन्य परकीयांनी महाराजांचे केलेले वर्णन प्रथमच पुस्तकात वाचनात आले.
               प्रस्तुत पुस्तकामध्ये जवळपास ४० दुर्मिळ रंगीत चित्रे छापलेली आहेत. ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची काही चित्रे, छत्रपती संभाजी महाराजांची ५ चित्रे, थोरल्या शाहू छत्रपतींची २ चित्रे व अन्य काही ऐतिहासिक व्यक्तींची चित्रे आहेत. यातल्या प्रत्येक चित्राचा इतिहास प्रथमतः वाचायला मिळत आहे. ऐतिहासिक दृष्टीकोनातून पुस्तकाचे मुल्य खूप मोठे आहे. छत्रपतींच्या इतिहासामध्ये असा अभ्यास या अगोदर केल्याचे जाणवत नाही. इतिहासामध्ये आणखी एक वाद असा आहे की काही जणांच्या मते महाराजांच्या पदरी चित्रकारच नव्हते पण पुस्तक वाचल्यावर तुमचा हा देखील वाद दूर होईल. 
               एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते ती अशी की Gijs Kruijtzer या परकीय इतिहास अभ्यासकाशी केतन पुरी यांनी संपर्क साधला. त्यांनी हवी तेवढी मदत केतन पुरी यांना केली. यासाठी ना कोणता मोबदला घेतला ना स्वार्थी वृत्ती मनात ठेवली लागेल ती मदत केली. आजही ही परदेशातील माणसे शिवछत्रपतींच्या चरित्रावर अभ्यास करतात याचा खूप आनंद वाटतो. पण दुर्दैव एवढेच आपलेच काही इतिहास अभ्यासक एकमेकांना मदत करताना कुंठित विचारसरणी ठेवून स्वार्थीपणे वागतात. तश्या लोकांना सुध्दा केतन पुरी यांनी धडा शिकवला आहे. "जे जे आपल्याशी ठावे ते सकळांना सांगावे" या भावनेतूनच त्यांनी या विषयावर पुस्तक लिहून उत्तम काम केले आहे. ही शिकवण अर्थातच मांडे सरांची आहे.
               पुस्तक वाचताना काही रंजक गोष्टी प्रथमच माहिती पडल्या आहेत. त्यातल्या दोन गोष्टी सांगतो बाकी पुस्तकात वाचा. शिवछत्रपतींना सरदार, महत्वाच्या राजकीय व्यक्ती, काही परकीय व्यक्ती भेटायला येत असत तेव्हा शामियान्यामध्ये त्यांना खाण्यासाठी विडा ठेवला जात असे. हा विडा ठेवण्यासाठी चक्क सोन्याचा डबा होता. महाराजांच्या मनुचीच्या चित्र संग्रहातील चित्रात हा डबा दाखवला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे थोरल्या शाहू छत्रपतींना प्राण्यांवर फार प्रेम होते. त्यांनी बरेच प्राणी पाळलेले होते. त्याची माहिती पुस्तकात मिळेल. महत्वाचे असे की त्यांनी दोन कुत्री पाळली होती त्यांच्या गळ्यात सोन्याच्या माळा घातलेल्या होत्या. 
               छत्रपती शिवाजी महाराज दिसायला कसे होते हे चित्रातून आणि काही समकालीन लेखकांच्या व परकीयांच्या वर्णनातून आपल्याला कळतेच. महाराजांचा राज्यकारभार आणि महाराज बुध्दीचातुर्याने केलेल्या लढाया सर्वांना माहिती आहेच. पण महाराजांच्या एका गोष्टीविषयी फक्त सेतुमाधवराव पगडी सोडले तर कोणीच लिखाण केले नाही ती गोष्ट महाराजांचे बोलणे कसे होते. पुस्तकात एका स्वतंत्र प्रकरणात या विषयी केतन पुरी यांनी चर्चा केली आहे ती जरुर वाचायला हवी.
               मऱ्हाटा पातशाह वाचल्यानंतर एक प्रश्न मनामध्ये तयार होतो तो ही इथे विचारतो जेणेकरून सर्वांना त्याचे उत्तर मिळेल. पुस्तकात छापलेले चित्र क्र. २० याआधी शिवकथाकार विजयराव देशमुख यांच्या शककर्ते शिवराय खंड १ मध्ये कृष्णधवल रंगात छापलेले आहे. हे चित्र आणि अलिकडेच मनोज दाणी यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे म्हणून एका खाजगी व्यक्तीच्या संग्रहातील प्रकाशित केलेले चित्र. ही दोन्ही चित्रे समोरासमोर ठेवली तर सारखीच वाटतात फक्त अंगावरील वस्त्रांचा रंग वेगळा आहे. अगदी चित्राच्या मागील बांधणीचा रंग देखील सारखा आहे असे असताना एक चित्र शिवाजी महाराजांचे आणि दुसरे संभाजी महाराजांचे कसे ? खरेतर हा प्रश्न पुस्तक प्रकाशित होण्याअगोदरचा आहे. पण पुस्तकात देखील या विषयी उत्तर मिळाले नाही. 
               मऱ्हाटा पातशाह पुस्तकात केतन पुरी यांची मागील काही वर्षांची मेहनत पूर्णपणे उतरली आहे. इंद्रजित सावंत यांनी केतन पुरी हे इतिहासातील बिनीचे शिलेदार आहेत हे शब्द पुस्तक वाचल्यावर तंतोतंत लागू पडल्याचे कळते. पुस्तकाचा मध्यवर्ती विषय हा छत्रपतींच्या चित्रांविषयी आहे. त्या चित्रांची माहिती गोळा करण्यात लागलेली मेहनत आणि कष्ट लक्षात घेता प्रस्तुत लेखामध्ये त्या चित्रांविषयीची माहिती पुस्तकातच शोभेल ह्या उद्देशाने टाळली आहे‌. शिवछत्रपती, शंभूछत्रपती, शाहूछत्रपती यांच्या ऐतिहासिक चित्रांविषयी संपूर्ण माहिती पुस्तकातच वाचा.
               मऱ्हाटा पातशाह पुस्तकाची सिद्धता लक्षात घेता एका गोष्टीची खुप खंत वाटते ती म्हणजे आज प्रमोद मांडे सर आणि स्वप्निल दादा कोलते असायला हवे होते. या पुस्तकाचे लेखक केतन पुरी हे मित्र आहेत याचा खूप अभिमान वाटतो. 

जगदंब....!

                                                   - सुशांत संजय उदावंत
                                                     'तुळजाई' नाथापूर, बीड
                                                     दि. १४/०६/२०२१