Sunday, November 28, 2021

पुस्तकाचे नाव..महापुरुष मंडेला

वाचन साखळी समूह

 पुस्तकाचे नाव..महापुरुष मंडेला  -  लेखक.....जोसेफ तुस्कानो
परिचय कर्ता...संगीता वाईकर.

     *महापुरुष मंडेला * या पुस्तकातील अंतरंगात
* ओळख
*आफ्रिकन बापू
*झुंजार नेत्याचा उदय
*आफ्रिकन लढ्याला पाठिंबा
*भारतीयांशी संबंध
*या सम हाच नेता
*क्षमाशील वृत्ती
*खिलाडू वृत्ती
*कुटुंबीय
*मंडेलांच्या मृत्यू नंतर
*हृदय आठवणी 
*आणि मरणोत्तर कार्य
     अशी एकूण बारा प्रकरणे आणि चार परिशिष्टये आहेत.
स्वर्गीय नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिका देशाचे पितामह होते.त्यांना 'मदिबा ' असेही संबोधले जात.त्यांचे सगळे आयुष्य वर्ण द्वेषा विरुद्ध लढा देत तुरुंगातच गेले पण जीवनाच्या अखेरच्या पर्वात त्यांनी आपले साखळदंड अहिंसक मार्गाने तोडले व ते मुक्त झाले.
    केवळ हाता पायांना जखडणे ,साखळदंड तोडणे म्हणजे मुक्ती नव्हे तर इतरांच्या स्वातंत्र्याची कदर नि आदर करणे म्हणजे खरी मुक्ती होय ,हेच त्यांचे मत होते .मानवतेच्या स्वातंत्र्या साठी जीवात जीव असे पर्यंत लढायचे हे त्यांच्या जीवनाचे ब्रीद होते.त्यांचे नि: स्वार्थी नेतृत्व ,आपल्या देश बांधवांप्रती असलेली अनुकंपा आणि त्यांची उदात्त परंपरा यासाठी ते देश वासियांच्याच नव्हे तर अखिल जगाच्या स्मरणात राहतील यात संदेह नाही.भावी पिढीसाठी त्यांचे त्यागपूर्ण जीवन एक आदर्श आहे.
     साऱ्या दक्षिण आफ्रिकेचे ते ' ताता ' म्हणजेच ' पिता ' होते.एक जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्त्व,मुत्सद्दी,राजकारणी,क्रांतिकारक,जागतिक दीपस्तंभ होते.१८ जुलै १९१८ रोजी दक्षिण आफ्रिकेतील ट्रांस्केई प्रांतातील एका गावात त्यांचा जन्म झाला. त्यांनी एकूण २७ वर्षे कैद भोगली.'हिंस्त्र जनावरांशी मोकळ्या हाताने सामना करता येत नाही,त्यासाठी शस्त्र उचलायला पाहिजे ' हे त्यांचे उद्गार.
   नेल्सन राष्ट्रपती झाले तेव्हा ' यापुढे या देशात वर्ण द्वेष राहणार नाही,सर्वांस समान हक्क राहील ,सर्वांचे जीवन सुखी करता येईल असा प्रयत्न करू. काळे- गोरे असा भेद न मानता या महान  देशाचे नागरिक म्हणून देशाचा उत्कर्ष करू असे आश्वासन त्यांनी दिले.
    'प्रश्न तत्वांचा नसतो ,तर कलुपत्यंlचा असतो ' या सूत्रावर त्यांची नितांत श्रद्धा होती .त्यांनी आपल्या परदेशी धोरणात सहा तत्वांचा पुरस्कार केला.
*मानवी हक्क अधिकार
*लोकशाहीचा पुरस्कार
* आंतरराष्ट्रीय कायद्या बद्दल आदर
*प्रभावी शस्तास्त्रे नियंत्रण
*अहिंसेद्वारे जागतिक शांतता
*एकमेकांवर अवलंबून असलेल्या देशाशी आर्थिक सहकार
    शिक्षण हे स्वातंत्र्यासाठी सर्वात मोठे साधन आहे याची जाणीव त्यांना झाली.तुरुंगात त्यांनी शिक्षण घेतले.उत्तमोत्तम साहित्याच्या सहवासाने त्यांची वैचारिक जडणघडण झाली.' शिकायचे ,जुळवून घ्यायचे नि विकास करायचा' हे त्यांच्या जगण्याचे सूत्र बनले . कैद्यापासून ते राष्ट्र प्रमुख बनलेले ,त्यांच्या देशाचे नैतिक केंद्र झालेले,वर्ण द्वेषातून फाळणी होऊ घातलेल्या देशाची एकजूट करणारे ते एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते आणि जगातील नेत्यांचे स्फूर्तीदाते होते .अपार क्षमाशील वृत्ती मुळे स्वभावात आलेले मार्दव आणि मनमोकळा स्वभाव यामुळे ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले.इतरांना क्षमा करून कटुता,राग,द्वेष,यापासून मुक्ती मिळवणे हे ' निरामय सुखी जीवनाचे रहस्य ' असते हे त्यांनी आपल्या वागणुकीतून दाखवून दिले.खिलाडू वृत्ती ही त्यांची एक महत्वपूर्ण खुबी होती .
   ६ डिसेंबर २०१३ रोजी या महापुरुषाचे  महानिर्वाण झाले .'आपण किती जगलो ही काही जीवनाची सांगता नाही,तर इतरांच्या आयुष्यात आपण किती बदल घडवून आणला यात ,जीवनाची इती वृत्ती सामावलेली असते ' किती महान संदेश देणारा हा एक महा पुरुष.
प्रत्येकाने आवर्जून वाचावे ,बोध घ्यावा ,असे हे एक परिपूर्ण असे पुस्तक.....
***************************
संगीता वाईकर.नागपूर.

फॉरेस्ट बाथिंग

फॉरेस्ट बाथिंग......
(हरित वनातील स्नान)
ऊर्जा पुनः प्राप्त करण्याची *'शिनरिन-योकु'* पद्धत
 🍀🍂🍁🌿🍂🍁

  #इकिगाई  या जागतिक बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस यांनी लिहिलेले पुस्तक.

या पुस्तकात लेखकांनी हिरवाईचे मानवाच्या तनामनाला होणारे फायदे अगदी सहजसुंदर भाषेत सांगितले आहेत. जपानमध्ये शारीरिक आणि मानसिक ताण तणाव दूर करण्यासाठी  'वनांकडे चला' ही उपचार प्रणाली मानली गेली आहे. हे सांगताना त्यामागे असणारी शास्त्रीय कारणे, त्यासंदर्भात केले गेलेले प्रयोग आणि त्याला असणारी तत्त्वज्ञानाची बैठक या सर्व गोष्टींची मांडणी, चित्रे, आकृत्या, आलेख, पौराणिक कथा याद्वारे केली आहे.
     प्रचंड लोकसंख्येची मोठी शहरे आणि बदललेली शहरी जीवनशैली यामुळे विशेषतः मोठ्या नगरात राहणाऱ्या जनतेची निसर्गाशी झालेली फारकत लक्षात घेऊन जपानमध्ये त्यावर केलेली उपाययोजना लक्षणीय आहे. प्रत्येक व्यक्तीला रानावनात जाणे शक्य नसल्याने बागेत हिरवळीवर चालताना किंवा घरात बसून सुद्धा वनस्पती सान्निध्याचे आणि त्याचे फायदे कसे घेता येतील हे सुचवले आहे.
    #इकिगाई  आणि #फॉरेस्ट बाथिंग या पुस्तकांचे लेखक एकच असल्याने या पुस्तकाचा संदेश निसर्गाकडे चला हा आहे. एकूण काय, तर औदासीन्य घालवून, ताण-तणाव कमी करण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी घराबाहेर पडण्याचा आणि वृक्षराजीशी जवळीक साधण्याचा संदेश हे पुस्तक देते.

   जागतिक कीर्तिचे प्रसिद्ध लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस सांगतात की, भावनिक सकारात्मकता आणि सर्वसाधारण आरोग्य यामध्ये वृद्धी होण्यासाठी मानव आणि निसर्ग यांचे ऋणानुबंध महत्त्वपूर्ण आहेत. जरी तुमचे घर, परिसर अतिशय गजबजलेला असेल तरीसुद्धा तुम्ही शुद्ध चैतन्याचा अनुभव तुमच्या पुढच्या 'फॉरेस्ट बाथिंग' पर्यंत स्वतःमध्ये साठवून ठेवू शकता.

☘️ 'शिनरिन-योकु' पद्धत. 

☘️ शिनरिन-योकुचे  तत्त्वज्ञान.

☘️ शिनरिन-योकुचे फायदे .

☘️ वाबी- साबी 

☘️ चैतन्याचा साऊंडट्रॅक 

☘️ जंगलातले 'चैतन्य' घरी कसे आणाल...

फॉरेस्ट बाथिंग....
लेखक: #हेक्टर गार्सिया आणि #फ्रान्सेस्क मिरालेस. 
प्रकाशक: मायमिरर पब्लिशिंग हाऊस.
अनुवाद - नीलिमा करमरकर 
किंमत : २२५/-
संपर्क: ९८८११८६६६३(व्हाट्सअप)
Mahesh sakunde 

Saturday, November 27, 2021

Employment-news- 27th November 2021 to 03rd December 2021

 

VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS 

Employment-news- 27th November 2021 to 03rd December 2021

Employment-news- 20th November 2021 to 26th November 2021

 

VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS 

Employment-news- 20th November 2021 to 26th November 2021

Thursday, November 25, 2021

THE CONSTITUTION OF INDIA

 


VIDYA PRATISHTHAN'S 

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

VIRTUAL LIBRARY 

 

 THE CONSTITUTION OF INDIA


संविधान दिवस २६ नोव्हेंबर २०२१ ई-प्रश्रमंजुषा

 

विद्या प्रतिष्ठान संचलित,
तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर-पुणे  
ग्रंथालय विभाग 




संविधान दिन (किंवा संविधान दिवस), याला राष्ट्रीय कायदा दिन म्हणूनही ओळखले जाते,या निमित्त विदया प्रतिष्ठान तंत्रनिकेतन  महाविद्यालय, इंदापूर,  ग्रंथालय विभागाच्या वतीने ई-प्रश्रमंजुषा  सर्व  वाचकांसाठी आयोजित करण्यात आली आहे.  यशस्वी सहभागींना ई-प्रमाणपत्र  देण्यात येणार आहे. आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे हि विनंती.
अतुल चंदनवंदन
ग्रंथपाल

प्रश्नमंजुषा करिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

प्रश्न मंजुषा लिंक 


Friday, November 19, 2021

Indira Gandhi Quiz Nov 2021

 


Vidya Pratishthan
            Polytechnic College, Indapur, Pune 
                            ONLINE QUIZ ON

                        Indira Gandhi    
India Gandhi: Remembering country's first female PM on her 104th birthday.
 Vidya Pratishthan's Polytechnic College Library ,Indapur,  organizing the online Quiz on the occasion of India Gandhi birth  Anniversary 

Participate in online Quiz and receive e-Certificate  of the participation to your correct email Id. 

CLICK HERE TO ATTEND ONLINE QUIZ

शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट

शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट

ले.डॉ हेमंतराजे गायकवाड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाचा जागतिक कीर्तीच्या राजांसोबत केलेले तुलनात्मक अवलोकन!

वक्ते लेखक,व्याख्याते यांच्या दृष्टीने अतिशय मौलिक आणि उपयोगी संदर्भ ग्रंथ!

अलेक्झांडर, सीझर, नेपोलियन, रिचर्ड द लायन, विलियम वॉलेस, हनीबल, गस्टावस, अकबर, औरंगजेब अशा जगातील कसलेल्या सेनानी आणि सम्राटांशी तुलना केलेलं हे पुस्तक अतिशय महत्वाचे ठरते.

चौथी आवृत्ती नोव्हेंबर 2021

पृष्ठ संख्या:३१८

मूल्य:३५०/

सवलत मूल्य:३१५/ टपाल:३५/ एकूण:३४०/

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता , पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.

मो:9421605019

रावजी लुटे यांचे ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी

पार्श्वभूमी
इस्लामी आक्रमणे! अनन्वित अत्याचार आणि पाशवी नरसंहार!आत्यंतिक धर्मांधता आणि टोकाचा रानटीपणा! बाटलेल्या हिंदूंना स्वधर्मात येणारा बंद केलेला मार्ग आणि त्यांच्या द्वारे झालेला सत्तेचा विस्तार! स्त्री विषयक परस्पर विरुध्द धोरण!युद्ध संदर्भात भारतीयांचे पवित्र नीतिमूल्ये, शरणागताला मिळणारे अभय!भारतीयांच्या स्वभावात असलेला राष्ट्रीयत्वाचा अभाव! व्यक्तिगत पातळीवर उच्च चरित्र असलेल्या विद्वानांचे शून्य असलेले राष्ट्रीय कर्तुत्व! या सगळ्या पार्श्वूभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे महत्व लक्ष्यात घेतले पाहिजे. या पार्श्वभूमीवर महाराजांचे चरित्र अभ्यासले पाहिजे.या पहिल्याच प्रकरणात लेखक वाचकांची पकड घेतात!

•ग्रंथातील प्रत्येक वाक्य पाठ करावे,नोंदवून ठेवावे इतक्या उच्च दर्जाचे आहे.

•कोणतीही भिड भाड न ठेवता लिहिलेले!

•पानोपानी उच्च मूल्य असलेले जगभरातील अस्सल संदर्भ ग्रंथातून घेतलेले संदर्भ!

चीनची भिंत जी बांधण्यासाठी शेकडो वर्षे लागली.तिच्या निर्मितीसाठी कोट्यवधी लोकांना गुलाम केले गेलं आणि लाखो लोकांना त्याच भिंतीचा भाग बनवले...ते एक जगातील सर्वात लांब स्मशान बनले....या उलट शिवरायांनी निर्मिलेली गड किल्ले! या एका तुलनेत आपल्याला कार्यकर्तृत्वाचा अंदाज यावा!
प्रत्येक प्रकरण कोणत्या तरी मोठ्या संदर्भाने तुलना करून लिहिलेले आहे.त्याद्वारे शिवरायांचे विचार, त्यांचे धोरण अधोरेखित केलं आहे.जसे पिता शहाजी राजांनी स्वतःची मुद्रा फारशी मध्ये केली होती; पण शिवाजी महाराजांनी स्वतःची राजमुद्रा मात्र संस्कृत मध्ये केलेली होती..ती ही वयाच्या १७ व्या वर्षी! बालपणी विजापूर दरबारातून दिसलेली शिवरायांची स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची तडफ ती पुढे स्वराज्याच्या निर्मितीत बदलली!

शिवाजी महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला.हा प्रसंग लेखकाने डेव्हिड आणि गोलियत या इस्राएल आणि फिलिस्तिन युद्धातील प्रसंगाला आधी लिहून पुढे विस्तारला आहे.असे असले तरीही स्वतःच्या बायका पाण्यात बुडवून मारलेला हा अफजलखान धास्तावलेल्याचा ही लेखक संदर्भ देतो.त्याच्या शिक्यावर असलेला मजकूर हा मूर्तीभंजक असा होता हे लेखक मुद्दाम उल्लेख करतात. अशा अफजलखानाला शिवाजी महाराजांनी लोळवळे...पण त्यानंतर त्यांनी दाखवलेला मानवी मूल्यांचा आदर्श दाखवलेला!

जिंकणाऱ्या राजाने पराभूत प्रजेवर मनाला येतील तसे अत्याचार करण्याचा कालावधी असलेला तो काळ होता.जगभर असेच चित्र होते...पण हे हिंदू राजांच्या स्वभावातील गोष्ट नव्हती.मेगॅस्थेनीस याच्या ग्रंथाचा हवाला देतो आणि पुढे म्हणतो,"वंचक कौर्य व राक्षसी विध्वंसाच्या तांडवाने येथील हिंदु सत्ता पार कोलमडून पडली . ते शौर्यात कमी पडले नसून पशु वृत्तीत व राक्षसीपणात कमी पडले होते." उदा  घोरीला दिलेले जीवनदान!पण शिवाजी महाराजांनी अफजलखान ठरवून ठार मारला.

३०० वॉरियर्स नावाचा नावाचा सिनेमा अनेकांनी पहिला असेल.३०० सैन्याच्या मदतीने १ लाख सैन्यासह आलेल्या ग्रीकांना थोपवून धरणारे हे युद्ध! लियोनिडास राजाने थर्मोपिली येथील खिंडीत लढताना शत्रूचे २० हजार सैनिक कापून काढले...अफजलखानचा मुलगा फाजलखान आणि सिद्दी जौहर,त्याचा जावई सिद्दी मसूद चे आक्रमण ही गजापुर खिंडीत असेच मोडून काढले होते.तीनशे शिलेदारांनी पाच हजार शत्रू कापून काढला होता.

अशा विविध जगभरातील प्रसिद्ध लढाया आपण थोडा विचार केला तर लक्ष्यात येईल ह्या आपल्याकडे किती ही लढल्या आहेत...अशा सर्व प्रकारची तुलना या पुस्तकातून वाचताना स्वाभाविकपणे अधिक माहिती मिळते.आणि महत्व समजते.

एकूण: ३३ प्रकरणे आहेत. यातील प्रत्येक प्रकरण चिकित्सक वाचकाला,अभ्यासकाला आणि इतिहास प्रेमी साठी अधिक माहिती देणारे  ठरते.

पुस्तक*आपण जिंकू शकता

🙏नमस्कार ....🌹
✍️वाचन साखळी समूह...
✍️ पुस्तक*आपण जिंकू शकता*
✍️वैचारिक लेख संग्रह
✍️लेखक * शीव खेडा*
✍️परिचय कर्ता *संगीता वाईकर*
      कधी कधी असं होतं...आपण एखाद्या लेखन स्पर्धेत सहभागी होतो आणि त्यात एखादं बक्षीस म्हणून एखादं पुस्तक आपल्याला मिळतंआणि मग लक्षात येतं या पुस्तकात त्यातील शब्दात जबरदस्त ताकद आहे.जीवन अमुलाग्र बदलून टाकण्याची क्षमता आहे.
    शीव खेडा यांचे * आपण जिंकू शकता * हे पुस्तक असेच अगदी दमदार.नावातच सारं काही सामावलेले आहे. जिंकणे कोणाला आवडत नाही ? तसचं हे पुस्तक अगदी प्रत्येक जिंकण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे .वाचा आणि जग जिंका.
      *आपण जिंकू शकता* या पुस्तकातील प्रत्येक वाक्य आणि वाक्य अतिशय महत्वाचे आहे.वाचा ,विचार करा आणि कृती करा .यश तुमच्याच हातात आहे एवढी खात्री यात आहे.
    या पुस्तकात एकूण आठ प्रकरणे आहेत.
१..महत्व दृष्टिकोनाचे
२...यश
३...प्रेरणा
४... आत्मप्रतिष्ठा
५... परस्पर संवाद
६...सुप्त मन आणि सवयी
७...ध्येय ठरवणे
८...नीतिमूल्ये आणि दूरदृष्टी
       या एकूण आठ प्रकरणात आहे जिंकण्याची क्षमता.वाचायचं आणि त्याप्रमाणे कृती करायची .
काही विचार .....
*आपल्या दृष्टिकोनात बदल केला की आपले आयुष्य बदलून जाते हे वास्तव आहे. 
*योग्य वेळी निर्णय घेणं याला  अत्यंत  महत्व आहे.
*सकारात्मक विचार हीच यशाची पायरी आहे.
*शिक्षणाने जीवन जगण्याची कला साध्य व्हायला पाहिजे.
*मनाने इतके कणखर व्हा,की कोणताही आघात झाला तरी मन : शांती ढळणार नाही.
*जीवनातला आनंद शोधा तो नक्की सापडेल 
*सतत शिकत रहा .थांबू नका .
*शरीराला चांगल्या अन्नाची तर मनाला चांगल्या विचारांची गरज असते.
*यश आणि सुख हे जोडीनं येतात.
* संघर्षाशिवाय काहीच चांगलं निर्माण होत नाही.
*निसर्ग खरोखरच संपन्न आहे त्याचा सन्मान करा.
*आत्यंतिक तळमळ हीच कार्यसिद्धी ची सुरवात असते.
*आपल्या सर्वांमध्ये सुप्त गुणांचा आणि क्षमतांचा खजिना दडलेला आहे.तो शोधायला हवा.
*कोणत्याही कामाचं नियोजन केल्यास त्यात यश मिळतंच.
*स्वतःच्या अज्ञानाची जाणिव होणं ही ज्ञानाकडे जाण्याची पहिली पायरी आहे.
*यशस्वी माणसं चमत्कारांची  किंवा सोप्या जबाबदाऱ्या ची ,कामाची अपेक्षा करत नाही.
*आपणच आपल्याला प्रेरणा द्यायला शिकलं पाहिजे.
*स्वभिमान ही एक जाणीव आहे.
* स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल ते करायचं ही कल्पना चुकीची आहे.
*जग जसं आहे तसं आपल्याला दिसत नाही तर ते आपण जसे आहोत तस दिसतं.
*आपल्या विचारातून कृती होते ,कृतीतून सवयी जडतात आणि सवयीतून चारित्र्य घडतं . चारित्र्यातून भवितव्य ठरतं.
* मुख पृष्ठlवरील एक विचार * विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात. 
अगदी शंभर टक्के बरोबर आहे.
     असे असंख्य असंख्य अप्रतिम विचार प्रत्येक पानोपानी लेखकाने पेरले आहेत ते वाचायचे, आपल्या मनात रुजवायचे आणि सगळं जग जिंकून घ्यायचं ...अजून काय हवं माणसाला ...याच साठी तर आयुष्यभर त्याची अव्याहतपणे धडपड सुरू असते.एक अत्यंत सुंदर ,संग्रही ठेवण्यासारखे पुस्तकं ...वाचा आणि जिंका ...
संगीता वाईकर.नागपूर.
🙏 धन्यवाद.

APPLIED ELECTRONICS EJ 3I

 





VIDYA PRATISHTHAN'S 

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

VIRTUAL LIBRARY 

 

APPLIED ELECTRONICS EJ 3I



THERMAL ENGINEERING ME 3I

 



VIDYA PRATISHTHAN'S 

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

VIRTUAL LIBRARY 

 

THERMAL ENGINEERING ME 3I



Thursday, November 18, 2021

*पुस्तकाचे नाव : मराठी रुबाया स्वानुभव हाच सद्गुरू

**वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य**

*पुस्तक क्रमांक : 47.

*पुस्तकाचे नाव : मराठी रुबाया स्वानुभव हाच सद्गुरू

*लेखक : पंडित यशवन्त देव.

*पृष्ठसंख्या : 112.

*स्वागतमूल्य : 100₹.

*प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन, पुणे.

*पुस्तक परिचयकर्ता : श्री. मनोज अग्रवाल.

@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

      पंडित यशवंत देव यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक रुबाया  रचलेले आहेत  .ज्याप्रमाणे संत कबीर यांनी दोहे रचले त्याप्रमाणे पंडित यशवंत देव यांनी रुबाया रचलेले आहेत.  संत कबीर म्हणतात की गुरुविना ज्ञान नाही  स्वत :चा अनुभव हाच आपला सद्गुरू असतो. हा महत्त्वपूर्ण विचार पंडित यशवंत देव यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेला आहे . 

    या पुस्तकाच्या सुरवातीला 'चिंतन' या सत्रामध्ये ,चिंतन या शीर्षकाखाली पंडित यशवंत देव असा विचार मांडतात की आपण जर पोहायचं ठरवल तर पुस्तक वाचून पोहता येत नाही प्रत्यक्ष पोहावच लागतं त्यामुळे स्वत :चा अनुभव हा खरा सद्गुरू ठरतो  स्वानुभव नावाच्या सद्गुरूला भेटायला झाला असा अशी हाक पंडित यशवंत देव वाचकांना करतात .धर्म कोणताही असो ध्यान जो करेल त्याला ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञान ज्याला प्राप्त होईल निश्चितच त्यांचं जीवन पूर्णत बदलून जाईल हा पवित्र विचार पंडित यशवंत  या पुस्तकाच्या माध्यमातून मांडतात.  

      या पुस्तकाला प्रसिद्ध लेखक, संपादक 'कुमार केतकर 'यांनी प्रस्तावना दिलेली आहे. कुमार केतकर म्हणतात कि मन हे नेमके कोठे असते? तर मन प्रश्नातच आहे .जोपर्यंत शरीर जिवंत आहे, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याला मन अप्रत्यक्षरीत्या जाणवतं. मात्र शरीर हे प्रत्यक्षरीत्या दिसतं आणि या मनाला स्थिर करण्यासाठी आपण ध्यान करणे गरजेचे आहे.  ओशोंच्या विचारांची महत्ता देखील कुमार केतकरांनी प्रस्तावाच्या माध्यमातून पटवून दिलेली आहे .

   पंडित यशवंत देव यांनी या पुस्तकात दिलेले रुबाया हे चार चार ओळींचे आहेत आणि त्याचा अर्थ खाली अतिशय विस्तृतपणे स्पष्ट करून सांगितलेला आहे .
 
    एखादी वस्तू आपल्याला आवडते आपल्या मनात ते मिळावे अशी इच्छा उत्पन्न होते. पण वस्तू फार दूरवर असते. तिच्यापर्यंत पोहोचायचं कसं तिच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपल्याला दिसतो आपण पोहोचू शकू असं वाटतं . पण आपण चालायला सुरुवात करत नाही का असं होतं ?आपण भितो जी वस्तू आपल्याला आवडते आहे ती मिळाल्यावर आपल्याला सुख नाही झालं तर या ज्ञानाची भीती आपले पाय जखडून ठेवतात पाय आपले एका स्थानावर ठेवतात  हा विचार खालील रुबायांतून यशवंत देव देतात.

   आकाश मोकळे मला खुणावते आहे 
मज पंख उघडुनी उडून जायचे आहे ।
पिंजराही कधीचा आहे सताड उघडा 
मी कसा घाबरून पंकज मिळतो आहे  ।।

  आपल्याला पलीकडच्या तटाच्या आकर्षण असते ,आपण अलीकडच्या तटावर असतो आणि आपण अलीकडच्या तटावर स्थिरपणे हिंडत असतो हा सुंदर विचार त्यांनी पुढील रुबायांतून मांडलेला आहे . 

  मी पैलतिराचे स्वप्न मनामधी बघतो
 परी ऐलतिरावर घोटाळत मी असतो ।
मी संकल्पविण दुभंगलेला प्राणी 
कधी इथे, कधी तिथे, निरर्थ आदळतो ।। 

    आपल्यापैकी अनेकांची अशी अस्थिर अवस्था असते त्यामुळे आपण ठरवलेले ध्येय आपल्याला निश्चित वेळेत प्राप्त होत नाही. किंवा ते प्राप्त होत नाही, अस अनेकदा घडतं आणि म्हणून ध्येय प्राप्त करायचअसेल तर आपले भाव, विचार, वाणी आपण एकसंध ठेवलं पाहिजे . 

   पंडित यशवंत देव म्हणतात, संसारात खरं मोल कुठल्या गोष्टीला द्यायला हवं हे मला आता चांगल्या रीतीने कळालं आहे त्या महत्त्वपूर्ण गोष्टी हिचा प्रकाश हे मला आता दिसतो आहे, जाणवतो आहे  .मी विचार करत नाही काळ अनंत आहे ना मग झालं त्या महत्त्वपूर्ण मूल्यवान प्रकाशाचा किरण हातातून सुटत नाही ना ?तेव्हा मी पाहीन  हा विचार त्यांनी पुढील रुबायांतून मांडलेला आहे . 

    मज खूण मिळाली खातर झाली पक्की
 मी पिंजऱ्यातून सुटेन हे तर नक्की। 
लागोत कितीही दिवस मोजतो कोण 
दिस आनंतातले अनंत अजून बाकी।।  

   मला आश्चर्य वाटतं की अंधार किती घडत आहे माझ्या एका जन्माची ही कमाई नाही अनेक जन्मा मी त्याच त्याच गोष्टींच्या मोहात पडून निरर्थक पुढे धावलो गोष्टी निरर्थक आहेत हे कळत नाही  , पण निश्चितपणे वळत नाही .हे स्पष्ट करताना ते म्हणतात ,

मज वेढून आहे वेढा सगळीकडचा 
अंधार गडद हा  जमला जन्मांतरीचा।
 आतल्या आत मी वेढ्यातून सुटताना 
मग दिसतो आहे नूर नव्हता  नूर नव्हे  तेजाचा।।

   आपले डोळे उघडणारे हे सर्व रुबाया आहेत.आपल्याला सर्वसमावेशक शिकवण देणारे हे रुबाया आहेत.  

    संगीत क्षेत्र माझ्या पसंतीचे क्षेत्र आहे. त्यात मी रममाण होतो तो माझ्या व्यवसायाचा एक महत्त्वाचा भाग आहे.  प्रत्येक स्वर असतात,  प्रत्येक स्वराशी मी सतत आणि पृथकपणे स्वतःला जोडतो आणि हे जुळणेच मला असीम आनंद देऊन जाते. संगीता तरीही ज्ञानाधिष्ठित आज मला शप्पथ सांगतो. ऊर्जेचा न संपणारा ठेवा बहाल करते आहे.  हे पुढील चार ओळींतून पंडित यशवंत देव अतिशय सुंदर पद्धतीने मांडतात  .

वाहून घेतले आहे संगीताला 
निरखीत राहतो नित्य स्वरारंभाला।
 माझ्यातच आहे गायक आणि श्रोता 
नवनवी निर्मिती ध्यानाश्रित स्वरमाला ।। 
 
 पंडित यशवंत देव यांचं जीवन सुखकर केलं ते त्यांचे गुरू ओशो रजनीश यांनी  असे ते आवर्जून सांगतात.
   
    ओशो रजनीश यांना शेवटचा रुबाया पंडित यशवंत देव यांनी अर्पण केला आहे . 

    ते म्हणतात की 

          प्रिय ओशो !!

मज स्फुरले ते लिहून झाले आहे
 मनी आनंदाचे फूल उमलले आहे। 
मी तुमच्या चरणी अर्पण करतो त्याला
 ही तुमची किमया, तुमची करून आहे ।। 

     वरील ओळींतून पंडित यशवंत देव यांच्या मनात असलेली गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त होताना दिसते.  

     मनाला नवीन स्फूर्ती देणारे रुबाया पंडित यशवंत देव यांनी या पुस्तकामध्ये खूप अप्रतिम रीतीने मांडलेले आहेत आणि त्यांचा अर्थ देखील त्यांनी अतिशय आकलन होईल असा  स्पष्ट केलेला आहे .

  मन :पूर्वक धन्यवाद!.!...!

 ( मनोज अग्रवाल )औरंगाबाद

*पुस्तकाचे नाव : वेगळ्या वाटेने

**वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य**

*पुस्तक क्रमांक : 48.

*पुस्तकाचे नाव : वेगळ्या वाटेने.

*लेखिका : शकुंतला फडणीस.

*पृष्ठसंख्या : 80.

*स्वागतमूल्य : 100.

*प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन ,पुणे.

*आवृत्ती : प्रथमावृत्ती,26.01.2020.

*पुस्तक परिचयकर्ता : श्री. मनोज अग्रवाल.

##############################

    महाराष्ट्र राज्यातील गाजलेल्या व्यक्तींचे व्यक्तिचित्र त्या व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी ची महत्त्वपूर्ण माहिती आणि वेगळ्या वाटेने जाऊन त्यांनी गाजवलेले कर्तृत्व  या बाबींचा ऊहापोह विस्तृतपणे शकुंतला फडणीस यांनी या पुस्तकात केलेला आहे.  

   पुण्यभूषण डॉ. सरदेसाई यांना सदरील पुस्तक लेखिकेने आदरपूर्वक समर्पित केले आहे . मनोगतामध्ये लेखिका स्वत: चे विचार मांडताना व्यक्त होतात .या पुस्तकातील व्यक्तींनी वेगळ्या वाटेने जाऊन स्वतःचं कर्तृत्व गाजवले.लौकिक प्राप्त केला. असंख्य अडचणींना तोंड देऊन त्यांनी  स्वत :च व्यक्तिमत्त्व घडविलं आणि स्वतःच्या कर्तृत्वाचा व्यक्तिमत्त्वाचा न मिटणारा ठसा मागे ठेवून ते गेले.  

   गाजलेले चित्रकार शि. द. फडणीस यांच्याविषयी लेखिकेने एक पाठ लिहिलेला आहे . त्यांन एकच डोक्यात घेतलय हे या पाठाचे नाव आहे . सदरील पुस्तक हे सात पाठांमध्ये विभागण्यात आले आहे.  

१.त्यान एकच डोक्यात घेतलय  

   मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे लहानपणीच शि द फडणीस यांनी स्वत: च्या चित्रकलेची चमक दाखवली आणि पुढे ते प्रसिध्द चित्रकार झाले . फडणीस यांनी विविध चित्रकला स्पर्धांमध्ये भाग घेतला . त्यांचे चित्र मनोहर मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले. हंस मासिकाच्या व्यंग स्पर्धेमध्ये त्यांनी सलग दोनवेळा बक्षीस प्राप्त केले. त्यामुळे  व्यंगचित्रांकडे वळाव असा त्यांना सल्ला देण्यात आला.  त्यांनी अतिशय छान कौशल्याने व्यंगचित्रे हाताळली . ज्याप्रमाणे कवी, लेखक, गीतकार यांना कॉपीराइट्स अधिकार असतो त्याप्रमाणे चित्रकारांनाही हा अधिकार असतो हे अतिशय ठासून शि द फडणीस यांनी सांगितले.  एकदा एक काम मनावर घेतले की शि द फडणीस ते पूर्णत्वास न्यायचे. हे चित्र काढायचं तर ते पूर्ण होईपर्यंत त्यात गुंतून राहायचे.  त्यामुळेच त्यांनी एक शे पंच्याण्णव पानांचं 'रेषाटन' हे आत्मचरित्र लिहून काढलं होतं आणि या पुस्तकाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला व लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार त्यांना प्राप्त झाला .

२.सख्खे शेजारी  

       या प्रकरणामध्ये लेखिकेने द. मा. मिरासदार हे त्यांचे शेजारी होते आणि अनेक वर्षे ते शेजारी होते हे अतिशय छान रीतीने रंगवले  आहे  . लेखिकेला जेव्हा कळालं की त्यांच्या बाजूला मिरासदार आडनावाची व्यक्ती राहायला येणार आहे तेव्हा त्यांना वाटलं की द .मा. मिरासदार यांचे कुणीतरी नातेवाईक असतील पण  जेव्हा कळालं की द .मा. मिरासदार  स्वतः तिथे राहायला येणार आहेत ,शेजारी म्हणून तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही . चित्रकार शि द फडणीस आणि द मा मिरासदार हे कथाकार ,लेखक, साहित्यिक दोन्ही दिग्गज एकमेकांच्या शेजारी अनेक वर्षे राहत होते . द मा मिरासदार यांच्या अठरा पुस्तकांना शि द फडणीस यांनी  मुखपृष्ठ दिले आहे .द मा मिरासदार आणि शि द फडणीस हे सुभाषनगर येथे राहत होते. सुभाषनगर हे नगर अनेक दिग्गजांचे वास्तव्याचे ठिकाण होतं . द मा मिरासदार या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत.  द मा मिरासदार यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. सुभाषनगर येथे राहूनच त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाला उजाळा दिला.

३.पहिली महिला फौजदार  

    महाराष्ट्रातील पहिली महिला फौजदार होण्याचा मान श्रीमती कुसुम देव यांना प्राप्त झाला .  सकाळ वर्तमानपत्रामध्ये फौजदार पदासाठी जाहिरात आली होती आणि कुसुम देव यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की तू प्रयत्न कर. 
       त्यावेळी प्रथम कुसुम आश्चर्यचकित झाल्या .मात्र त्यांनी फॉर्म भरला आणि त्या फौजदार च्या परीक्षेला बसल्यानंतर त्यांना फौजदाराच्या मुलाखतीला बोलावण्यात आलं .त्यांची निवड झाली  .पुढे त्यांनी अतिशय चोखपणे काम बजावल. महाराष्ट्रातील पहिल्या महिला फौजदार जेव्हा ड्युटीला जायच्या तेव्हा त्यांच्याकडे लोक कुतूहलाने बघायचे . पुण्याच्या बुधवार  पेठेतील कुंटणखान्यात अडकलेल्या अनेक मुलींना त्यांनी सोडवल आणि चांगले जीवन जगण्यासाठी प्रवृत्त केलं . तेथे मिरगे नावाची एक वेश्या राहत होती.त्या वेश्येला त्यांनी चांगल्या रीतीने समुपदेशन केलं  मात्र त्या वेळेचा आणि कुसुम देव यांचं पटलं नाही .नंतर कुसुम देव यांची बदली करण्यात आली. काही वर्षांनंतर त्यांना ती वेश्या भेटली आणि त्यावेळेस तिने  वेश्या व्यवसाय सोडला होता आणि आकाशवाणीवर तिचा भजनाचा कार्यक्रम होणार होता .त्यावेळी कुसुमदेव यांना आश्चर्य वाटलं की एवढपरिवर्तन एका व्यक्तीच्या  आयुष्यात होऊ शकतं . कुसुम देव यांचा ड्युटी फस्ट
 नावाच पुस्तकदेखील उत्कर्ष प्रकाशनाने प्रकाशित केले होते. त्यामध्ये त्यांच्या जीवनात घडलेल्या अनेक घटनांचे वर्णन त्यांनी केलेले आहे.  

४.संशोधन क्षेत्रातील खणखणीत नाणे

       मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातील एक साधी मुलगी ज्यांनी बीए पास केले. नंतर त्यांचं लग्न झालं आणि त्या म्हणजे डॉ शोभना गोखले .लग्न झाल्यानंतर पतीस विचारले की आता मी पुढे शिकू शकते का त्यांच्या पतींनी त्यांना होकार दिला आणि पुढे त्यांनी शिक्षण सुरू केले. त्यांनी खूप शिक्षण घेतले  यशस्वी लेखिका झाल्या. इतिहासकार झाल्या आणि अनेक संस्थांनी देशाविदेशातील संस्थांनी त्यांना पुरस्कार दिले. सन्मान केला . विदेशातील विविध  विद्यापीठामध्ये त्यांनी व्याख्याने दिली.  इतिहासाच्या थोर संशोधक म्हणून त्या सन्मानित करण्यात आल्या . शिलालेखांचा चिकित्सक अभ्यास करणे यामध्ये त्या रममाण व्हायच्या. 'ललाटलेख 'हे आत्मचरित्र त्यांचे प्रसिद्ध झालेले आहे. प्रकाशित झालेले आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या सर्व आठवणी अतिशय छान रीतीने मांडलेल्या आहेत.

५.रेषावतारी  

      या पाठांमध्ये लेखिकेने वसंत सरवटे या प्रयोगशील चित्रकार बद्दल विस्तृतपणे माहिती दिलेली आहे.  पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच पुस्तकात नेमके काय लिहिलेले आहे हे वाचकाला समजले पाहिजे हा महत्त्वपूर्ण विचार मनाशी बाळगून त्यांनी आयुष्यभर चित्र काढले .  त्यामुळे त्यांचं वेगळेपण त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये दिसून आले.
आपले चित्र अधिकाधिक प्रभावी असले पाहिजे यासाठी ते अधिकाधिक झटायचे, खूप मेहनत घ्यायचे आणि अधिक प्रयत्नशील असायचे . खूप प्रसिद्धी प्राप्त झाल्यानंतर देखील ते नम्र हाेते .सरवटे हे डिझाइन इंजिनीअर होते.  सरवटे यांच्या जगण्याच्या सगळ्या अतिशय साधारण होत्या .त्यांचे खाण्या पिण्याच्या सवयी देखील अतिशय साधारण होत्या . चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

६.कलंदर कवी  
  
      थोर गझलसम्राट सुरेश भट यांच्याविषयी या पाठांमध्ये माहिती दिलेली आहे . एकदा एका मैफलीमध्ये गेलेले असताना सर्वांची भाषणं झाली . कंटाळवाणे वाटत होते. जेव्हा सुरेश भट यांच्या गजला ऐकायला सुरुवात झाली , तेव्हा सर्वजण थांबले आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे सुरेश भट यांच्या गजलेला दाद दिली . मंगेशकर कुटुंबीयांशी सुरेश भट यांच्या खुप जवळचे संबंध होते . हृदयनाथ मंगेशकर हे त्यांचे मित्र होते लता मंगेशकर, आशा मंगेशकर ,आशा भोसले उषा भोसले यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते.  सुरेश भट हे कलंदर कवी होते असा उल्लेख लेखिका या पाठांमध्ये करतात.  त्यांच्या गझली लता मंगेशकर यांनी गायील्या. हे सुरेश भट यांचा महानपण होय . सुरेश भट यांना तंबाखू खाण्याची सवय होती  सुरेश भट यांचा अनोखेपण म्हणजेच त्यांच्या गजला होत.
त्यांच्या बहिणीची मैत्रीण पुष्पा मेहेंदळे यांच्याशी सुरेश भट यांचा विवाह झाला.

7.हसता हसता पन्नास वर्षे

       हरीशचंद्र लचके हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार होत. त्यांचं पहिलं व्यंगचित्र जेव्हा वर्तमानपत्रात 
छापून आले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. हसा आणि लठ्ठ व्हा, हसा आणि हसवा, गुदगुल्या ही त्यांची हस्यचित्रांची पुस्तके लोकप्रिय आहेत. ते आद्य व्यंगचित्रकार म्हणून लोकप्रिय झाले आहेत. त्यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या काळात लोकशक्ती मध्ये व्यंगचित्रकार म्हणून कार्य केले आहे.

    रुळलेली चाकोरी सोडून वेगळ्या वाटेने प्रवास करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींचा परिचय अतिशय सुरेख शैलीत लेखिकेने करून
दिला आहे.या सर्व व्यक्ती आपल्यासाठी प्रेरक आहेत.

   आपल्या पुस्तक संग्रहात असावे असे एक प्रेरणादायी पुस्तक म्हणजे 'वेगळ्या वाटेने'!!

   धन्यवाद !!.....श्री. मनोज अग्रवाल.(औरंगाबाद)

*पुस्तकाचे नाव : पाचव्या बोटावर सत्य.

**वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य**

*पुस्तक क्रमांक : 49.

*पुस्तकाचे नाव : पाचव्या बोटावर सत्य.

*वाङमय प्रकार : काव्यसंग्रह.

*कवी               : उत्तम कांबळे.

*पृष्ठसंख्या         : 118.

*स्वागतमूल्य    : 80 रुपये.

*प्रकाशन        : पदमगंधा          

                      प्रकाशन.

*आवृत्ती         :प्रथमावृत्ती
                     (2010).

*पुस्तक परिचयकर्ता : श्री. मनोज 
                            अग्रवाल.

📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙

    मराठी साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे यांनी लिहिलेला 'पाचव्या बोटावर सत्य' हा काव्यसंग्रह म्हणजेच प्रश्न आणि उत्तर स्वरुपातील कवितांचा  संग्रह आहे . या कवितासंग्रहातील कवितांमध्ये कवी स्वतःलाच प्रश्न विचारतात आणि स्वतःच  मार्मिक समर्पक आणि अप्रतिम असं उत्तर देतात
  

    जे नैसर्गिक आहे त्याला आपण नाकारू शकत नाही हा विचार वाचकाच्या मनात ठसविण्यासाठी उत्तम कांबळे यांनी हा कवितासंग्रह निसर्गाला अर्पण केलेला आहे  कवी म्हणतात .

निसर्गानं सांगितलेलं 
निसर्गानं दाखवलेलं
 पाचव्या बोटावरच हे सत्य 
निसर्गासाठी अर्पण...

    प्राध्यापक रा .ग .जाधव यांनी या कवितासंग्रहाला प्रस्तावना दिलेली आहे.  महाभारतामध्ये ज्याप्रमाणे युधिष्ठिराला यक्ष हा प्रश्न विचारतो आणि युधिष्ठिर त्याच्या अद्वितीय असं उत्तर देतो अशाच प्रकारे हा प्रश्नोत्तर स्वरुपातील कवितासंग्रह आहे. 

  लाओ त्से या चिनी तत्त्वज्ञाचा उल्लेख या कवितासंग्रहाच्या मनोगतात उत्तम कांबळे करतात.. लाओ त्से हे गौतम बुद्धांच्या अगोदर झाले हाेते . तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांवर तत्त्वज्ञानावर लाओ त्से यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडलेला दिसून येतो असा विचार उत्तम कांबळे मनोगतामध्ये व्यक्त करतात.  
 
   एकूण 97 कवितांचा हा कवितासंग्रह वाचकाला वाचताना सोडवासा वाटत नाही ,वाचून पूर्ण झाल्यानंतरच वाचक या कवितासंग्रहाला  बाजूला ठेवतो  .
     माणूस राबराब राबतो त्याचा घाम येईपर्यंत तो कष्ट करत असतो 'सुगंध 'या कवितेमध्ये कवींनी प्रश्न विचारलेला आहे आणि उत्तरही अतिशय सुंदर रीतीने दिलेला आहे . 

   तो म्हणाला ,
"जगात सर्वात सुंदर सुगंध कोणता?",
 मी म्हणालो ,"
घामासाठी वाट करेन मी!"  

   कष्टानंतर घामाचा येणारा सुगंध  जगातील सर्वात श्रेष्ठ, उत्कृष्ट सुगंध आहे असा उच्चकोटीचा विचार उत्तम कांबळे येथे व्यक्त करतात .

   आपल्याला असं वाटतं की आपण स्वत: ला कधी फसवत नाही. मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने कुठेतरी आपण आपली फसवणूक करून घेत असतो, अस अनेकांच्या आयुष्यामध्ये घडत, हा विचार फसवणूक या कवितेमध्ये कवी  उद्धृत करतात.  

त्यानं विचारलं,
"जगात सगळ्यात वाईट फसवणूक कोणती?"
 मी सांगितलं,
" स्वत :ला कधी फसवत नाही मी !" 

   खऱ्या अर्थानं स्वत: ला बुद्धिवादी ,बुद्धिजीवी समजून आपण स्वत :ला कधीच फसवत नाही असा विचार मांडणं हेदेखील आपली एक फसवणूक आहे हा विचार कवी व्यक्त करतात.  

   कोंबडी आधी की अंडं आधी? हा अनेकांसाठी अनुत्तरित असलेला प्रश्न आहे आणि  रहस्यमय प्रश्न आहे. यावर कवींनी कविता करताना अतिशय अप्रतिम असा विचार मांडलेला आहे  .
 
त्यानं विचारलं," कोंबडी आधी की अंडं आधी ?या सनातन प्रश्नाचं उत्तर काय ?"
मी सांगितलं ,"फळात झाड आणि झाडात फळ पाहतोय मी."

   फळामध्ये असणाऱ्या बीपासून झाड बनतं आणि झाडाला फळे लगडतात .नंतर त्या फळांपासून परत झाड बनतं. मग हा प्रश्न  गूढगम्य आहे की आधी कोंबडी की आधी अंडं?  हा विचार येथे कवीला मांडायचा आहे.

     कधी कधी माणसाला आयुष्यामध्ये एवढा आनंद होतो की तो आनंद  शब्दात देखील व्यक्त करु शकत नाही. मग अशावेळी काय तर 'शब्दांचे मृत्यू' या कवितेच्या माध्यमातून कवी हा आनंद  शब्दांत  व्यक्त होईल याचा ते प्रयत्न करतात  .

   त्यानं विचारलं ,
"तुला प्रचंड आनंद होतो तेव्हा नेमकं काय करतो."
 मी सांगितलं,
" शब्दांच्या निधनाबद्धल शोक करतोय मी !"

    म्हणजेच आनंद ही भावना एवढी अमूर्त असते त्यासाठी शब्द हे भाषेमध्ये शब्द मृत्यू पावलेल्या आहेत आणि त्यांच्या निधनाबद्दल मला दु:ख झाले आहे  असा विचार कवी येथे मांडतात. 

    आईचं महात्म्य शब्दांमध्ये व्यक्त करता येण्यासारखं नसतं ते शब्दांच्याही पल्याड असतं.हा विचार आपल्या मातृमहात्म्य या कवितेतून प्रकट करताना  उत्तम कांबळे म्हणतात ,

      त्यानं विचारलं ,
"आईचं महात्म्य कोणत्या शब्दांत व्यक्त करत असतो?"
 मी सांगितलं ,
"नव्या लिपीचा शोध घेतोय मी"  

     आईचं महात्म्य, आईचं महानपण आपल्या शब्दांच्याही पलीकडच असतं.ते शब्दामध्ये मावेल एवढ संकुचित नसते मुळी!  

    आज आपण आहोत, कदाचित उद्या आपण नसू .आपण आज आहे उद्या नाही .मात्र हे जग कालही होतं, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. या जगाचे आयुष्य किती आहे असा प्रश्न  कवीच्या मनात येतो आणि कवी मग त्याला अतिशय सुंदर शब्द साज चढवून उत्तर देतात . 

      त्यानं विचारलं ,
"आपण राहतो ते जग आणखी किती वर्षे टिकेल?' 
मी सांगितल, "काळजातली स्पंदन मोजतोय मी."
 

    काळजामुळे धडधडणार्या हृदयाची स्पंदने थांबली की आपलं जग थांबेल म्हणजेच आपलं आयुष्य थांबेल इतरांचं आयुष्य, हे जग चालूच राहील.  

   खरं म्हणजे धर्म हा माणसाच्या विकासासाठी आहे. मात्र धर्मा धर्मामध्ये भेदाभेद निर्माण करून युद्ध निर्माण करण्याची धर्म कंटकांचे समाजकंटकांची उठाठेव चालू असते  आणि मग 'धर्माच्या पाऊलखुणा' या कवितेमध्ये कवी स्वत: ला एक प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नाचं उत्तरही त्या अतिशय छान रीतीने देतात  .

    त्यानं विचारलं,
" जगभरातल्या धर्मांच्या पाऊलखुणा पाहतोस का कधी तो?"
 मी सांगितलं ,
"काट्यापासून स्वत:ला वाचवतोय मी."

    समाजामध्ये अनेक माणसं विश्वासघात करणारे असतात विश्वासघात केल्यानंतर आपण नेमकं कसं वागायचं हे 'विश्वास' या कवितेतून उत्तम कांबळे अतिशय अप्रतिम रीतीने व्यक्त करतात .

      तो म्हणाला ,
"एखाद्याने विश्वासघात केल्यास प्रत्युत्तर कसे देशील तू ?"
मी म्हणालो," स्वत :वरचा विश्वास वाढवतोय मी!"  

     आज ज्ञानार्जन करणाऱ्या शिक्षकांची टंचाई आहे हा विचार 'शिक्षक' या कवितेतून कवी उत्तम कांबळे मांडतात,  

    त्यानं विचारलं ,"
भरभरून ज्ञान देणाऱ्या शिक्षकाचा कसा सत्कार करशील?" 
मी सांगितलं ,"ज्ञानार्जन करणारा शिक्षक शोधतोय मी!"  

  जगामध्ये काळ्या रंगाची अवहेलना होते मात्र काळा रंग हा महान आहे. हा विचार 'काळा रंग' या कवितेच्या माध्यमातून कवींनी वाचकांच्या मनावर बिंबवलेलं आहे. 

   त्यानं विचारलं,

" गोरा रंग सुंदर असतो हे अमान्य का करतो?"
 मी सांगितलं ,
"काळ्याच्या  गर्भातील सात रंग जपतो मी!"  

    पांढऱ्या रंगामध्ये सर्व रंग समाविष्ट होत असले तरीसुद्धा काळा रंग हा पार्श्वभूमी घेऊन जेव्हा इतर रंगांना उजाळा देतो तेव्हा इतर रंग किती सुंदर दिसतात त्या काळ्या रंगावर ! 

    खरं म्हणजे या निसर्गाचे आपण आभार मानायला हवेत निसर्गानं भरपूर दिलेले आहे. भरभरून दिलेलं आहे. वानवा ठेवलेली नाही आणि म्हणून निसर्गाचे आभार मानण्यासाठी कवी' निसर्ग' ही कविता करतात.  

   त्यानं विचारलं,
" वाट वगळता सर्वकाही देणार्या निसर्गाविषयी काय सांगशील?"  मी सांगितलं ,
" निसर्गाचे आभार मानतोय मी?" 

    साऱ्या जगाचा सत्ताधीश  झालो तर मी काय करेन तर समतेची विजय मी पेरण्याचा प्रयत्न करेन .विषमतेची रुजलेली बीजे संपवण्याचा मी प्रयत्न करेन असा उच्चकोटीचा विचार कवींनी  'सत्ता' या कवितेतून मांडलेला आहे.

     तो म्हणाला,
" साऱ्या जगाचा सत्ताधीश झाल्यावर काय करशील?" 
मी म्हणालो ,"विषमतेची पेरणी नाकारतोय मी!"

     मी सत्ताधीश झालो तर मला सर्वसमावेशक 'समता'अपेक्षित आहे हा अमूल्य विचार कवी या कवितेत मांडतात  .

     एकंदरीतपणे प्रश्नोत्तररूपी असलेला हा कवितासंग्रह वाचकाला मनास भावल्याशिवाय राहत नाही.कवींचे विचार मनाला पटतात आणि निश्चितपणे एक नवीन  अद्वितीय शिकवण या कवितासंग्रहातून वाचकाला प्राप्त होते .

   या काव्यसंग्रहात इतरही अनेक सुंदर कविता आहेत. 

   * श्रद्धांजली 
*बुद्ध 
*कलयुग सत्ययुग
* प्राणी 
*जगप्रवास 
*वस्त्रसंस्कृती 
*कृतज्ञता 
*धर्माच्या पाऊलखुणा 
*श्वासाचीभाषा 
* पाप 
*शिक्षा 
*मेंदू 
*सांगाडा 
*संस्कार 
*ज्ञानवाटा 
*निसर्ग 
* चुंबन
* वर्तमान 
*तत्त्वज्ञान 
*रडणे 
* आत्महत्या 
*दंगली  
*लोकशाही 
*सुरक्षित जागा 
*यंत्रमानव 
*मादी 
* महायुद्ध 
*जगणं
* वटवाघूळ 
*अमृत 
* संसार 
*पुनर्जन्म 
*प्रेम   
*काळ 
*प्रेमभंग 
*पोकळी 
*रात्र 
* शहाणे 
*वाट 
*झाड 
*हस्तरेषा 
*शोकगीत  

    या पुस्तकाच्या मलपृष्ठावर ताओवादाविषयी सांगितलेले
 आहे .ताओवाद निसर्गाशी नातं सांगणारा विचार होय. निसर्गापासून दूर जाणं म्हणजे संकटाच्या गावात जाणं आणि निसर्गाच्या हातात हात घालणं म्हणजे सुरक्षित आणि सुंदर जगणं आहे . निसर्गाच अद्वितीय महात्म्य ,महानपण या तत्वज्ञानाने जगाला स्पष्ट करून सांगितलेले आहे.  

    आपल्या पुस्तकांच्या संग्रही असावे असे एक उत्तम  पुस्तक म्हणजेच 'पाचव्या बोटावर सत्य'  

     मन :पूर्वक धन्यवाद!.....

  श्री. मनोज  अग्रवाल.(औरंगाबाद)

*पुस्तकाचे नाव : स्वप्नमेणा

*वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य*

*पुस्तक क्रमांक : 51.

*पुस्तकाचे नाव : स्वप्नमेणा.

*वाङमय प्रकार : काव्यसंग्रह(गझलसंग्रह).

*कवीचे नाव : प्रदीप निफाडकर.

*प्रकाशन संस्था : राजा प्रकाशन.

*पृष्ठसंख्या :  54.

*स्वागतमूल्य : 70 रुपये.

पुस्तक परिचयकर्ता : श्री. मनोज अग्रवाल.
 
      मराठी  गझलकार म्हणून ज्यांचा लौकिक मराठी साहित्य जगतात झालेला आहे असे 'प्रदीप निफाडकर' यांच्या 'स्वप्नमेणा' हा काव्यसंग्रह गझलसंग्रह  वाचला . कवी म्हणतात की या कथासंग्रहाला प्रस्तावना नाही कारण कोण काय म्हणते यापेक्षा वाचक रसिक काय म्हणतात हे ऐकणे मला पसंत पडते असा त्यांचा विचार आहे . वाचणार्या सर्वांनाच ,त्याचप्रमाणे मोठ्या साहित्यिकांना त्यांनी हा कवितासंग्रह अर्पण केलेला आहे . 

     या पुस्तकामध्ये सुरवातीलाच सुरेश भट या थोर गझल सम्राट सम्राटांचे , शिवाजी सावंत या महान साहित्यिकाचे पत्र जे आशीर्वादपर पत्र आहेत  या पत्रांचा समावेश या पुस्तकात करण्यात आलेला आहे.  

    एकूण 54 गझल यामध्ये अंतर्भूत आहेत. प्रत्येक गझल हे वाचनीय ,श्रवणीय आणि सुंदर असे आहे.

       'स्वप्नमेणा ' ही पहिलीच गझल कवींनी अतिशय अलंकारिक पध्दतीने लिहिलेली आहे . 'मंजूघोषा' या वृत्तामध्ये लिहिलेली ही गझल वाचनीय आहे.  

    हे तुझे आले फुलांचे शहर बाई स्वप्नमेण्यातून खाली उतर बाई

 दृष्ट घे काढून डोळ्यांनीच माझ्या चांगली नाही जगाची नजर बाई  

   कवीची उच्चकोटीची कल्पकता, भावोत्कटता या गझलमधून निदर्शनास येते.  स्वत: च्या डोळ्यांनी दृष्ट काढून घे असा सल्ला कवी येथे देतो . 

    आता माझ्या आश्रयाला कुणी नाही आणि  आश्रय घ्यावा असेही कुणी नाही असा विचार तडा या गझलेमध्ये कवी देतात.  

    कुठे सोडून जाऊ पिंजऱ्याला? नभी जागाच नाही आसऱ्याला!

 दिलासा का दिला या वादळाने? कळेना काय झाले भोवऱ्याला ! 

    काय झाले हे कळेनासे झाले आहे आणि म्हणूनच नवी जागा नाही आश्रय घेण्यासाठी असा उत्तुंग कोटींचं विचार कवी येथे मांडतात . 

    सर्जनशीलतेचा एक उत्तम नमुना म्हणून पुन्हा या गझलेमधे कवी अतिशय छान रीतीने संत महात्म्यांना उद्देशून त्याचप्रमाणे संत   महानपण या गझलेतून कवी व्यक्त करतात.  

    पालखी आणू नका दारात माझ्या
 संत सारे नांदती देहात माझ्या

 नामदेवाने पुन्हा शतकोटींसाठी प्राण आता ओतला शब्दांत माझ्या 

सावता आणून देतो रोज भाजी जेवतो  संसार हा ताटात माझ्या  

    सावतामाळी त्याचप्रमाणे विविध संत यांचा उल्लेख या गझलेमध्ये कवीने करून संतांचे
 महानपण स्पष्ट केलेले आहे.

  मरण्यापेक्षा जगण्याचे मला अधिक भय वाटत आहे असा विचार कवी भय गझलीतून व्यक्त करतात.

     तू माझा स्वर तू माझी लय 
तू माझ्या गीतांचा आशय 

कसली कळ काळजात उठली!
 ही कोणाची तीच जुनी सय

ये मरणा ये रे ये मरणा
 मज वाटे या जगण्याचे भय !

 

    पादाकुलक या वृत्तामध्ये या कवीने गजलबद्ध केले आहे . जगण्याने एवढे छळले की आता जगण्याचे भय वाटत आहे आणि मरणाचे आता भय वाटत नाही, भीती वाटत नाही असा विचार कवी या गझलेत व्यक्त करतात. 

    'किरणे' ही गझल वाचताना खूप आनंद वाटतो  ही जिंदगी नेमकी कशी आहे आणि कशा प्रकारची कल्पना आपण केली होती, नेमके घडले काय हा विचार येथे कवी व्यक्त करतात.  

     सजवून ठेवलेली मी काल जिंदगी ही
 आज पाहतो मी कंगाल जिंदगी ही
 इतकाच सांत्वनाचं तेव्हा निरोप होता 
माझ्या विनाच आता घडवाल जिंदगी ही 

    मी विचार केला होता की जिंदगी मी सजवली आहे मात्र खऱ्या अर्थानं ही जिंदगी मला कंगाल करून सोडते या आशयाचे मत  येथे कवी व्यक्त करतात.  

    'करार' या गझलेमध्ये कवी म्हणतात की मी नको तो प्रकार केला आणि या जगाचा मी माझ्यापेक्षा अधिक विचार केला.  

    जो नको तो प्रकार मी केला 
या जगाचा विचार मी केला

 वेदनादायी अजून थोडीशी 
शब्द माझा तयार मी केला 

मी स्मितानेचं मारले अश्रू
 हुंदका हद्दपार मी केला

पाहिले एकदाच स्वप्न तुझे   
एक सौदा उधार मी केला  

    मी तुझे स्वप्ना एकदाच पाहिले आणि हा जो सौदा होता तो मी उधार केला.  

   माझ्या हातावर माझा विश्वास आहे आणि मी जगाची भलाई पाहतो आहे. जगाची भलाई मी मनामध्ये ठरवतो आहे .

    ही पुन्हा झाली सुरू माझी लढाई 
घाव घालण्यास आले जातभाई

आहे माझ्या हातावर माझा भरोसा 
मी जगाची पाहिली आहे  भलाई  

   माझ्या मनामध्ये जगाबद्दल चांगलाच विचार आहे आणि हा चांगलाच विचार मी शेवटपर्यंत मनामध्ये असू देणार आहे .

    पेच या गझलेमधे अनपेक्षित असा पेच निर्माण झाला असं कवी वर्णन करतात . 

   शेवटी जे नको तेच झाले 
गीतं माझे तुझी ठेच झाले 

हासणेही तुझे व्यर्थ होते 
बोलणे हे रिकामेच झाले 

काय माझे भले बुरेही 
 व्हायचे ते तुझ्यानेच झाले 

मी इथे ,तू तिथे ,दूर स्वप्ने 
जीवनाचे किती पेच झाले?

   आपले जीवन हे पेचमय आहे असा एक अनोखा विचार कवी या गझलेतून मांडतात . 

   माझ्या जीवनामध्ये दु :खाचा अंधार होता आणि मग हा जा अंधार जाळून टाकण्यासाठी मी स्वत: ला जाळून घेतले आणि स्वत: च्या जळण्याची मशाल बनवली हा एक मनाला हेलावून टाकणारा विचार  'मशाल 'या गझलेतून मांडतात . 

    अर्थात सारे जरी मागचे टाळले बोलता बोलता देह गंधाळले 

 अंधार मी घेतला सोबती अन् मशालीपरी मी मला जाळले ! 

   म्हणजेच माझ्या जीवनातला अंधार मिटविण्यासाठी मी स्वत: ला जाळून घेतले व मशाल बनविले .

    अशाच रीतीने विविध सुंदर गझली या गझलसंग्रहामध्ये आहेत  

   *स्वप्न
* ओलावा 
*खुलेआम 
*कवाळे 
*श्रावण
* जर ऐकायचे होते
*  उजाळा 
*तो तिथे इथे मी 
*रंग
* गुंता 
*नेहमी घडते असे
* पूर 
*शुभेच्छा  
*कारखाना
* मुक्ती 
*लिहीत गेलो 
*केव्हा 
*मोताद 
*ललाट 
*आरसा 
*सामसूम
* ठेव 
*शोधात
* देवाला 
*धरसोड 
*संपदा 
*शेवटी 
*आरती
* फुले  
*स्वागत 
* कुठे 
*कवी 
*भूपाळी 
*स्वदेशी 
*ओळी 
*तुझ्याविना  

   कवींनी मराठीमध्ये गझल हा प्रकार रुजवण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे .त्यांच्या सर्वच गझला या गाजलेल्या गझला आहेत .म्हणून त्यांचा हा गझलसंग्रह आपल्या  आपल्या पुस्तकांच्या संग्रही असावा असा एक सुंदर गझलसंग्रह म्हणजेच स्वप्नमेणा होय.  

   या महान गझलकारास मानाचा मुजरा!!
   
खूप खूप धन्यवाद....( श्री. मनोज  अग्रवाल औरंगाबाद)

पुस्तकाचे नाव : पु. ल.आणि मी.

*वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य*

  *पुस्तक क्रमांक : 52.

*पुस्तकाचे नाव  : पु. ल.आणि मी.

*लेखक : ना. धो. महानोर.

*पृष्ठसंख्या : 95.

*स्वागतमूल्य : 100 ₹.

*प्रकाशन संस्था : समकालीन प्रकाशन.

*पुस्तक परिचयकर्ता : श्री. मनोज अग्रवाल.

    या पुस्तकामध्ये रानकवी महानोर यांनी पु.ल
देशपांडे यांच्यासोबत व्यतीत केलेले क्षण वर्णन केलेले आहे .रानकवी ना .धों .महानोर हे पू .ल. देशपांडे यांचे लाडके कवी होते असा विचार या पुस्तकातून व्यक्त झालेला आहे .
ना धों महानोर यांच्या गावी पळसखेड या गावी पु ल देशपांडे यांची झालेली भेट, त्या भेटीची क्षणचित्रे या पुस्तकात अंतर्भूत करण्यात आलेली आहेत .पु लं देशपांडे यांनी ना धों महानोर यांना लिहिलेली अविस्मरणीय पत्रेदेखील या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत  .तसेच पु. ल. देशपांडे यांच्या सुविद्य पत्नी लेखिका सुनीताबाई देशपांडे यांनी ना धों महानोर यांना पाठविलेली पत्रे त्यांच्यात घडलेला संवाद देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे .पु .ल .देशपांडे पंचत्वात विलीन झाल्यानंतर अनेकांनी ना. धों महानोर यांना आग्रह केला की त्यांनी पूलं देशपांडे यांच्याबरोबर व्यतित केलेल्या  क्षणांना  लेखी स्वरूप द्यावं .पुलं आणि मी या पुस्तकाच्या माध्यमातून हे शक्य झालं .
     पु. ल.देशपांडे यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा जून महिना होता आणि ना.धों. महानोर हे पेरणीच्या कामाला लागलेले होते  .पेरणीचे काम सोडून ना. धों .महानोर पुण्याला गेले तेथे त्यांनी सुनीताबाई देशपांडे यांची भेट घेतली तेव्हा पुल यांचा शांत पडलेला देह बघून ना धों महानोर  यांना त्यांची खूप आठवण येत होती.  त्यांच्याबरोबर व्यतित केलेल्या प्रत्येक क्षण त्यांना आठवत होता. याचं वर्णन ना. धों. महानोर यांनी या पुस्तकात केलेलेआहे.  सुनीताबाई देशपांडे म्हणाल्या की पु ल देशपांडे हे भरभरून जगले त्यांना जे जे हवं होतं ,त्यांनी प्राप्त केले. त्यांना जे सूचत गेलं त्यांनी ते लिहिलं.  
    ना. धों. महानोर म्हणतात की कवितेचे धाग्यामुळे पुलं आणि मी जोडले गेलो .त्याचप्रमाणे सुनीताताई आणि मी जोडले गेलो  .जेव्हा ना धों महानोर यांचे पुस्तक प्रकाशित व्हायचे, तेव्हा ते पु ल देशपांडे यांना ते पुस्तक भेट म्हणून पाठवायचे आणि पुल देशपांडे पत्राच्या स्वरुपात त्यांना आशिर्वादपर शुभेच्छा द्यायचे .
    देशपांडे यांनी  पळसखेडा गावी दिलेली भेट, त्या भेटीदरम्यान घडलेली संवाद त्याचप्रमाणे त्या भेटीदरम्यान घडलेल्या सर्व आठवणींना येथे ना धों महानोर यांनी उजाळा दिला आहे .
    या दोन दिग्गज साहित्यिकांना विनम्र अभिवादन .उदयोन्मुख साहित्यिकांना प्रेरणादायी ठरावा असे हे पुस्तक आहे .
     पु ल देशपांडे यांच्या वागण्या बोलण्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गर्वचा लेश नव्हता असा विचार येथे ना धों महानोर मांडतात . पळसखेड  या गावात माझ्या घरी जेव्हा  आले तेव्हा त्यांनी खाली बसून जेवण केल. त्याचप्रमाणे त्यांनी अतिशय अनौपचारिकपणे गप्पा मारल्या. शेतात त्यांनी भटकंती केली. शेत बघितले. शेत बघून ते खुप आनंदी झाले.
   मन: पूर्वक धन्यवाद.

( श्री मनोज अग्रवाल औरंगाबाद)

पुस्तकाचे नाव : टीचर (तिच्या वेगळ्या प्रयोगाची रोचक कहाणी).

*वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य*

*पुस्तक क्रमांक :50.

*पुस्तकाचे नाव : टीचर (तिच्या वेगळ्या प्रयोगाची रोचक कहाणी).

*लेखिका : सिल्व्हिया ऍष्टन-वॉर्नर.

*अनुवादक : अरुण ठाकूर.

*प्रकाशन :मनोविकास प्रकाशन.

*पृष्ठसंख्या : 179.

*स्वागतमूल्य : 150 रुपये.

*आवृत्ती : पाचवी आवृत्ती (2008).

*पुस्तक परिचयकर्ता : श्री. मनोज अग्रवाल.

##############################

   महाराष्ट्र शासनाच्या लोकचेतना अभियान या अभियानादरम्यान कार्य करत असताना 2011 साली हे पुस्तक भेट स्वरूपात मला प्राप्त झालं . हे पुस्तक मी अनेकदा वाचल आहे आणि या पुस्तकांतील आशय नीट समजून घेऊन पुस्तकात केलेल्या प्रयोगाचा मी अध्यापन पद्धतीत प्रयोग करण्याचा  प्रयत्न केलेला आहे . 

     शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणारे अनेक जण चाकोरीच्या बाहेर जाऊन शिकवतात, विद्यार्थ्यांना घडवतात ,त्यांचं भविष्य उज्ज्वल बनवतात विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी शिक्षकांसाठी शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींसाठी हे पुस्तक म्हणजे एक दीपस्तंभ आहे असं मी समजतो . 
      मानवजात प्रगत व्हावी यासाठी समाजातील काही जण प्रयत्न करतात ,धडपडतात ,कष्ट करत असतात . नंतर हीच माणसे जगामध्ये बहुसंख्य लोकांसाठी प्रेरक ठरतात, आदर्श ठरतात . अशाच एका मागासलेल्या देशातील मागास समाजामध्ये शिक्षणाचे आदर्श नवीन प्रयोग करणार्या एका शिक्षिकेची  ही कथा आहे.  
     पु.ग. वैद्य यांनी या पुस्तकाला प्रदीर्घ अशी प्रस्तावना अतिशय आशयघन पध्दतीने छान शब्द  शब्द गुंफण करून लिहिलेली आहे.  शब्दांमध्ये ज्याप्रमाणे माणसांना घायाळ करण्याची ताकद असते त्याप्रमाणे त्यांना उभारी प्रोत्साहन देण्याची शक्ती देखील असते .म्हणून सिल्व्हिया या शिक्षिकेचा भर अधिकाधिक संवाद करण्यावर असायचा  असा महत्त्वपूर्ण उल्लेख प्रस्तावनेमध्ये वैद्य सरांनी केलेला आहे . इतरांच्या गुणांना ग्रहण करणे हा एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व पैलू असतो. गुणग्राहकता व्यक्तिमत्त्वाचा एक आवश्यक पैलू आहे आणि हा पैलू असणारी माणसं जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी  ठरतात.

    सात वर्षांनी या शीर्षकाअंतर्गत सिल्विया अॅष्टन वॉर्नर यांनी मनोगत व्यक्त केलेले आहे.  या मनोगतामध्ये ते म्हणतात की मी चाकोरीबाह्य अशा विविध  प्रयोग  माझ्या शाळेमध्ये केले.   उदाहरणार्थ मुलांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर काही शिक्षा टाळ्या वाजवतात .काही शिक्षक त्यांना प्रश्न विचारतात. मात्र या शिक्षिकेने  स्वरलहरींचे सुरावट विद्यार्थ्यांना ऐकवली आणि विद्यार्थ्यांचं लक्ष  शिक्षिकेकडे वेधलं गेलं आणि त्यांनी सांगितले की जेव्हा मी हे सुरावट तुम्हाला ऐकवेल तेव्हा तुम्ही जे काही करत असाल  ते सर्व सोडून माझ्याकडे लक्ष द्यायचं .
    विद्यार्थ्यांचा विकास नेमका कसा होतो हे सर्वंकष रीतीने एका छोट्याशा कवितेच्या माध्यमातून सिल्विया अॅष्टन वॉर्नर रचतात . 
    लिहिणारी बोटे पुढे सरकतात, लिहीत लिहीत पुढे जातात ,तुमचे सहानुभूती व चातुर्य त्यांना अर्ध्या ओळीवर थांबवू शकत नाही. तुमचे सगळे असून त्याचा एक शब्दही बोलू शकत नाहीत . 
    एवढ्या प्रगल्भतेने या महान शिक्षिकेने त्यांचे विचार व्यक्त केलेले आहेत.  
     एकूण 21 प्रकरणांमध्ये हे पुस्तक विभागण्यात आला आहे  

१.सेतू बांधा रे सागरी  

   या प्रकरणामध्ये 'सहज वाचन' पद्धती ही किती उपयुक्त आणि विद्यार्थ्यांच्या वाचन विकासामध्ये महत्त्वपूर्ण ठरते याचा उहापोह लेखिकेने विस्तृतपणे केलेला आहे. त्यांनी   सहज वाचन पद्धती चा उपयोग करताना केलेल्या विविध प्रकारचे प्रयोग या पाठांमध्ये नमूद केलेले आहेत . विविध संस्कृतीमधील विद्यार्थ्यांसाठी सहज वाचन पद्धती म्हणजे एक अमृतस्तंभ आहे असा विचार लेखिका मांडतात.  

२.पायाभूत शब्दसंग्रह  

  मावरी समाजातील मुले शिकताना त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी येत आणि अधिक वर्षे ते बालवाडी मध्येच असायची.  मग त्यांच्या मातीतलीच शब्द लेखिकेने त्यांना दिले .पायाभूत शब्द त्यांना शिकवले. ते शब्द संवादामध्ये वापरण्यात येतात अशा शब्दांचा शब्दांचा परिचय लेखिकेने करुन दिला. लेखिका पुढे म्हणतात की जर  मुलांना पायाभूत शब्द म्हणजेच त्यांच्याच भाषेतील शब्द संवादात वापरण्यात येणारे शब्द आधी लिहून दाखवण्यात आले, सांगण्यात आले तर ते विद्यार्थी अधिक गती गतीने शिकतात.  पायाभूत शब्दांचा उपयोग कौशल्याने, कशारीतीने करावा हा विचार या प्रकरणात लेखिकेने मांडलेला आहे .

३. मावरीच्या बालवाडीत वाचनाच्या तयारीची मार्गदर्शक तत्त्वे  

      या प्रकरणात काही मार्गदर्शक तत्त्वे मावरीच्या बालवाडीतील वाचनाच्या तयारीसंदर्भात दिलेली आहे .मूळ शब्दावली ही भीती आणि लैंगिकता या दोन मूळ उपजत जैविक प्रेरणांशी संबंधित असते.  विद्यार्थ्यांना शब्द मनावर बिंबवता ना अधिकाधिक चित्रे दाखवण्याचा मोह टाळला पाहिजे.  

४.व्यक्तिगत आधारभूत शब्दावली  

   मुले हे स्वत: च्या अंतदृष्टीतून विविध शब्द जमवतात हे लेखिकेने या पाठात लिहिलेले आहे  आणि व्यक्तिगतरीत्या जमवलेले हेच शब्द पुढे भाषा शिकण्यास विद्यार्थ्यांना उपयोगी पडतात . मावरी समाजाच्या विविध विद्यार्थ्यांच्या नावाचा येथे उल्लेख आहे . गिलबर्ट ,मोरिन, पेनी, रोबो, फिलिप  या मुलांनी विविध शब्द जमवले आणि ते लेखिकेने येथे लिहिलेले आहेत.  

५.मूलभूत शब्दावली शिकवण्याचे तंत्र मंत्र  

    माझ्या जीवनामध्ये सर्जनशीलतेला अतिशय महत्त्वपूर्ण स्थान आहे, हा विचार लेखिका या पाठामध्ये मांडते. आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून  सर्जनशीलतेची  अपेक्षा करते . विद्यार्थ्यांना सकाळी सकाळी  आल्याबरोबर नवीन नवीन शब्द विद्यार्थ्यांना सुचतात का याचा  प्रश्न विचारून आढावा घेत असते.  एखाद्या मुलीला विचारते की तुला काय हवं आहे? मग ती मुलगी म्हणते टोस्ट.ती मुलगी इकडे तिकडे बघते. मग तिला खिडक्या दिसतात ते माध्यमाला खिडक्या दिसत आहेत अशा रीतीने नवीन नवीन शब्द किंवा सर्जनशीलतेला वाव देण्याचा प्रयत्न केला.

६.मी कधीच काही शिकवीत नाही  

   या पाठांमध्ये स्वयंअध्ययन हे अतिशय महत्त्वपूर्ण असते असे लेखिका म्हणते. ती फळ्यावर काही लिहीत नाही विद्यार्थ्यांसह जाऊन बसते आणि विद्यार्थी स्वतः कसे शिकतात.   मधली सुट्टी झाल्यानंतर शब्द साधनेचा तास लेखिका घेते आणि शब्दसंग्रह विद्यार्थ्यांचा कसा वाढेल हे ती प्रयत्न करते  .

७.सहज लेखन  

   विद्यार्थ्यांना सबंध जीवनाबद्दलची माहिती सांगणे यापेक्षा जीवनाचे छोटे छोटे भाग सांगणे हे उपयुक्त ठरेल मात्र असे छोटे सुटे भाग आपण सांगत गेलो तर जीवनच नष्ट होईल हा विचार या पाठांमध्ये मांडलेला आहे . 
   विद्यार्थ्यांनी पायाभूत शब्दावलीचाच संग्रह आत्मसात केल्यानंतर त्या शब्दांचा उपयोग करून त्यांनी सहज लेखन कसा करावे यासंदर्भात या पाठात मार्गदर्शन केलेले आहे.  
     लेखनक्षमता विकसित करण्यासाठी हा पाठ अतिशय महत्त्वपूर्ण आहे . 

८.जीवननिष्ठा सहज लेखनाचे तंत्र व मंत्र

    लहान मुले लेखिकेला एक शब्द मागतात लेखिका तो शब्द वहीच्या पाठीमागे लिहून देते. मग नंतर विद्यार्थी लेखन करतात  विद्यार्थी लिहित असतानाच त्यांच्या लेखनातील दोष लक्षात घेऊन ते दोष दूर केले पाहिजेत हा विचार येथे लेखिकेने दिलेला आहे  .आधी लेखिकेला वाटायचे की मुलांनी आपले जे लेखन आहे ती एकाच बैठकीमध्ये पूर्ण केले पाहिजे मात्र माझा तो विचार चुकीचा होता मग विद्यार्थ्यांना जेवढ जमेल त्यांनी लिहावे. दुसर्या दिवशी तोच धागा पकडून ते लेखन पूर्ण करावे  अशा अनुभवातून नंतर विचार लेखिकेच्या मनामध्ये आला . मुलांच्या मनामध्ये जे काही आहे ते त्यांनी देण्याचा प्रयत्न करावा असा एक उपक्रम देखील लेखिकेने यामध्ये घेतलेला आहे . 

९.सहज वाचन  

 सहज वाचन यासाठी लेखिकेने स्वतंत्र प्रकरण लिहिलेले आहे  मूल प्रगती करतेय ते त्याच्या स्वतःच्या विकासाच्या नियमांना अनुसरून हे सुंदर वाक्य डॉक्टर बरो यांचं आहे.  या पाठांमध्ये लेखिका विद्यार्थ्यांना जो शब्द देते ते शब्द ते लिहितात. पुढे हळूहळू शब्दसंग्रह वाढत जाऊन विद्यार्थी गोष्टी लिहितात. एकमेकांच्या गोष्टी वाचायला लागतात. अनौपचारिक शिक्षण  शिक्षणाकडून औपचारिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचे वाटचाल होते याबद्दल कवितेने लेखिकेने या पाठात म्हटले आहे.  सुरुवातीला शब्द हे छोट्या बालकांसाठी मृतप्राय असतात नंतर हळूहळू त्यांच्या मूर्तपणाच्या जाणिवा जाग्या होतात . 

१०.सहज शब्द लेखनाचे तंत्र व मंत्र  

   खेळाच्या तासानंतर आता मुले वह्या घेऊन शब्द फळ्यावर लिहितात.त्यांना पहिल्या तासाला दिलेला शब्द विद्यार्थी फळ्यावर लिहितात आणि शिक्षिका त्या बसून बघतात मुलांनी ते शब्द बरोबर आहे  लिहिलेले
आहेत की नाही अशा सहज लेखनाचे तंत्र मंत्र या पाठवून दिलेले आहेत.

११.सहज वाचन शिकवण्याचे तंत्र  

    पंधरा मिनिटे विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिले जातात. यामध्ये वयामधील शब्द विद्यार्थी वाचतात एकमेकांच्या वह्याचे आदानप्रदान करतात आणि वाचन करण्याचा प्रयत्न करतात .यावरून सहज वाचनाची त्यांची सवय ही प्रगल्भ होत जाते . 

१२. मावरींची संक्रमण वाचनमाला  

   मावरी मुलांची अशाप्रकारे हळूहळू वाचन प्रगती होते आणि या संक्रमणातून त्यांची संक्रमण वाचनमाला तयार होते हे लेखिकेने या पाठांमध्ये स्पष्टपणे नमूद केले .मावरी खेड्याचे स्वाभाविक  स्फूर्ती ,त्यामधील नाट्य समूहातील परस्परांविषयीची आपुलकी परस्परातील आकस हे सर्वकाही या पुस्तकात  येणे आवश्यक होते मात्र ते मला योग्य वाटले नाही. असे मत लेखिका मांडतात.  लेखिका त्या मावरी मुलांच्या वह्या सांभाळून ठेवते आणि त्यांच्यातील विकसनाचा संक्रमण कशा रीतीने झालेला आहे याचं वर्णन या पाठात करते.  

१३.निसर्ग आमचा सोनेरी टापू  

   अनेक शतकांपूर्वी प्लेटो आणि पायथागोरस या महान शास्त्रज्ञांना अंकामध्ये विश्व दडले आहे विश्वाचे स्वरूप लपले आहे सौंदर्याचे रहस्य आहे हे उघड आहे  हे उमगले होते . लेखिका म्हणते की छोट्या मुलांना वनस्पतिशास्त्र शिकवणे हे यथार्थ नाही मात्र निसर्गातील नेचे सारख्या वनस्पतींच्या माध्यमातून त्यांना अंकगणित शिकवणे हे सोपे आणि सुलभ  आहे. हा प्रयोग लेखिकेने केलेला आहे  लेखिका जेव्हा मुलांना सहलीसाठी घेऊन जाते तेव्हा त्यांना फर्नच्या फांद्या मोजायला लावते आणि त्यातूनच विकास होतो अंकगणिताचा  म्हणजेच निसर्गाच्या सान्निध्यात राहून विविध विषय शिकता येतात, हा विचार लेखिकेने या पाठात मांडलेला आहे .

१४.जीवन जे फुललेच नाही  

    लेखिका या पाठात म्हणते की जेव्हा सर्जनशीलता संपते तेव्हा विध्वंस सुरु होत असतो.  जेथे सर्जन भाव मनातून दूर होतो तेथे विध्वंस भाव मनामध्ये जागा होतो.  अनेक मावरी मुले हे लढा, मारा ,कापा या प्रकारची भाषा वापरत आणि मग अशा विद्यार्थ्यांमध्ये सर्जन व रुजवणे हे आव्हानात्मक होते . लेखिकेला वाटतं की जगात शांतता नांदावी, अहिंसा असावी ,कोणत्याही प्रकारचे भांडण होऊ नये  मात्र अनेक प्रयत्न करूनसुद्धा समाजामध्ये काहीअंशी का असेना विध्वंस असतो, हा विचार या पाठांमध्ये  मांडलेला आहे. 

१५.मावरी शाळेतील जीवन (एका रोजनिशी च्या आधारे)

   या पाठांमध्ये लेखिकेने जी रोजनिशी लिहिली होती त्या रोजनेशितील तिला जीवनात आलेले अनुभव, शाळेत आलेले अनुभव लेखिकेने विस्तृतपणे या रोजनिशी मध्ये मांडले आहेत. आणि रोजनिशी  या पाठांमध्ये रोजनिशीतील आशय उलगडलेलं आहे .

१६.सुट्टीनंतर एक टिप्पणी  

  शाळेला लोक माणसामध्ये उच्च दर्जाचं स्थान मिळावं म्हणून लेखिकेने केलेले महत्त्वपूर्ण प्रयत्न या पाठांमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत . जेव्हा शाळेमध्ये पोलीस येतात आणि काही मुलांची विचारणा करतात तेव्हा लेखिकेला शाळेला जनमानसात आणण्याची इच्छा होते त्यासाठी प्रयत्नबद्ध असते.  

१७.ट्रेमेनना पाठविलेली टिप्पणी  

   आपण पूर्ण वाक्यांचा वापर करून विचार करतो हे मत जे आहे या मताशी लेखिका पूर्णतः सहमत असते मात्र मावरी भाषेतील मुले ही एक शब्दांचे वाक्य वापरतात.  ही एक शब्दांची असलेले वाक्य हे अर्थपूर्ण असतात. हे या टिप्पणीमध्ये लेखिकेला म्हणायचे आहे  मावरी भाषा अलंकारिक मानण्यात येते पण अशा अलंकारिक प्रमाण भाषेचा उपयोग मोठमोठ्या समारंभातच होतो आणि तो व्यवहार्य असतो असाही विचार या टिप्पणीत लेखिका मांडते.  

१८.ट्रेमेनच्या भेटीनंतरच चिंतन  

    या पाठांमध्ये टाइपरायटर  ट्रेमेन यांचा आणि लेखिकेचा संवाद नमूद केलेला आहे.   या पाठांमध्ये लेखिका ब्रेनन यांना लेखी स्वरुपात काही मजकूर पाठवायच्या आणि ते मोठय़ा स्वरूपामध्ये मोठ्या टाइपमध्ये लेखन करून टाइप करून ट्रेमेन लेखिकेला पाठवायचे . त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी लेखनासाठी सहजरीत्या व्हायचा  मावरी मुलांनी लिहिलेले शब्द, मावरी मुलांनी लिहिलेल्या छान छान सुंदर सुंदर कविता या पाठांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.  

१९.सहज वर्तनव्यवहार  

   मावरी मुलांमध्ये संगीत आणि नृत्यकला ओतप्रोत भरलेली आहे आणि यालाच मी जीवनाच्या बेबंद उत्स्फूर्त आवर्तन व्यवहाराचा आविष्कार अभिव्यक्ती मानते असं लेखिका येथे आवर्जून व्यक्त करते.  

   लेखिका म्हणते की मी एक चांगली शिक्षिका आहे असा आत्मविश्वास माझ्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे होता. मात्र मी एक अर्धवट मूर्ख व्यक्ती आहे, असं मी स्वत: ला मानते.  मात्र शिक्षकी पेशातील कौशल्य माझ्यामध्ये हळूहळू विकसित होत गेले असंही मी समजते.  

२०.सुट्टी  

     शाळेला लागलेल्या सुट्ट्या संपल्यानंतर आंतरिक ओढीने मुलं शाळेमध्ये ओढली जातात. एवढी प्रगल्भता शिक्षकाच्या शिकवण्यामध्ये असणे हे अगत्याचे आहे असा विचार  या पाठात लेखिका मांडते. लेखिका म्हणतात की सर्व शिक्षक वरवरच्या देखाव्यांवर जास्त भर देतात आणि शिक्षणाचा आत्माच हरवून जातो .कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचे अक्षरही कधी कधी हे व्यवस्थित नसतं.  खरं म्हणजे बुद्धिमत्तेच्या कुशाग्र तेचा आणि लेखनाचा तसा अर्थाअर्थी संबंध नसतो. मात्र लेखन सुसंगत आणि सुसंबद्ध असलं पाहिजे असा महत्त्वपूर्ण विचार लेखिकेने मांडलेला आहे.  

२१. स्मरण यात्रा

   पूर्वाश्रमीच्या  शाळेची शिक्षिका असणारी लेखिका आता मुख्याध्यापकाची पत्नी झाली होती आणि जुनाट शाळा पाडून टाकण्यात येऊन आता नवीन शाळा बांधण्यात आली होती . मात्र जुनाट शाळेच्या आठवणी लेखिकेच्या मनावर अशा ठसलेल्या होत्या की त्या  विस्मरणात जात नव्हत्या आणि स्मरणयात्रा या पाठांमध्ये नेमकं हेच म्हटलेलं आहे .   धुळीत   बसलेले विद्यार्थी, त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा उत्साह या भाषणात नमूद करण्यात आलेला आहे . शेवटी लेखिका नवीन इमारत बघून भारावते, विविध चिमुरड्यांना बघते आणि जुन्या आठवणी मनात ठेवून घरी जाते. तिला दिसते  पानगळ , तिच्या डोळ्यांत अश्रू येतात तिला जुन्या आठवणी आठवतात आणि कायम स्मरणात राहतात अशा महान लेखीकेस विनम्र अभिवादन !

     धन्यवाद  !----श्री मनोज अग्रवाल ,औरंगाबाद

AE 3I Automobile Engines

 



VIDYA PRATISHTHAN'S 

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

VIRTUAL LIBRARY 

 

AE 3I Automobile Engines


ENVIORNMENTAL STUDIES CE/CE/AE/EJ- 5I

 


VIDYA PRATISHTHAN'S 

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

VIRTUAL LIBRARY 

 

ENVIORNMENTAL STUDIES CE/CE/AE/EJ- 5I


Wednesday, November 17, 2021

Employment-news- 13th November 2021 to 19th November 2021

 

VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS 

Employment-news- 13th November 2021 to 19th November 2021

Employment-news- 6th November 2021 to 12th November 2021

 

VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS 

Employment-news- 6th November 2021 to 12th November 2021

Employment-news-30th October 2021 to 05th November 2021

 

VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS 

Employment-news-30th October 2021 to 05th November 2021

Employment-news-23rd October 2021 to 29th October 2021

 

VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS 

Employment-news-23rd October 2021 to 29th October 2021

Employment-news-16th October 2021 to 22nd October 2021

 

VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS 

Employment-news-16th October 2021 to 22nd October 2021