Monday, January 24, 2022

Rojgar Samachar 22-28 Jan 2022 PDF (Hindi)

 

 विद्या प्रतिष्ठान 

तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर ,पुणे 
रोजगार समाचार (हिंदी )

Rojgar Samachar 22-28 Jan 2022 PDF (Hindi)




Employment News 22-28 Jan 2022 PDF (English)

 

VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS 


Employment News 22-28 Jan 2022 PDF (English)

Click Here to View e Employment News 



Source :- https://www.gisvacancy.com/news/employment-newspaper-this-week/
https://haryanajobs.org/employment-news/

Rojgar Samachar 15-21 Jan 2022 PDF (Hindi)

 

  विद्या प्रतिष्ठान 

तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर ,पुणे 
रोजगार समाचार (हिंदी )

Rojgar Samachar 15-21 Jan 2022 PDF (Hindi)




Employment News 15-21 Jan 2022 PDF (English)

 

VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS 


Employment News 15-21 Jan 2022 PDF (English)

Click Here to View e Employment News 



Source :- https://www.gisvacancy.com/news/employment-newspaper-this-week/
https://haryanajobs.org/employment-news/

Sunday, January 23, 2022

नेताजी सुभाष चंद्र बोस की जयंती जनवरी २०२२

 

विद्या प्रतिष्ठान संचलित,तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर-पुणे ग्रंथालय विभाग पराक्रम दिवस पर आधारित ऑनलाइन प्रश्नोत्तरी (नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती जनवरी २०२२ )


नेताजी सुभाष चंद्र बोस की जयंती      
                                   
विद्या प्रतिष्ठान संचलित,तंत्रनिकेतन महाविद्यालय  पुस्तकालय "पराक्रम दिवस" के अन्तर्गत  पुस्तकालय पाठक संघ ऑनलाइन प्रश्नोत्तरी प्रतियोगिता  का आयोजन किया गया हैं।
अतुल चंदनवंदन,
 पुस्तकालय अध्यक्ष

ऑनलाइन प्रश्नोत्तरी प्रतियोगितामें भाग लेने के लिए यहाँ क्लिक करे

Saturday, January 22, 2022

: मृत्यूचे महाचुंबन घेणारा महाकवी 'साने गुरुजी'.

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य 

पुस्तक क्रमांक : 83.

पुस्तकाचे नाव : मृत्यूचे महाचुंबन घेणारा महाकवी  'साने गुरुजी'.

लेखक  : आचार्य अत्रे.

वाङमय प्रकार : चरित्र.

पृष्ठसंख्या  : 141.

स्वागतमूल्य : 130₹.

प्रकाशन संस्था : पार्श्व
                       पब्लिकेशन.

पुस्तक परिचयकर्ता : मनोज अग्रवाल.

  सदरील पुस्तक हे आचार्य अत्रे यांनी सानेगुरुजी यांच्याबद्दल लिहिलेले विविध लेख आहेत .साने गुरुजी यांच्या महानतेबद्दल लिहिलेल्या लेखांचा संग्रह म्हणजेच मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी हे पुस्तक होय .आचार्य अत्रे यांचे ज्याप्रमाणे वक्तृत्वावर विशेष  प्रभुत्व होते अगदी त्याचप्रमाणे त्यांचे लेखनावरही विशेष प्रभुत्व होते .लेखनात त्यांचा विशेष हातखंडा होता हे त्यांनी लिहिलेल्या विविध लेखांच्या माध्यमातून आपल्या  लक्षात येते.  सदरील पुस्तक हे एकूण तीन विभागांमध्ये विभागले गेले आहे .

विभाग पहिला  

पहिल्या विभागामध्ये एकूण चार प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे .श्यामची आई चित्रकथा ,साने गुरुजींच्या जन्मभूमीत, चित्रीकरणाला प्रारंभ, महाराष्ट्रात मातृप्रेमाचा महापूर अशी ही चार प्रकरणे आहेत .ज्याप्रमाणे ऊन आणि थंडीमुळे फुलांचा विकास होतो अगदी त्याप्रमाणेच आईच्या रागामुळे आणि  अनुरागामुळे मुलांचा विकास होत असतो हा उच्चकोटीचा विचार या प्रकरणात दिलेला आहे .नाशिकच्या तुरूंगामध्ये असताना श्यामने मित्रांना सांगितलेली आईची आणि वडिलांची गोष्ट येथे नमूद करण्यात आले आहे .सानेगुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई हे पुस्तक वाचल्यानंतर त्याला रुपेरी पडद्यावर आणण्याचे अत्रे यांनी ठरवले होते आणि मग ते त्यांच्या गावी जाऊनच आपल्याला चांगल्या रीतीने समजेल म्हणून  आचार्य अत्रे साने गुरुजींच्या गावी गेले आणि त्यांनी प्रत्यक्ष त्यांचं गाव बघून नंतरच या चित्रपटाची आखणी केली .जयप्रकाश नारायण यांच्या शुभहस्ते ज्योती स्टुडिओमध्ये चित्रीकरणाला प्रारंभ झाला .श्यामची आई हा चित्रपट महाराष्ट्रात एवढा प्रसिद्ध झाला  की जणू महाराष्ट्रात मातृप्रेमाचा महापूर वाहू लागला  या शब्दामध्ये आचार्य अत्रे यांनी या चित्रपटाची स्तुती केलेली आहे .अतिशय सुंदर मांडणी या चित्रपटाची होती.

विभाग दुसरा 

दुसऱ्या विभागात सानेगुरुजींचा वैकुंठवास ,मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी,  साने गुरुजींचे सुवासिक स्मरण या प्रकरणांचा समावेश करण्यात आलेला आहे .साने गुरुजी यांचा स्वभाव प्रेमळ होता .ते कोणालाही दुखावत नसत.समाजातील काही लोकांनी या स्वभावाचा गैरफायदा घेतला .अशा जगात राहणे नको असा निर्णय सानेगुरुजींनी घेतला आणि त्यांनी झोपेच्या सोनोरील नावाच्या गोळ्या खाऊन स्वत:ला संपवले .ही बातमी ऐकून महाराष्ट्रातील लोकांना खूप दुःख झाले .जातीयता, प्रांतीयता नष्ट करण्यासाठी गुरुजींनी खूप प्रयत्न केले .सानेगुरुजींनी शेवटच्या पत्रात नमूद केले होते की मला देवाघरच बोलावणं आलं आहे.

विभाग तिसरा  

तिसऱ्या विभागात सानेगुरुजींचे उपोषण  ,खान्देशात सानेगुरुजी समवेत , गुरुजींच्या जीवनाचे काव्य या प्रकरणांचा समावेश करण्यात आला आहे .साने गुरुजी उपोषणाला बसले असताना त्यांना वाचवण्यासाठी अत्रे यांनी भाषणात लोकांना नम्र, भावनिक आवाहन केले होते.साने गुरुजी यांच्यासोबत व्यतीत केलेले क्षण येथे अत्रे यांनी व्यक्त केले आहेत. साने गुरुजी खूप हळवे होते असे अत्रे लिहितात.ते मायाळू, कनवाळू मनाचे होते असे वर्णन आचार्य अत्रे यांनी साने गुरुजी यांचे केले आहे.

   साने गुरुजी एकदा जळगावला गेले असताना त्यांना काही मुले जेवण्यासाठी बोलावण्यास आली. गुरुजी जेवायला गेले. जेवण करून परतल्यावर आणखी काही मुले जेवण्यासाठी बोलावण्यास आली. साने गुरुजी म्हणाले,"बाळांनो ,माझे आताच जेवण झाले. आता मला जेवण्याचा आग्रह करू नका."त्यावेळी मुले रडू लागली. साने गुरुजी देखील रडू लागले.नन्तर ते त्या मुलांसोबत जेवायला गेले. एवढे महानपण साने गुरुजींच्या अंगी होते.

    हे पुस्तक वाचताना अनेकदा साने गुरुजी यांचे निरागस व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर तरळते.अनेकदा आपले डोळे भरून येतात. सहनशीलता महान पणाचे द्योतक आहे, हे आपल्याला पटते. साने गुरुजींना सलाम!
एक महान मातृहृदयी व्यक्तिमत्त्व म्हणजे साने गुरुजी होते.

 साने गुरुजी, आचार्य अत्रे यांना विनम्र अभिवादन!!

  मनःपूर्वक धन्यवाद..!

   मनोज अग्रवाल, औरंगाबाद.

पुस्तक:UPSCमी आणि तुम्ही📕

UPSC बद्दल सर्वकाही...!

आपले ध्येय निश्चित असेल त्याला नियमित कष्टाने आणि नियोजनाने प्राप्त करता येते....हे सांगणारे हे पुस्तक! सर्वांसाठी प्रेरक आहे ज्यांना अजून आपले ध्येय मिळाले नाही अशा प्रत्येकासाठी!

"अन्सार शेख" पहिल्या प्रयत्नात, २१ व्या वर्षी, मराठी माध्यम घेऊन आय ए स (IAS) होऊन एक खेड्यातील, कष्टकरी मुलांसाठी दिशादर्शक ठरला.

📍वयाच्या २१ व्या वर्षी IAS!

📍पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणाऱ्या अन्सार शेख चे अनुभव त्यांच्या शब्दात!

यूपीएससी बद्दल सर्व काही एका पुस्तकात!

📕पुस्तक:UPSCमी आणि तुम्ही📕

लेखक:अन्सार शेख IAS

प्रकाशन :युनिक ऍकॅडमी

📍पृष्ठ:२८०(डेमि साईज) मूल्य:२५०/

   टपाल: ४०/

व्हॉट्सॲप करून नाव पत्ता पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.

📍पुस्तक भारतील सर्व गावी/ शहरी घरपोच मिळेल.

फोन पे, गुगल पे, Paytm:9421605019

 रावजी लुटे यांचे ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी

📍या पुस्तकात अन्सार शेख यांच्या पेपर च्या नोट्स च्या फोटो कॉपी,त्यांच्या मुलाखती आणि सर्व अनुभव त्यांच्या शब्दात!

📍UPSC आणि MPSE अन्य स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्वांनी स्वतःची प्रत बाळगावी!

पण स्पर्धा परीक्षा न देणाऱ्याने ही हे पुस्तक वाचावे.

असे पुस्तक आजच मागवावे!

मराठवाड्यासारखा मागास विभाग, (जालना जिल्हा, शेळगावसारखं छोटं गाव) आणि मुस्लिम समुदायातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास स्तरातून असलेला अन्सार जणू या घटकांचे प्रातिनिधिक स्वरूपाच आहे. अशा दुर्बल घटकांतील व्यक्तीला प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून जगण्यासाठीच तीव्र संघर्ष करावा लागतो. जिथं जगण्यासाठीचा संघर्षच ऐरणीवर असतो, तिथं शिक्षण घेणं, उच्च शिक्षणापर्यंत मजल मारणं आणि प्रशासकीय अधिकारी व्हायचं ठरविणं ही गोष्ट स्वप्नवतच. अन्सारने असं स्वप्न पाहिलं, या स्वप्नालाच आपल्या जीवन संघर्षाचे अविभाज्य अंग बनवलं आणि ते तडीस नेलं. भवतालची व्यस्था प्रतिकूल असूनही, न डगमगता अन्सारनं इथपर्यंत केलेला हा प्रवास अपवादात्मक ठरतो. म्हणूनच तो जाणून घेणं महत्वपूर्ण ठरतं!

भेट देण्यासाठी अतिशय सुंदर पुस्तक!

#टिप:
१. नाना, मी साहेब झालो ले. विष्णू औटी मूल्य:२५०/

२. ताई मी कलेक्टर व्हयनु ले. राजेश पाटील मूल्य:२००/

वरील तीन पैकी कोणतेही दोन एकत्र खरेदी केल्यास फ्री होम शिपिंग!

ही पोस्ट पुढे पाठवावी!

Thursday, January 20, 2022

पुस्तकाचे नाव Mini Habits

पुस्तकाचे नाव Mini Habits
मूळ लेखक -  Stefan Guj
मराठी अनुवाद - विद्या अंबिके

सुरुवातीलाच सांगतो , हे पुस्तक मला जाम म्हणजे अगदी तुफान म्हणजे फार बेक्कार आवडलं आहे !
फक्त दीडशे पानांचे पुस्तक पण काल आणि आज मिळून वाचून टाकलय ...
SELF HELP या प्रकारात अनेक पुस्तकं आजवर वाचली आहेत ..अगदी You can Win , Rich Dad Poor Dad , How to Win Friends &  पासून ते Seven Habits Of Highly Effective People पर्यंत ! पण हे पुस्तक म्हणजे त्या सगळ्यांचा कळस आहे कळस !
सेव्हन habits वाचले तेव्हा भाषा खूप जड वाटली होती व ते Highly Effective शब्द म्हणजे खूप जड वाटले , पण बाकीचे जण बरेच वाचत होते म्हणून मी ही ते वाचले होते , पण आता काही ,काही लक्षात नाही , शप्पथ !
पण हे पुस्तक म्हणजे स्टीफन भाऊंचे स्वतःचे प्रांजळ कथन वा अनुभव आहेत ...काय होतं ना आपण सगळेच एकदम खूप मोठ्या गोष्टी वा ध्येये वगैरे च्या मागे लागतो व होत तर काहीच नाही !
स्टीफन ने मग या गोष्टीवर स्वतःच उपाय शोधला ...तो म्हणजे Mini Habits .. तो कसा तर रोज एकाच पुश अपस( Push Up ) काढायचा , रोज दहाच मिमिटे वाचायचे , पन्नासच शब्द लिहायचे ! व हे करणे खूप कमी वेळाचे व सोप्पे आहे त्यामुळे त्यात यश मिळाले तर आपला आत्मसन्मान ( SELF IMAGE ) वाढतेच , पण अपयश आले तरी फार काही वाईट वाटत नाही ...पण हीच सवय हळूहळू मात्र हवी हवीशी वाटून रोजच्या जीवनाचा भाग बनते ! किती सोप्पे आहे हे !
स्टीफन ने पुढे फार भारी मांडलंय ! ते असे की प्रेरणेने काम होण्यापेक्षा इच्छाशक्ती ने कामे सहज होतात (Will power is more useful than inspiration ) .प्रेरणा दीर्घकाळ टिकत नाही , पण रोज दहाच मिनिटे वाचन करायची इच्छाशक्ती ठेवली तर ती मात्र नक्कीच टिकेल ...
या छोट्या सवयी निर्माण करण्यातल्या स्टेप्स ही स्टीफन ने संगतवार व सोप्या मांडल्या आहेत ...
या पुस्तकात जागोजाग व्यायाम , वाचन , रोज थोडे लेखन ज्या गोष्टी स्टीफन ला आवडतात त्या त्याने मांडल्या आहेत , ज्या मलाही आवडतात , म्हणूनही हे पुस्तक मला खूप आवडले आहे ....
अर्थात हे खूप आवडल्याने रोज दहाच मिनिटे वाचण्याऐवजी मी जवळजवळ एकाच बैठकीत वाचून संपवले आहे ..
आपणही वाचा

आभार
रावजी लुटे
ज्ञानसाधना प्रकाशन
9421605019
यांच्या नेहमी मिळणाऱ्या पुस्तक परिचयाच्या Whatsapp मुळे असे काही अद्भुत वाचायला मिळते ..
आपणही वाचा हे पुस्तक !

Monday, January 17, 2022

पिपिलिका मुक्तिधाम" कांदबरी

*उत्तर आधुनिकता आणि पिपिलिका मुक्तिधाम*

        - डॉ.संजय बोरुडे.

        "पिपिलिका मुक्तिधाम" कांदबरी (२०१९ ग्रंथाली प्रकाशन मुंबई) संदर्भात अनेक लेखकांनी समिक्षा केलेली असून अनेक लेखकांनी या कांदबरीचा आशयाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.हे करत असतांना सगळ्यामध्ये एक वाक्यता दिसून येते की ही कांदबरी वाटते तितकी सोपी नाही.म्हणजे ती आकलनाच्या दृष्टीने पचायला अवघड आहे.असे ब-याच लेखकांना वाटत आहे.त्याचे मुख्य कारण असे की या कांदबरीसाठी त्यांनी जो गाभा निवडलेला आहे तो वेगळ्या पध्दतीचा आहे.कांदबरीतील निवेदिका म्हणून ज्या चार मुंग्या आपल्याला दिसतात.या चार मुंग्यांच्या माध्यमातून त्यांनी समकालीन वास्तव,धर्म,वंश,परंपरा,आधुनिकता,नवता ,आधी सर्व घटनांचा,सर्व घटकांचा एक वेगळ्या पध्दतीने,एक त-हेवाईक पध्दतीने परंतु तो तात्विक अन्वय मांडलेला आहे.आणि अशा पध्दतीला अन्वय वाचण्याचा किंवा पाहण्याची आपल्याला सवय नसते.त्यामुळे ही कांदबरी थोडीशी अवघड वाटू शकते.आणि घाईघाईने यावर भाष्य करायला बरेच लेखक धजावत नाही.कोणी त्याच्या रचनेच्या अंगाने,किंबहुना स्वरुपाच्या अंगाने,शब्दकळेच्या अंगाने,प्रतिमेच्या अंगाने,प्रतिकांच्या अंगाने बोलतात.मात्र या कांदबरीचा गाभा तरी सुध्दा कोणाला सापडला यावरील समर्पक लेख माझ्या वाचण्यात नाही. म्हणून   "उत्तर आधुनिकता आणि पिपिलिका मुक्तिधाम" या अंगाने मी काही मुद्दे समोर ठेवत आहे.तर 'उत्तर आधुनिकता ' म्हणजे काय?हे समजून घेण्याअगोदर आपणांस 'आधुनिकता ' माहित असणे गरजेचे आहे,आता उत्तर आधुनिकता हे पर्व सुरु होऊन जवळ पास पन्नास वर्षाहूनही जास्त काळ लोटलेला आहे.उत्तर आधुनिकतेचे अस्तित्व आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये जाणवते.तरीही उत्तर आधुनिकता म्हणजे नेमके काय..याची व्याख्या करणे अवघड जात आहे.सुरुवातीला काही तात्विक भागावर प्रकाश टाकू..नंतर या कांदबरीच्या अनुषगाने काही उदाहरणांवर प्रकाश टाकू.  

आधुनिकता ह्या वांड़मयीन घटकांवर आपण जी काही चर्चा करत असतो पण  ब-याचदा सवंगपणे किंवा ढोबळपणे ती असते.मात्र आधुनिकता ही बुध्दी,विचार आणि ज्ञान या तत्वांशी संबंधित आहे.आणि आधुनिकतेची महत्वाची उपलब्धी म्हणजे..आपल्याकडे विज्ञान युग अवतरले..केशव सुत म्हणतात की,"जुने जाऊ द्या मरणालागुनी" हे जे काही नव सृजन घडलेलं आहे.हे सृजन कसे घडलेलं आहे हे केवळ साहित्याच्या प्रांतात घडलेलं आहे असं नाही..हे एकूणच समाजाच्या जागतिक पातळीवर घडलेलं आहे,ही सगळी उलथापालथ झालेली आहे.आणि या उलथा पालथीमुळं नवी मूल्य आकाराला आलेली आहे.नवे तत्वज्ञान आकाराला आलेले आहे.माणसाची भौतिक प्रगती झाली.ज्यावेळी गँलिलिओ आणि त्याकाळातील संशोधक वेगवेगळे शोध लावत होते.त्यावेळी जसे आपल्याकडे संतांचा छळ झाला तसेच त्यांच्याही देशात या वैज्ञानिकांचा छळ झाला.पृथ्वी गोल आहे.हे सांगत असतांना धर्ममांतडांना ते मान्य नव्हते..ते सांगत होते की पृथ्वी गोल नसून ती सपाट आहे.. गॅलिलिओला धर्म विरोधक म्हणून त्यांनी गिलोटीन खाली दिले.हा इतिहास आपणास ज्ञात आहे.फ्रांन्स मध्ये औद्योगिक क्रांती झाली त्यामुळे..अनेक यंत्रे आली, सुबत्ता आली आणि उत्पादनाचा वेग वाढला.मानवाची भौतिक प्रगती झाली.परिणामी आधुनिकीकरणाचा एक दुष्परिणाम असा झाला की,यंत्रयुग आल्यामुळे कमवत्या हातांचा रोजगार गेला..मनुष्य बळाची जागा यंत्रयुगाने घेतली.कारखान्यांमध्ये काम करतांना माणूस हाच यंत्र बनला.आपल्याकडे गिरगावच्या संदर्भात कापूस मिल संदर्भात कवी नारायण सुर्वे पासून अनेकांचे साहित्य आपण वाचत असतो.त्यामध्ये याचे प्रतिबिंब पडलेले आपणांस दिसते.किंवा "रोबोट" नावाची कांदबरी जी.के.ऐनापुरींची त्यामध्येही या पध्दतीचे प्रतिबिंब पडलेलं दिसतं.पुढे त्यातुन दोन गोष्टी झाल्यात एक म्हणजे मालक हा एक वर्ग उदयाला आला.उत्पादन करणारा कंंपणीचा मालक आहे.आणि दुसरा श्रमिक ..हे दोन वर्ग उदयास आले. श्रमिक हा वर्ग कष्टाला मानणारा होता.कष्ट हेच त्याचे देव होते आणि धनिक हा पर्यायाने जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा विचार करतांना..मालक आणि श्रमिक यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत गेली.कारखान्यात काम मिळते म्हणून दुष्काळ,नापिकी,कर्ज बाजारीपणा या सगळ्यांना कटाळून गावातून अनेक तरुण लोक यांनी शहराच्या वाटा धरल्या.शहरामध्ये,महानगरात येऊन त्यांनी उदरनिर्वाहासाठी रोजगार मिळवले.पर्यायाने झोपडपट्या वाढल्या.. प्रदुषणाच्या अनेक समस्या निर्माण झाल्यात.  "उत्तर आधुनिकता समाज व संस्कृती"  या पुस्तकामध्ये अशा ब-याच गोष्टींची चर्चा  आहे.त्यातील एका  महत्त्वाच्या विधानाचा येथे आवर्जून उल्लेख करावा वाटतो.कारण आपल्याकडे आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रध्दा बाळगत असतो.तशाच काही 'वाङ्मयीन अंधश्रध्दा ' आपण नेहमी बाळगत असतो.
    आधुनिकता म्हणजे एकदम सगळं जुनं गेलं आणि एकदम सगळं नवीन आलं.माणूस आला आणि त्याच्या  बरोबर सगळी मानवतावादी मूल्य आली. प्रत्यक्षात तशीच क्रांती झाली असे काही नाही.बी रंगराव यांचे हे  विधान त्यादृष्टीने धक्कादायक वाटू शकते.परंतु त्यांचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे.त्यांनी असे म्हटले आहे की, "आधुनिकतावाद हा अभिजातवादाचाच एक प्रकारचा नवा अविष्कार होता." म्हणजे काय झाले की आधुनिकतेच्या नावाखाली जुने जे पारंपरिक होते ज्याला अभिजात म्हणून गाजवले गेले होते.  आजही त्यापध्दतीचा अभिजातवाद किंवा कुठले वाद ज्याच्या-त्याच्या पध्दतीने गाजवले जात असतात.अभिजातवाद म्हणजे पुन्हा पारंपरिक म्हणजे 'नव्या बाटलीत जुनी दारु' असे म्हणता येईल,अशा  पध्दतीचा हा अविष्कार होता. 'पिपिलिका ' ही आधुनिकतेच्या पुढची म्हणजे उत्तर आधुनिक कादंबरी आहे. मराठीत  यासारखे अनेक लेखक हे एक प्रकारच्या पारंपरिक पद्धतीने लिहीतात.त्यांच्या कथनाचा एक ट्रॅक  ठरलेला आहे. त्यांच्या लेखनातून  लेखक हा सारखा डोकावत राहतो.पात्रांमध्ये लेखक डोकावत राहिला की तो त्यांच्यावर हावी होतो.
    पिपिलिका  मध्ये चार मुंग्या आहेत त्यातील लाली तिच्या स्वभावाप्रमाणे वागते ,काळी तिच्या स्वभावाप्रमाणे वागते.कामकरी तिच्या स्वभावाप्रमाणे वागते.यातील राणी मुंगी तर स्वतंत्रच आहे.त्यामुळे त्याचा विचार कृती रूपकात्मक असली तरी सहज आणि नैसर्गिक आहे.त्या सगळ्या मुंग्या एकत्र येतात त्या 'आम्ही ' बनतात.नवी मोडतोड करू लागतात. या मोडतोडीच्या अर्थाने ,ही कादंबरी कथनाच्या अंगाने उत्तर आधुनिक ठरते.उदा 'हत्तीच्या कानात बँड ' मधील भागात लोककथेचा बाज घेऊन निवेदन येते तर 'अंधारातील सावल्या ' या भागात उपहास उपरोध येतो.तर 'कार्ल मार्क्सच्या केसात आम्ही 'त तिरकस सटायर येते.प्रत्येक भागाची शिर्षके वेगळी, क्रिएटीव्ह आहेत.उत्तर आधुनिकतेपुर्वीची आधुनिकता आपणाकडे जशी होती तीच आपले लेखक मांडत राहतात. 
     दुसऱ्या  महायुध्दानंतर ब्रिटिश वसाहती ज्या होत्या त्या ब्रिटीशांच्या जोखडाखालून अनेक राष्ट्र स्वतंत्र झाली. खुद्द अमेरिकेमध्ये जी गुलामगिरीची प्रथा होती ती प्रथा नष्ट करण्यासाठी मार्टिन ल्युथर किंग व अनेक तत्ववेत्ते विचारवंत झाले..अमेरिकेने सुध्दा त्याला पाठिंबा देऊन गुलामगिरीतून कृष्णवर्णीय मुक्त केले. अशा अनेक घटना दुसऱ्या महायुध्दानंतर घडल्या. ' नॉर्डीक हाच खरा आर्यवंश ' असं म्हणणाऱ्या  हिटलरच्या निमित्तानं जो राष्ट्रवाद जर्मनीत फोफावला होता,जी काही एकाधिकारशाही होती ती संपुष्टात आली होती.असे अनेक बदल झाले होते.
     आपल्याकडे सुध्दा पन्नाशीच्या दशकामध्ये आशिया खंडामधील भारत व अनेक देश  स्वतंत्र झाले हे सगळे बदल घडत होते  आणि सामाजिक,सांस्कृतिक इतिहास बदलत गेला.भारतीय समाजाच्या व्यामिश्र संरचनेत आधुनिकता,उत्तर आधुनिकता आणि दोहोंच्या मधले आणि त्यापुढील टप्पे सगळे एकाच वेळी आपल्याला दिसायला मिळतात.म्हणजे  पुरोगामी व सगळं मानवतेचं एकीकडे बोलत असलेले लोक  , प्रत्यक्षात व्यवहारात वागतांना पारंपरिक पध्दतीने वागताना किंवा परंपरावादी असल्याचा आपल्याला दिसतं.म्हणजे आपल्याकडे एखादे आजोबा एखाद्या घरामध्ये सकाळी देवपूजा करतांना दिसतात.समोर पिंपळ असेल मुंज्या असेल त्याला प्रदक्षिणा घालतांना दिसतात.घरात आजी असेल तर ती जपमाळ ओढताना दिसते किंवा 'रामकृष्ण हरी 'जप करतांना दिसते.ही म्हातारी माणसं टी.व्ही वर वैगरे कीर्तन प्रवचन,भजन, जे काही धार्मिक स्वरुपाचे आहे  ते पाहतात.आपणाकडे धार्मिक पुण्य कमवण्याचा महत्त्वाचा उद्देश जो आहे,तो प्रत्येक जण  पूर्ण करतो.तसेच धार्मिक साहित्याचा उद्देश आहे तो पुण्य कमवण्याच्या मार्गाला लागलेला दिसतो .त्यावेळी त्यांचा नातू , गुडघ्यावर जीन फाटलेली फँशनेबल कडे अशा अवस्थेत कानात हेडफोन घालून कुठल्यातरी पाश्चात्त्य संगीतावर 'राम्भासांभा' करतांना दिसतो . हा जो विरोधाभास आहे, तो आपल्या भारतीय समाजरचनेत ;   अनेक कुटुंबामध्ये  पाहायला मिळतो.म्हणजे आपण आधुनिक असलो तरी परंपरावादी आहोत.पिपिलिका पुराणांचा ,वेदाचा इतिहासाचा गौरवीकरण न  करता ,त्याच्या नव्या झुंबराची चिकित्सक मांडणी करते.आपल्या परंपरेचा धागा सांगून ती नवी मांडणी करते .तिच्याकडे जी दृष्टी आहे ती सर्वव्यापी आहे.
भारतीय समाजरचनेत हे जे आक्रित पाहायला भेटते.त्याचा स्तर ती मांडून दाखविते.
   पाश्चात्त्य इतिहासकारांनी जगाच्या इतिहासाचे ढोबळ मानाने चार टप्पे मांडलेत त्यामध्ये 'कृष्णयुग ' ज्याला इंग्रजीमध्ये 'डार्क एज 'म्हणतात त्यानंतर मध्ययुग अर्थात 'मिडल एज ',आधुनिक युग म्हणजे 'माँडर्न एज ' त्यानंतर उत्तर आधुनिक युग 'पोस्टमाँडर्न एज ' .प्राचीन भारतामध्ये आपल्याकडे सुध्दा बौध्द भिख्खु आणि श्रमणांनी वैदिक धर्मामधील ज्याकाही अनिष्ट रुढी,परंपरा होत्या जी काही तत्वं होती त्याला विरोध करतांना ते दिसतात.दुसरी गोष्ट आपल्या भारतीय  उपखंडाच्या पार्श्वभूमीवर पाहिले तर इथला जो माणूस होता तर तो ऐहिक चिंतेपेक्षा आपल्या अध्यात्मिक चिंतेत म्हणजे पारलौकिक जीवनाच्या बाबतीत तो जास्त दक्ष होता. ऐहिक जीवन कसेही असले तरी पारलौकिक जीवन 'मुक्ती मोक्ष ' या संकल्पना वाढीस लागलेल्या होत्या.आणि वेगवेगळे पंथ जरी निर्माण झाले तरी त्यांचे उद्देश मात्र एकच होते.तरी या अर्थाने ख्रिस्तपूर्व काळामध्ये मनुष्य हा विश्वातील आपलं स्थान शोधण्याच्या प्रयत्नात होता असं दिसतं.
   पिपिलिका ही दार्शनिक कादंबरी आहे ,जी जगभरातील तत्वज्ञानाचा अन्वयार्थ मोक्षमुक्तिच्या अनुषंगाने मांडते आहे.मोक्षाच्या या पैलूंवर अजून कोणी लिहीलेले पाहण्यात नाही.उत्तरआधुनिकता या कादंबरीत अनेक अंगाने आली आहे. आधुनिकतेच्या सुवर्ण युगामध्ये माणसं माणसांतील दरी रुंदावत गेली गुलाम,दास वर्ग निर्माण झाले.ज्ञान ,विज्ञान धर्म आणि राजकारण यासारख्या महत्वाच्या क्षेत्रामध्ये विशिष्ट वर्गाची मक्तेदारी आली.शक्ती आणि बळ एका विशिष्ट वर्गाच्या हाती राहिले आणि त्यातूनच भांडवलशाही उदयाला आली.पर्यायाने सामाजिक विषमता दूरवर पसरत गेली.भांडवलशाहीचे देशीय रूप ही कादंबरी रेखाटते. आधुनिकतेचा प्रवाह अगदी कालपरवापर्यत म्हणजे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धा पर्यत अव्याहतपणे चालू असल्याचा आपल्याला दिसतो.ज्या कलाकृतीना म्हणजे ह्या कालखंडामध्ये जर आपण काही कलाकृती पाहिल्या तर उदाहरणार्थ आपल्या मराठी कवितेच्या तीन वळणं जरी बघितले तरी आज आपण उत्तर आधुनिकतेचे प्रतिनिधी म्हणून किंवा एकविसाव्या शतकाचे पहिल्या वीस वर्षाचे प्रतिनिधी म्हणून एक पिढी म्हणून याकडे बघितले तर काही शंका आपल्याला यायला लागतात. या शंकेमागील गाभा असा आहे की, ज्या कलाकृतीला अभिजात म्हणून संबोधितले गेलेले आहे.त्या कलाकृती ह्या भांडवलशाही वर्गाला पोषक असलेल्या समूहातील होत्या. हे आपल्याला सहज लक्षात येते.कारण आधुनिकता आणि परंपरा यांच अतुट असं नातं.... उदाहरणार्थ जर आपण बघितले की नोबेल पारितोषिक  भारतातील फक्त एकाच व्यक्तीला मिळाले ते म्हणजे रविंद्रनाथ टागोर.  त्यांचे चरित्र  वाचल्यानंतर   लक्षात येते की, त्यांचे दोन भाऊ ब्रिटिशांच्या कचेरीत कामाला होते.ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कलकत्ता येथे झाली होती आणि तेथून पुढे त्यांनी सगळीकडे हात - पाय पसरवले .त्यांच्याच कचेरीत कामाला असणारे त्यांचे दोन भाऊ आणि या पार्श्वभूमीवर टागोरांचे इंग्रजीतून शिक्षण तसेच अर्जेटिंनात वास्तव्य ; या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर  या वसाहतीमध्ये आपण सर्वानाच गुलाम म्हणून किंवा तेथे आपण शोषण करत आहोत असं चित्र जगापुढे येऊन आपली काहीतरी नाचक्की होऊ नये,या हेतूने इंग्रजांनी ज्या काही सुधारणा येथे केल्या होत्या ;जे काही उदारमतवादी धोरण दाखवले होते ;त्या धोरणाचाच हा परिपाक असल्याचाच एक मतप्रवाह आपल्याकडे आढळतो .तो याचमुळे आढळतो.पिपिलिका ही सत्यशोधकी वळणाने व्यक्त होणारी कादंबरी आहे.सत्यशोधन हा तिचा गाभा आहे.सत्याची अनेक रूपे ती दाखवत जाते.
   मराठीत उत्तरआधुनिक अंगाने विलास सारंग, सतिश तांबे, विजय तांबे, ग्रेसी कुळकर्णी यांनी लेखन केलेले दिसते. म्हणजे त्यांचे लेखन उत्तर आधुनिकतेच्या अंगाने अभ्यासता येतात.
   पिपिलिका ही कादंबरी उत्तरआधुनिकतेच्या अंगाने तपासता येते.
 १. आम्ही चौघी दुर्जनं दुष्टाला वश करण्याची प्रतिज्ञा करत आहोत . खरोखर कुतूहल म्हणून हालाहल पिण्याची इच्छा करत आहोत . जीव घेणाऱ्या आगीचं खुशाल सर्व बाजूंनी चुंबन घेण्याची इच्छा व्यक्त करत आहोत . गाढ आलिंगन देण्याची इच्छा करत आहोत . खरोखर अतिशय विषारी सापाला आलिंगन देण्यासाठी प्रयत्न करत आहोत . साधु ... साधु ... साधु ... हे जग्गनाथा दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोबा तू म्हटले गंधवाला ,त्याच दिशेने जात आहे . आम्ही मुस्लिम होऊन तुझं मुस्लिम मन वाचतोय . मोहिनी मोहिनी कहा चली । बाहर खुदाई काम कन चली । फलानी फलाने को देखै , जरै मरे । मेरे को देखकर पायन पडै । छु मंत्र काया , आदेश , गुरु की शक्ती , मेरी भक्ति , फुरो मंत्र ईश्वरो वाचा || वशीकरण मंत्र वाचा वाचा पुजा पुजा आणि पुजा जाहिरातीच जाहिराती हे नेटकऱ्यांनो आम्ही येत आहोत .[ पृ.१३५]
यात संकल्पनांची व्यामिश्रता, प्रतिमांची मोडतोड, चमत्कारिक शब्दकळा अभ्यासण्यासारखी आहे किंवा हा उतारा पहा.
२.गंधवाल्याला ही जातककथा काही आवडलेली नव्हती . त्याचा आणि आमचा संघर्ष हा कायमच होता . म्हटलं तर गंधवाला म्हणजे काय ? त्यादृष्टीने तशी ती एक अदृश्य शक्ती होती . जी आम्हाला मूर्त स्वरूपात दिसत होती . कधी अमृर्त होती . धुतरी धुतरी होती . तिनं एकदा उवाच केलं की आमच्या डोक्यात भिनायला लागायचं , चार मनांच्या चार म्हणी कार्यरत व्हायच्या . म्हण म्हणजे अनुभवच असायचा . ती धुतरीच्या लोककथेतील असायची . आमच्या अंगात आलं की वाटायचं गंधवाल्याला चांगलं चोपून काढावा . हिंसा हे काही उत्तर होऊ शकत नाही . याची जाणीव होती . विचार आणि विचार फक्त विचार आणि विचाराने उत्तर . मला माहीत होतं . आमच्या अंगात आलं होतं . मन १ : काळी उवाच : ती पिसाळली की कुत्रं बडवायला लागते . कुत्रं उवाच म्हणून तिची बडबड सुरू होते . “ श्वानाय नमः बडविंगम् बडविंगम् बहु बडविंगम . जिथं भागिंगम् तिर्थमं बडविंगम , दगडंमं स्पर्शम् भिरकाभंगम् भागंमंगम् भागमंगम् रस्तोरस्ती भागंगम् अथ जिवस्य लक्षणम् " मन २ : तांबडी उवाच : ती पिसाळली की वारूळाच्या मातीचे सागरगोटे करून चल्लस खेळायची . दर डावाला आकाशाकडे पाहून पाढे म्हणायची बे एके बे वाटेत होते काटे मी सोडून सगळेच चाटे बे दुने आठ आपलेच सराटे आपलेच बोराटे बे पंचे बारा चारा गारा आणि माझाचं मला वारा [ पृ १३३ ]

उत्तर आधुनिकतेच्या  काही  संज्ञा पुढीलप्रमाणे सांगता येतात.

१. भाषिक मोडतोड
२.आकृतीबंधाची वेगळी संरचना
३. कथनाची आगळी शैली.
४. पुराणकथांचा नवा अर्थ
५. आधुनिकतेच्या पलीकडील अभिव्यक्ती 
६. मूलगामी व्यवस्था विश्लेषण
७. विरचना
८. उपहास 
९. सत्याच्या अंगाने 
राजकीय  विश्लेषण .
 
या पार्श्वभूमीवर आपण पिपिलिका कुठे बसते हे ताडून पाहू शकतो.
तूर्त इतकेच.

- डॉ. संजय बोरुडे

MAGAZINE CORNER JAN 2022

 


VIDYA PRATISHTHAN'S 

POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR 
LIBRARY

VIRTUAL LIBRARY 

Saturday, January 15, 2022

पुस्तकाचे नाव* : यशस्वी आणि समाधानी जीवनासाठी दहा रहस्ये

*वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य*
*परिचय कर्ता* : ढाकणे विवेकानंद भानुदास 
*पुस्तकाचे नाव* : यशस्वी आणि समाधानी जीवनासाठी दहा  रहस्ये 
 *लेखक* : डॉक्टर बी.एन.डब्ल्यू. डायर अनुवाद : विद्या अंबिके 
*प्रकाशन वर्ष व आवृत्ती* :नोव्हेंबर 2018 
*एकूण पृष्ठसंख्या* :152 
                                                जीवन जगत असताना कायम उपयोगी पडावे अशी दहा रहस्ये असलेलं हे एक रहस्यमय पुस्तक आहे. मूळ लेखक एक उत्तम वक्ते आहेत. त्यांचे जीवन यशस्वी होण्यामागचे रहस्ये या पुस्तकात मांडले आहेत. अगदी पुस्तक वाचायला हातात घेतल्यावर पुस्तकाचा शेवट केल्याशिवाय पुस्तक हातातून खाली पडणार नाही.असे  उत्तम व रहस्यमय विचार यात मांडलेले आहेत.खरं तर पुस्तक वाचण्यापूर्वी मी एका वेगळ्या विचाराने मानसिक तणावात होतो, पण पुस्तक वाचत वाचत माझे मन हलके व्हायला लागले. वेगळी आत्मशांती मला लाभायला लागली. या पुस्तकातील प्रत्येक वाक्य हे विचार करायला लावणारे आहे. लेखकाचा परिचयच पुस्तक वाचण्यास प्रेरित  करणारा आहे. परिचयच्या  आतच लेखकांनी सर्वासाठी खूप सारं प्रेम आणि सदिच्छा सर्वांना दिल्या  आहेत. या पुस्तकात एकूण रहस्ये यांचा विचार मांडण्यात आला आहे. क्रमगत विचार केल्यास प्रत्येक गोष्टीसाठी खुलं पण कुठलीच आसक्ती नसणारा मन हे पहिलं रहस्य माणसाला खूप काही शिकवून जाते. जसं घडतय तसं घडू द्या. जीवनाच्या प्रत्येक प्रक्रियेचा आनंद घ्यावं, पण कधीही तुमचा आनंद किंवा यश इतरांवर अवलंबून असू देऊ नका. आपल्या जीवनातील किंवा आपल्या जवळील सर्व नात्यांना गुणदोषांसहित स्वीकारा कुठल्याही आसक्तीशिवाय त्यांच्यावर प्रेम करा. यात  विचार वाचत असताना आवडलेली  काही वाक्य १)’ माणसाच्या जीवनात जेवढा जास्त संयम असेल तेवढेच लवकर परिणाम मिळतात.’ २) एखाद्या गोष्टीत अपयश आलं तर त्यात तुम्ही स्वतः कडून जास्त अपेक्षा ठेवल्या ही समस्या नसून तुम्ही स्वतः कडून खूप कमी अपेक्षा ठेवल्या हीच समस्या आहे. ३)आज मला जे काही वाटते ते बोलण्याची माझी इच्छा आहे पण कदाचित उद्या याच्याच विरुद्धही बोलू शकेल असा ही मी संकेत देतो.
                                            दुसऱ्या रहस्याचा विचार केला असता -तुमच्या आतील संगीत जिवंत ठेवा या रहस्यात  लेखक म्हणतो आपल्याकडे डावा मेंदू आणि उजवा मेंदू असतो त्यातील डावा मेंदू हा आकडेमोड, विश्लेषण करणे, गोष्टीचा अर्थ लावणे, अतिशय तार्किक  अशा निवडी घेऊन येतो, तर हा डावा मेंदू विचार आणि  विचारच करतो. पण तुमचा उजवा मेंदू आंतरिकतेचे प्रतीक आहे. तो विश्लेषणाच्या पलीकडे जाऊन काम करतो. आपण कायम डाव्या मेंदूच्या ऐकले तर तो डावा मेंदू तुम्हाला कृत्रिम किंवा त्याहीपेक्षा वाईट एखाद्या यंत्रवत माणसाप्रमाणे बनवेल. जीवन जगत असताना तुम्हाला तुमच्या उद्देशापासून तुमच्या आत मधील संगीत ऐकल्यापासून, त्यावर वाटचाल करण्यापासून थांबवू शकते  ते म्हणजे  भीती. कोर्स इन मिरकल यांच्या मते आपल्याला महत्त्वाच्या दोनच भावना आहेत त्यापैकी एक प्रेम आणि दुसरी भीती.
                                           पुढचे रहस्य म्हणजे तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकता. लो एनर्जीमुळे लो एनर्जीच ॲट्रॅक्ट होते. खालच्या स्तरावर ऊर्जेचे विचार राग,घृणा  आत्मग्लानी , अपराधबोध आणि भीती तुम्हाला कमजोर करत नाही तर अजून त्यासारखीच विचार तुमच्याकडे आकर्षित करतात. जर आपण खालच्या स्तरावरील ऊर्जेच्या जागी तुमच्या आंतरिक विचार बदलून उच्च स्तरावरील ऊर्जा किंवा फ्रिक्वेन्सी आतमध्ये आणली जसे प्रेम, दयाळूपणा, करुणा, शांती, आनंद या गोष्टीचा विचार आत मध्ये असेल तर तुमच्याकडे अशीच ऊर्जा आकर्षित होईल आणि तुमच्याकडे देण्या साठी उच्च दर्जाच असेल. आपण खरंतर जे काही दुसऱ्यांना देतो किंवा वाटतो तेच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असते. आपण जर लोकांना प्रेम दिलं तर आपल्याकडे तेच प्रेम कितीतरी पटींनी वाढून परत येते. आपण दुसऱ्यांना दुःख दिलं तर कितीतरी पट जास्त दुःख आपल्याकडे आकर्षित होते. अतिशय सुंदर रेखाटन या रहस्यात  वाचायला मिळाले. त्यानंतर मौन हे चौथं रहस्य - निर्मितीचं मूळ मौनच आहे. यातच निर्मितीला सुरुवात होत असते. म्हणूनच लेखक सांगतात वारंवार,जेव्हा जेव्हा  संधी मिळेल तेव्हा मौनात  प्रवेश करा आणि मनाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. अगदी आत्मशांती, आत्मसमाधान मिळवण्यासाठी या रहस्याला महत्त्वाचे स्थान आहे. 
                                                       भूतकाळ आणि भविष्याचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात जीवन जगण्यास प्रेरित करणारे विचार पाचव्या रहस्यात  वाचायला मिळाले. पाचव्या रहस्यात  अगदी मनाला विचार करायला लावणारे  वाक्य म्हणजे आजपर्यंत पकडून ठेवलेल्या भूतकाळाला मी समाधानाने निरोप देतो आहे. आता त्याची मला कधीही आठवण येणार नाही. वर्तमानाला इंग्लिश मध्ये प्रेझेंट असं म्हटलं जातं. प्रेझेंट म्हणजे भेट. वर्तमानातील प्रत्येक क्षण हा खरंच आपल्याला मिळालेली अनमोल भेट असते.
                                                यशस्वी जीवनासाठी उपयोगी असं सहावं रहस्य म्हणजे मनाच्या ज्या स्थिती मध्ये समस्या निर्माण झाली ती त्याच स्थितीमधून सोडवता येत नाही. खरंतर आपण कुठल्याही  चांगल्या न वाटणाऱ्या भावनेला किंवा अप्रसन्नतेला समस्या असं नाव देतो. खरं म्हणजे ईश्वराच्या जगामध्ये समस्या नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वातच नाही किंवा समस्या असण हे  सत्य नाही. 
               सातवं रहस्य  तर खूपच  रहस्यमय वाटले ते म्हणजे इतरांना दोष देणं कधीच योग्य नसत. खरंतर समोरचा कुठलाही माणूस तुमच्या मनाप्रमाणेच वागेल असं नाही. म्हणून समोरच्याने तुमच्या मनासारखं वागलं पाहिजे ही अपेक्षा करणं बंद करा. जेव्हा तुम्ही घृणेने  उत्तर देता तेव्हा समस्येचा भाग बनता, उत्तराचा नाही. प्रेमामध्ये इतरांविषयी चीड नसते तर, उलट क्षमाशीलतेचे भाव असतात. प्रेम आणि क्षमाशीलता हे तुम्हाला तुमच्या उद्देशाच्या बाजूने काम करायला प्रेरित करतील, विरोधात नाही. 
                                    आठवे रहस्य जसं बनायचंय  तसे  आहातच असे समजून वागा. या रह्स्यात  आवडलेलं वाक्य - मनुष्याच्या आनंदासाठी त्याचं स्वतःशी प्रामाणिक असणं आवश्यक आहे. अगदी पुस्तक वाचल्यानंतर मनाला कुठेतरी आत्म शांती आणि समाधान मिळत आहे असं मला जाणवत होतं. तुम्हाला जे बनायचं आहे ते तुम्ही बनलेले  आहात, असं आतमध्ये घोषित करण्याचे धाडस जेव्हा  तुम्ही करता तेव्हा तुम्ही स्वतःला एका  नवीन उत्साही. अशा जगात घेऊन जातात. तुम्ही हेच तत्व तुमच्या प्रत्येक क्षेत्रात वापरू शकता. सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी इतराकडे आहेत पण तुमच्याकडे जर नसतील तर हीच ती वेळ आहे की, तुम्ही तुमचे विचार बदला आणि असं वागा जणू त्या सर्व गोष्टी तुम्हाला  मिळालेल्या आहेत आणि मी त्याचा आनंद घेतो.
 नवव्या  रहास्याच्या  बाबतीत जर विचार केला तर तुमचे दिव्यत्व जतन करा. तुम्ही ईश्वराचा अंश आहात, त्याची दैवी निर्मिती आहात. म्हणूनच तुम्ही जेव्हा असायला पाहिजे त्याच वेळेस येते पृथ्वीवर आहात.तुमचं शरीर अगदी योग्य क्षणी या जगाचा निरोप घेईल. पण तुम्ही ज्या शरीरात  राहता ते शरीर म्हणजे तुम्ही नाही आणि तुमचं व्यक्तिमत्त्वसुद्धा तुम्ही नाही किंवा तुमची कुठलीही संपत्ती किंवा तुम्ही प्राप्त केलेलं वैभव म्हणजे तुम्ही नाही. तुम्ही त्या ईश्वरच  प्रेम आहात. एक आश्चर्य आहात. तुम्ही ईश्वराच्या परिपूर्णतेचा एक भाग आहात. तुम्ही त्या ईश्वरी शक्तीचा भाग आहात.जी  दैवी शक्ती या विश्वातील प्रत्येक गोष्ट चालवते. या जगामध्ये  हीच दैवी शक्ती प्रत्येक गोष्टीची अतिशय हुशारीने निर्मिती करत असते.जेव्हा जेव्हा तुम्ही या  दैवतवाला नाकारत असता. आणि मग तुमचा अहंकार तुमच्या मनाचा ताबा घेतो आणि तुम्ही ईश्वरापासून वेगळे आहात असं पटवून देतो. तुमचा अहंकार तुम्हाला सातत्याने भीती, चिंता अस्वस्थता आणि त्या तनावाला  खाली ठेवतो. सातत्याने तुम्हाला सांगत असतो की, तुमच्या आजूबाजूच्या लोकांपेक्षा तुम्ही सरसच असले पाहिजे. म्हणूनच तो सातत्याने तुम्हाला विनवणी करत असतो की, तुम्ही काहीही करून ईश्वराला स्वतःच्या बाजूने करून घ्या. थोडक्यात सांगायचं झालं तर, अहंकार  हा तुम्हाला ईश्वरापासून वेगळं करत असतो .
                                दहावे  रहस्य म्हणजे दुबळ बनवणारे विचार टाळण्यातच खरी हुशारी आहे. कोणताही विचार तुम्हाला एकतर ताकद देतो किंवा दुबळ बनवतो म्हणून आपल्या मनात निर्माण होणाऱ्या विचारावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. तुम्हाला सर्वात दुबळा बनवणारा विचार कोणता असेल तर तो आहे अपराधीपणाच्या विचार, स्वतःची लाज वाटण्याचा विचार किंवा मानहानीचा विचार म्हणूनच स्वतःला माफ करणं अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्ही स्वतः विषयी लाजिरवाणा विचार घेऊन फिरत असेल तुमच्या भूतकाळात तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील आणि त्याचा अपराधबोध घेऊन तुम्ही करत असाल तर तुम्ही स्वतःला शारीरिक मानसिक स्तरावर दुबळे बनवत आहात. त्याचप्रमाणे समोरच्या माणसाचा जर तुम्ही अपमान केलात किंवा त्याला वाईट वाटेल असं बोललात तर, त्याला दुबळे बनवता आणि त्या माणसाची ऊर्जा तुम्ही काढून घेता.
                                          अशाप्रकारे प्रत्येकाला उपयोगी पडेल अशी दहा रहस्ये लेखकाने या ठिकाणी मांडलेले आहेत. अगदी मनापासून हे  पुस्तक मला आवडले . जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर उपयोगी पडणार हे पुस्तक आहे.आपणही हे पुस्तक वाचावे.  वाचनासाठी आपणास सर्वांना शुभेच्छा !

Friday, January 14, 2022

कादंबरी: द काउन्ट ऑफ मॉन्टे क्रिस्टो

एक खिळवून ठेवणारी सुडाची कहाणी!

प्रेम आणि सुड या दोन भावनेनं काठोकाठ भरलेल्या या कथेमध्ये तितकाच थरार आणि सस्पेंस ठासून भरलेला आहे.रोमांचक! अद्भुत आणि जगप्रसिद्ध! या फ्रेंच भाषेतील कादंबरीला नेपोलियन बोनापार्ट च्या सत्ता संघर्षाची पार्श्वभूमी आहे! तसाच फ्रान्स मधील रोमँटिक संस्कृतीचा  प्रभाव आहे.

कादंबरी: द काउन्ट ऑफ मॉन्टे क्रिस्टो

मूळ लेखक:अलेक्झान्द्र द्द्युमास

मराठी अनुवाद आणि संक्षिप्तीकरन: प्रणय सखदेव

पृष्ठ:२५२ मूल्य:३००/ सवलत मूल्य:२७०/

टपाल:३५/ एकूण:३०५/

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.

मो:9421605019

ज्ञानसाधना पुस्तकालय, परभणी

टिप: याच लेखकाची 
द थ्री मस्कटीअर्स:३००/ दोन्ही एकत्र घेतल्यास:५६०/ होम डिलिव्हरी होईल.

एडमंड डान्टे एक खलाशी नवयुवक!आकर्षक, सुंदर आणि रुबाबदार! नुकतेच मिसरूड फुटलेला तरुण! आकाशाला गवसणी घालत जगण्याचा त्याचा काळ!जसा हँडसम तसाच शुर आणि धाडशी! तितकाच चतुर आणि निष्ठावान!

गरिबीत गेलेलं बालपण ! स्वतःच्या मेहनतीने आणि कर्तुत्वाने समृध्द जीवन जगण्याचे स्वप्न पाहणारा एडमंड जणू एक राजकुमार!अर्थातच त्याला एक  शोभेल अशी प्रेयसी आहे! ती त्याचा जीव की प्राण!सुंदर पण जबाबदार! सहनशील आणि समर्पित! दुर्मिळ  व्यक्तिमत्वाची ही सुंदरी त्याच्या जीवनाला एक अर्थ प्राप्त करून देते!

अथांग सागराची सफर करताना स्वाभाविकपणे अनेक संकट आणि वादळं येतात.यातून हा तरुण नवनवे अनुभव घेत जातो.निष्ठा आणि कष्टाच्या जोरावर तो जहाजाच्या कॅप्टन च्या मर्जीतील एक लाडका ऑफिसर होतो....हो अर्थातच जहाजावर त्याच्यापेक्षा जेष्ठ आधिकारी कार्यरत असतात!

एका दिवशी अचानक कॅप्टन ला असह्य वेदना सुरू होतात....त्यातच कॅप्टन चा मृत्यू होतो.सगळी खलाशी आणि आधिकारि गांगरून जातात.पण हा नवखा तरुण जहाजाची जबाबदारी अंगावर घेतो.अनेक संकटातून जहाज सुखरूप घेऊन येतो...कॅप्टन ने सांगितलेल्या सर्व धाडशी मोहिमा पूर्ण करून!

ते एक विशाल जहाज असते.अतिशय लोकप्रिय! ज्याला पाहायला नेहमी गर्दी होते!जहाजाच्या मालकाला तर हे जहाज जणू प्राणप्रिय!जेंव्हा जहाजाचा मालक एकूण घटनाक्रम माहिती करून घेतो, तेंव्हा त्याला आपला कॅप्टन नाही याचा शोक होतो पण त्याच वेळी नवीन कॅप्टन मिळाल्याचा आनंद! 

एडमंड डान्टे हाच आपला नायक! कर्तुत्ववान! रूपवान आणि नशीबवान!तारुण्याच्या पदार्पणातच जगप्रसिद्ध जहाजाचा कॅप्टन! सुंदर प्रेयसी!मालकाचा विश्वास आणि खास साथ! भरपूर पैसा! सुखी संसाराची स्वप्न पाहणारा एडमंड डान्टे  मात्र आपले स्वप्न पूर्ण करू शकत नाही!

गरिबीत वाढलेला एडमंड डान्टे सुखी होण्याचे स्वप्न पाहतो ,पण त्याचे स्वप्न स्वप्नच राहते.साखरपुड्यातूनच त्याला होते अटक आणि मग कधीही न संपणारी कैद!

स्वप्नांचे वाटोळे!मालकाच्या लाख प्रयत्नांना यश काही येत नाही आणि एडमंड डान्टे काही सुटत नाही. घरचे कर्ज फेडून स्वाभिमानी वडील अक्षरशः उपासमारी ने पाय खोडून मारतात.प्रेयसी तिला आणि त्याला नको असलेल्या माणसासोबत लग्न करते.जहाजाचा मालक आणि त्याची कंपनी दिवाळखोरीत निघेते.....

असे काय घडले होते? काय गुन्हा केला होता आपल्या नायकाने?एडमंड डान्टे कडे असे कोणते पत्र होते, ज्यामुळे त्याला जन्मकैद झाली होती!

कोणताही गुन्हा न करता आयुष्याचे वाटोळं होताना दिसते तेंव्हा कोणाचं चित्त जागेवर राहील?त्याला तर कोण्या अज्ञात बेटावर कैदी म्हणून ठेवलं होतं जेथून केवळ मृत्यूची बातमी बाहेर येत असे.कैदी बाहेर येणं जवळपास अशक्य!

एडमंड डान्टे निराश , हताश आणि उदास जीवन जगतो. जगतो कसला मृत्यू येत नाही म्हणून जिवंत राहतो.त्याला आपली सुटका कधीच होणार नाही याची पूर्ण खात्री पटते आणि तो जीवन संपवण्याच्या मागे लागतो.आत्महत्या करण्याची पूर्ण तयारी करतो.पण....

हा पण या कादंबरीतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आहे.जेलमध्ये त्याला भेटतो एक कैदी! जो त्याला जीवनाचा अर्थ शिकवतो.शिकवतो नवी विद्या! शिकवतो नवे प्रयोग! सांगतो जगातील मोठ्या खजिन्याचे रहस्य! करतो त्याला त्याचा वारस! आणि जातो जग सोडून कायमचा!

तो अभ्यद्य तुरुंग! एडमंड डान्टे या तुरुंगातून पसार होतो....त्या न केलेल्या गुन्ह्याच्या शोधात!त्याच्या आयुष्याची, त्याच्या प्रेमाची, त्याच्या परिवाराची राख रांगोळी केलेल्या शत्रूच्या मागावर!

एक कोवळा उत्साही, उमदा, रुबाबदार ध्येयवेडा तरुण होता तो जेंव्हा या तुरुंगात डांबला तेंव्हा!नवरदेवाच्या वेशातील सजलेला एडमंड डान्टे येताना या जेलमध्ये आला होता.. पण आता तो समुद्र पोहून जाताना मात्र एक मतलबी,धूर्त आणि क्रूर काळजाचा "बदले की आग" घेऊन जगणारा महाभयंकर ज्वालामुखी होऊन जात होता! छातीपर्यंत वाढलेली दाढी!राकट चेहरा! १९ व्या वर्षी आलेला तो उमदा  तरुण आज ३३ वर्षांचा जेलमधून पळून आलेला कैदी होता.

पण तो बाहेर कसा आला?

त्याला इतकी प्रचंड संपत्ती कशी मिळते?

तो आपल्या शत्रूंचा पाठलाग कसा करतो?

जेलमधील तो वेडा जो त्याचा जिवलग मित्र, गुरू आणि मानलेला पिता होतो...त्याने याला वारस का केलं?

तो सूड कसा घेतो? 

ते बेट ज्यावरून या कादंबरीचे नाव पडले ते काय आहे?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच ही फ्रेंच कादंबरी वाचूनच मिळवावेत! त्याच्यातच खरी मजा आहे.

मला खात्री आहे, ही कादंबरी कधीही पुस्तक न वाचणाऱ्या वाचकाला ही खिळवून ठेवते.मी तर परिचय लिहिण्यासाठी वाचायला सुरू केलेली कादंबरी पहाटे संपवूनच झोपी गेलो....अथांग समुद्रातील जहाजातून प्रवास करत...ज्याचा कॅप्टन एडमंड डान्टे होता!

या कादंबरीचा लेखक अलेक्झान्द्र द्द्युमास  अतिशय लोकप्रिय! स्वतःच्या लिखाणातून अमाफ संपत्ती कमावून एखाद्या राजवाड्याला शोभेल अशा महालात राहायचा.कमालीचे शौक आणि उधळपट्टी! शेवटी कर्जबाजारी होऊन  कफ्ल्लक जीवन जगावे लागले.... देशोधडीला लागला देश सोडून पळून गेला.सुंभ जळाले होते पण पिळ जात नव्हता.स्वतःच्या लिखाणावर प्रंचंड विश्वास असलेला अलेक्झान्द्र द्द्युमास सांगत असे,"आलेल्या यमाला ही एक सुंदर भन्नाट कथा सांगेन! ती ऐकून तो मला सोडून तसाच निघून जाईल!"

पुस्तक:"जेव्हा आशिया म्हणजेच जग होतं

पुस्तक:"जेव्हा आशिया म्हणजेच जग होतं :ज्ञान , व्यापार आणि युद्धशास्त्र यांच्यामुळे संपन्न झालेल्या मध्ययुगीन आशियाचे दर्शन तत्कालीन फिरस्त्यांच्या नजरेतून "

लेखक : डॉ. स्टुअर्ट गॉर्डन

अनु. र. कृ. कुलकर्णी

किंमत - रु 299

सवलत:१५% सूट!

सवलत मूल्य:२५४/

 टपाल:३६/ एकूण:२९०/

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून संपर्क नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.

फोन पे, गुगल पे, Paytm:9421605019

रावजी लुटे यांचे ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी

इ. स. ५०० ते १५०० या कालखंडात आशिया हा विस्मयजनक, एकसंध आणि नवनव्या शोधांनी गजबजलेला प्रदेश होता. जगातील सगळ्यात मोठी पाच शहरे आशियात होती आणि ती शहरे पाच मोठ्या साम्राज्यांच्या केंद्रस्थानी होती. याच आशियातील गणितींनी शून्य आणि बीजगणित यांचा शोध लावला. येथील खगोलशास्त्रज्ञांनी ग्रह-तार्‍यांचा अधिक अचूक वेध घेताना नौकानयनासाठी उपयुक्त वेधयंत्राचा ( Astrolabe ) शोध लावला. याच काळात आशियातील साहित्यनिर्मितीही नवनिर्मितीच्या अत्युच्च शिखरावर होती. आज घडीलादेखील आपला प्रभाव कायम असलेल्या विचारधारांचा उगम याच काळात झाला आणि तत्त्ववेत्त्यांनी प्रभावी कायद्यांची रचनादेखील याच काळात केली.

या कालखंडात जीवन व्यतीत केलेल्या माणसांच्या स्मृतिग्रंथांवर या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण आधारित आहे. ह्या निर्भीड आणि साहसी माणसांनी समुद्र-सफरी केल्या, वाळवंटे तुडवली आणि सर्वोच्च पर्वतांची शिखरे सर केली. दक्षिण रशियातील बुल्गर ते आग्नेय आशियातील बुगी अशा वैविध्यपूर्ण जमातींमधील लोकांबरोबर, आपल्याला अवगत नसलेल्या भाषांमधून व्यवहार करण्याची किमया आशियातील या लोकांनी साध्य केली होती.

यांचे स्मृतिग्रंथ वाचताना आपल्यालाही त्यांच्या तांड्यांबरोबर आणि जहाजांबरोबर प्रवास केल्याचा अनुभव येतो; त्यांनी सहन केलेली रक्त गोठवणारी थंडी आणि त्यांचा थकवा यांचा जणू आपल्यालाही प्रत्यय येतो; त्यांच्या आशाआकांक्षांचे आणि मनातील भीतीचे आपण साक्षीदार होतो आणि या मध्ययुगीन महान आशियाई जगताच्या श्रीमंतीने आणि आश्चर्यकारक प्रगतीने आपण थक्क होऊन जातो.

याच लेखकाचे द मराठाज (१६०० ते १८१८) हे ही पुस्तक उपलब्ध आहे. मूल्य:२९५/

दोन्ही पुस्तकं एकत्रित खरेदी (२९९+२९५+५६ टपाल=६५०)केल्यास:सवलत मूल्य:५३०/ मध्ये होम डिलिव्हरी होईल!




पुस्तक क्रमांक :१ "तंट्या

"तुम्हाला माहिती आहे का?"

"कोणतेही रेल्वे स्टेशन नसताना पातालपाणी जंगलात प्रत्येक रेल्वे क्षणभर का थांबते?"

 "रेल्वे नाही थांबली तर ती पुढे जाऊन अपघातग्रस्त होते असे का म्हणले जाते?"

"मोटरमन (रेल्वे ड्रायव्हर) आपली रेल्वे क्षणभर थांबवून, हॉर्न वाजवून कोणाला मानवंदना  देतो?"

"कोण होता हा भारताचा रॉबिन हुड? गोर गरीब आदिवासी,शेतकरी, जनतेचा मामा?"

"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पुस्तक माला"

पुस्तक क्रमांक :१  "तंट्या"

तो दरोडेखोर! 
तो डाकू! तो खुनी! तो लुटेरा! मालगुजरपाटील आणि सावकारांचा कर्दनकाळ!त्याचे नुसते नाव ऐकताच  हातापायाला कंप सुटायचा! त्याला समोर पाहून सावकारांची धोतरं ओली व्हायची! घरात आहे नाही ते समोर आणून दिलं जायचे! त्याचा दराराच तसा होता! त्याला पकडायला गेलेल्या कित्येक पोलिसांना स्वतःची कपडे ठेऊन, नाक मुठीत धरून पळ काढावा लागे! असा तो दरोडेखोर होता तरी कोण? 

"तंट्या"

लेखक: बाबा भांड

पृष्ठ:५२५  मूल्य:५००/ सवलत मूल्य:४५०/ टपाल:३५/
एकूण:४८५/

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा ही विनंती.

मो:9421605019

रावजी लुटे यांचे ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी

वरील क्रमांकावर फोन पे, गुगल पे,Paytm ची व्यवस्था आहे.बँक खात्याचे डिटेल्स व्हॉट्सअपवर मिळतील.

कॅश ऑन डिलिव्हरी ची व्यवस्था नाही.क्षमस्व!

पोलिसांचा खबऱ्या बनून जंगलात घेऊन जाऊन त्यांचे शस्त्र आणि कपडे काढून घेणारा तंट्या!

एका फौजदाराचे त्याच्याच घरात जाऊन नाक कापणारा तंट्या!

स्वतःच्या साथीदाराने महिलेला हात लावला म्हणून त्याचा हात तोडणारा तंट्या!

गोर गरीब लोकांच्या मुलींचे लग्न लावून देणारा तंट्या!

दरोडेखोर तंट्या!भारताचा रॉबिन हुड तंट्या!

चार डिसेंबर त्याचा स्मृती दिवस! याच दिवशी तंट्या भील यांना फाशी देऊन त्यांचे पार्थिव पातालपाणी च्या जंगलात फेकून दिलं होतं.तिथेच त्यांचे स्मृती मंदिर आहे.येथेच क्षणभर रेल्वे थांबते आणि हॉर्न वाजवून मानवंदना देऊन पुढं जाते.....

मध्यप्रदेश सरकार ने नुकतेच पातलपणी रेल्वे स्टेशन चे, इंदौर चे नवीन भव्य बस स्थानक याचे नाव तंट्या भिल रेल्वे स्टेशन केलं आहे. शिवराज सिंह चौहान यांना ही मामा म्हणतात...आणि तंट्या भील यांना ही!

नीमाड चे जंगल! होळकर साम्राज्य आणि ब्रिटिश हुकमत याच्या मध्यावर!दुष्काळ आणि दारिद्र्याचे थैमान! सावकार आणि सरकार केवळ लुटण्यासाठी! माणूस म्हणून जगायचं पण काम आणि अन्न मात्र गुरा ढोरा सारखं!

उंबराच्या हिरव्या  दोड्या शिजवून खायच्या! पण मिठासाठी सावकाराकडे कष्ट करायचे!एका आण्याचे मीठ घेऊन कर्ज बाजारी व्हायचं....जंगलातील प्राणी, कंद आणि फळ यावर गुजराण करीत येथील गरीब आदिवासी जीवन जगत होती.प्रसंगी पोटातील आग पाण्याने विझवत होती भुकने व्याकुळ होऊन चक्कर येऊन पडत होती.

सावकार आणि सरकार यांचे अत्याचार सहन करत ही जनता भक्कमपणे उभी होती.प्रसंगी हातचलाखी आणि दरोडे ही टाकत पडत असत....पोलीस आणि जेल त्यांना नवीन नव्हतं. लाचारी तर जीवनाचा भाग होता.अडल नडल तर सावकाराच्या हातापाया पडून मिळवलं जायचं आणि कायमचं कर्जबाजारी होऊन बसायचं.

पण इंग्रज सरकारनं मात्र कहर केला.ज्या जंगलाच्या जीवावर हे सगळं सहन होत होतं, ते जंगल साफ केलं जाऊ लागलं.शेकडो एकर जंगल तोड होऊ लागली.जंगलातील लकाड सरकारी झाली.कोणी तोडायची नाहीत....जंगलाचा राजा आता भिकारी झाला.जंगलाचं लेकरू अनाथ झालं.जंगलाच्या कायद्यानं आदिवासी अनाथ झाले...इंग्रजांचे सहकार्य मालदार आणि सावकारांना मिळत गेलं आणि सावकार जनतेला पिडत गेले....त्यातून एक ज्वालामुखी उठला! इंग्रज आणि सावकारांना हैराण करून सोडणारा एक जन नायक तयार झाला त्याचेच नाव तंट्या!

तंट्या चे मुळ नाव तात्या! तात्या हा अतिशय साधा आणि सरळ! मोकळ्या मनाचा! 

एक सामान्य भील परिवारातील तरुण तात्या नावाचा तरुण! किरकोळ शरीर! पाच फूट काही इंच उंची! आदिवासी दिसतात तसे उंच कपाळ आणि बसके नाक!

आई वडील गमावलेल्या तंट्या वर गावकऱ्यांनी पाटलाच्या पोरीसोबत यशोदा सोबत तंट्या चे सबंध जोडले.तंट्या ला बदनाम केलं.गावाबाहेर त्याला पळून जावे लागले.आज इथं तर उद्या तिथं असे त्याचे जीवन होरपळून निघत होत. बायको भिकी आणि पोरगं किसन तंट्या सह भरडून निघत होते.कोणताही दोष नसताना तंट्या सहन करत होता.

गाव देवीला सोडलेल्या रेड्याने गावभर उभा धिंगाणा घातला असताना त्या रेड्याला चित्त लोळवला तो तंट्या ने! येथूनच त्याच्यातील शक्ती समजली.भिल्लाना त्याचा अभिमान वाटू लागला तर सावकार ला हेवा!

कर्जापायी अपमानित होऊन जीवन जगणारा बाप! सावकाराने मारल्याचा राग घरी बायकोवर अर्थात तांत्याच्या आईवर काढतो...त्यातच तिचा देह निष्प्राण होऊन जातो.काही दिवसांनी अपराधी मनाने खंगुन बाप ही मरतो! तंट्या अनाथ! केवळ कर्जामुळे! आपली पिढीजात जमीन मागायला दुसऱ्या गावी जातो तर तेथील पाटील दोन वेळा गोडी गुलाबी करून फसवतो आणि जेलमध्ये टाकतो.तीन वेळा जेलमध्ये गेलेला तंट्या पोलिसांच्या हुशारीने नाही तर फसवणुकीने पकडला गेला.तिसऱ्या वेळी मात्र तो जेल फोडून आव्हान देऊन निघुन येतो.

जेलमध्ये अनेक साथीदार जमवतो.काही शिकलेले स्वातंत्र्याची आस असणारे ही भेटतात.त्यातील एक त्याचा गुरू!दौल्या सारखे महकाय साथीदार त्याचे बळ वाढवतात! 

होळकर साम्राज्य तंट्या ला अप्रत्यक्ष मदत करते.इंग्रज कायम होळकर दरबारात तक्रार करत असतात.होळकरांची सहानुभूती असल्याने तंट्या आणि साथीदार कायम होळकर सरहद्दी मध्ये राहू लागतात.

मुजोरी करणारे सेठ सावकार लुटायचे! त्यांना ठोकून काढायचे! त्यांच्यावर खंडणी बसवायची आणि ती संपत्ती गोर गरीब लोकांच्या कामाला लावायची!हा तंट्या कामधंदा झाला.अनेक वर्षे इंग्रज पोलीस मागावर असताना, तंट्या त्यांना झुलवत होता.खेळवत होता.

निमाड ची जनता आता उघडपणे तंट्या ला मदत करत होती.तंट्या बाजारात राजरोसपणे फिरत होता.पोलिसांना बातम्या उशिरा कळत होत्या तर तंट्या ला पोलिसांची तत्काळ माहिती मिळत होती.

या कादंबरीतील एकेक प्रसंग अतिशय सुंदर रित्या मांडला आहे.

तंट्या एकाच वेळी अनेक ठिकाणी दरोडा घालत असे.त्यामुळे तंट्या चे अनेक अवतार आहेत असा ही समज लोकांमध्ये पसरलेला होता.

एका साधूच्या दर्शनाला गेला असता त्याला साधूच्या शरीराचे तुकडे तुकडे दिसले होते.त्याला प्रचंड धक्का बसतो.धक्यातुन आणि गुहेतून बाहेर येताच त्याला तो साधू दर्शन देतो.तू काही पहिलाच नाहीस असे सांगतो त्याला. असे अद्भुत वर्णन सोडलं तर लेखकाने या कादंबरीत दंतकथा येऊ दिल्या नाहीत....

लेखकाने दोन वर्षे त्या भागात वास्तव्य करून, फिरून लोकांना भेटून अभ्यास करून ही कादंबरी लिहिली आहे.अतिशय प्रभावी! सुंदर! एकेक वर्णन अंगावर शहारे आणणारे!

लेखकाची निरीक्षण क्षमता प्रचंड! आदिवासी आणि जंगली जीवनाचे हुबेहूब दर्शन या कादंबरीत घडते.कमरेच्या लाल करदोड्याचा काळपट पाडलेला रंग जेंव्हा लेखक लिहितो तेंव्हा कळतं की किती सूक्ष्म निरीक्षण!

बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यांच्या वापरामुळे ही कादंबरी अतिशय सुंदर झाली आहे.आपण खंडवा परिसरात आहोत असे वाचकांना वाटायला लागते.आपण जंगलात आहोत असे वाटायला लागते.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील या जन नायकाला शेवटी विश्वासघात नडतो.मानलेल्या बहिणीच्या नवऱ्याने दगा दिला. राखी बांधून घ्यायला गेलेल्या तंट्या ला पोलीस पकडतात....पुढे फासी!

भारताच्या स्वातंत्र्यासाठी हजारो नायक पुढे आले होते
त्यांनी स्वतःचे बलिदान दिलं आहे...त्यांची ओळख आपल्याला असायला हवी याच अपेक्षेने हा पुस्तक परिचय!

आपण ही कादंबरी वाचावी! ही पोस्ट किमान पूर्ण वाचावी. पुढे पाठवावी!

Thursday, January 13, 2022

रोजगार समाचार (हिंदी ) 08- 14 -January-2022

  विद्या प्रतिष्ठान 

तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर ,पुणे 
रोजगार समाचार (हिंदी )

08- 14 -January-2022




रोजगार समाचार (हिंदी ) 1-7-January-2022

 विद्या प्रतिष्ठान 
तंत्रनिकेतन महाविद्यालय ,इंदापूर ,पुणे 
रोजगार समाचार (हिंदी )

1-7-January-2022


Employment-news- 08 January 2022 to 14 January 2022

 

VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS 


Employment-news- 08 January 2022 to 14 January 2022

Click Here to View e Employment News 



Source :- https://www.gisvacancy.com/news/employment-newspaper-this-week/

Tuesday, January 11, 2022

" Swami Vivekananda Jayanti " January 2022

 


Vidya Pratishthan's Polytechnic College Library, Indapur, 

                         ONLINE QUIZ ON

              " Swami Vivekananda Jayanti " January 2022

Swami Vivekananda is one of the best-known young generation monks in the world. Swami Vivekananda’s birthday is celebrated on the 12th of January every year in India. The day is observed as the National Youth Day
Source:- Internet

Vidya Pratishthan's Polytechnic College Library, Indapur, organizing the online Quiz on the this occasion 

Participate in online Quiz and receive e-Certificate  of the participation to your correct email Id. 

CLICK HERE TO ATTEND ONLINE QUIZ

Monday, January 3, 2022

POST: CNC OPERATOR - Diploma in Mechanical Engineering

 Artificial Limbs Manufacturing Corporation of India (ALIMCO)


POST: CNC OPERATOR - Diploma in Mechanical Engineering 

Advt- Link -  To open Click Here

Vacancy Description:

Current Recruitment Description

Advertisement No.:AD-3F-01-DEC.21
Title:Notice for Various Post of Direct Recruitment.
Publication Date:16/12/2021
Expiry Date:19/01/2022
Description:

Notice for Various Post of Direct Recruitment.

Mandatory Document

Employment-news- 01 January 2022 to 07 January 2022

 

VIDYA PRATISHTHAN'S
POLYTECHNIC COLLEGE,INDAPUR
LIBRARY
e_EMPLOYMENT NEWS 


Employment-news- 01 January 2022 to 07 January 2022




Sunday, January 2, 2022

Savitribai Phule's Birth Anniversary Jan 2022

 

                          

Vidya Pratishthan's Polytechnic College Library, Indapur, 

                         ONLINE QUIZ ON

               Savitribai Phule's Birth Anniversary    

January 3 marks the birth anniversary of Savitribai Phule, a social reformer, educationalist, and poet from Maharashtra, who was regarded as the first female teacher of India.

Vidya Pratishthan's Polytechnic College Library, Indapur, organizing the online Quiz on the this occasion 

Participate in online Quiz and receive e-Certificate  of the participation to your correct email Id. 

CLICK HERE TO ATTEND ONLINE QUIZ