WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Sunday, October 17, 2021

४} पुस्तकाचे नाव :- वंचिताच्या वेदना

१} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.
२} परिचय कर्ता नाव :- राजू गरमडे
३} पुस्तक क्रमांक      :-  ३६
४} पुस्तकाचे नाव       :- वंचिताच्या वेदना
५} कवीचे नाव           :-  राजेंद्र एन.घोटकर
६} प्रकाशक               :- शब्दजा प्रकाशन,अमरावती
७} प्रकाशन वर्ष व आवृत्ती :-  २०१९,पहीली.
८} एकूण पृष्ठ संख्या :-  १२०
९} वाड् मय प्रकार    :-  कवितासंग्रह
१० } मूल्य               :- ₹ १८० / - फक्त

—  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  — 

पुस्तक परिचय क्रमांक :- ३६
कवितासंग्रह                :-  वंचितांच्या वेदना
कवी                           :-  राजेंद्र घोटकर

—  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —  —

एक प्रतिभावंत युवा कवी,लेखक श्री.राजेंद्र घोटकर यांचा * वंचितांच्या वेदना * हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला.सर्वप्रथम त्यांचे मी मनापासुन अभिनंदन करतो.कवी हे शिक्षक आहेत.विद्यार्थ्यामध्ये मानवी मुल्याची पायाभरणी आणि संस्कार रुजविण्यासोबतच ते साहित्यामध्येही आपल्या प्रतिभेने आणि सर्जनशील विचारांने आपली एक प्रतिभावंत कवी म्हणुन ओळख निर्माण केलेली आहे.आपल्या कवितेद्धारे त्यांनी विविध विषयांना स्पर्श केलेला आहे.
मानवी जीवन म्हटले की,दुःख,संकटे,गरीबी,वेदना ही ओघाने आलीच.आपल्या समाजामध्ये जी गरीब,श्रीमंतीची जी दरी पडलेली आहे ती कायम अशीच राहणार हा एक न ऊलगडणारा प्रश्न आहे.शिवाय आपल्या समाजामध्ये एक घटक कायम वंचित म्हणून जगत आहे.समाजाकडुन त्यांची होणारी ऊपेक्षा आणि अवहेलना हाच काव्यसंग्रहाचा महत्वाचा केंद्रबिंदु आहे.
कवी शिक्षक असल्याकारणाने समाजामधल हे ऊपेक्षित लोकांच जीवन पाहुन दुःखी कष्टी झालेला आहे.वंदनीय तुकडोजी महाराजाच्या विचारांचा वारसा पाठिशी घेऊन आणि समाजाप्रती आपल एक कर्तव्य म्हणुन आपल्या विचारांनी आणि चितंनातुन वंचिताच्या वेदना त्यांनी शब्दबद्ध केल्या.कवीची दृष्टी मानवतावादी आहे.मानवांच्या वेदना त्यांना सहन होत नाही.म्हणुनच त्यांनी वंचिताच्या वेदना तर मांडल्याच सोबतच शेतकर्‍यांच्या प्रश्नानांही वाचा फोडलेली आहे.शिक्षणावर ही आपली अनमोल मते मांडलेली आहे.आध्यात्मिक विषयांनाही त्यांनी स्पर्श केलेला आहे.
कवी श्री.राजेंद्र घोटकर सरांच्या सर्वच कविता एकापेक्षा सरस आहेत.
ह्या काव्यसंग्रहामध्ये एकुण ८५ कविता आहेत.जगाचा पोशिंदा बळी राजा वर त्यांनी बर्‍याच कविता केलेल्या आहेत.त्यांच्या काही प्रातिनिधीक कवितांचा ऊल्लेख करावासा झाल्यास वंचिताच्या वेदना,भाकरीचे स्वप्न,हे लोकशाहीचे ठेकेदार,ठिगळ,माझी माय,स्वैर माकडं,जीवनाचा कोरा सातबारा,ञस्त किडा,हरवलेल बालपण,आर्त अशा अनेक कविता या काव्यसंग्रहामध्ये आहे.
त्यांची पहिलीच कविता * हे लोकशाहीचे ठेकेदार * या कवितेत ते लिहीतात,
लोकशाही इथे निवडणुकापुरती  ।
नंतर भरतो फक्त दलालांचा बाजार ।।
या ओळीमधुन कवी लोकशाही ही आपल्या देशामध्ये फक्त नावापुरती ऊरलेली आहे.निवडणुक आली की,फक्त ती कागदोपञी आपल्याला अनुभवयाला मिळते पण प्रत्यक्ष्यात माञ विपरीत चिञ आपल्याला बघाव लागते.
त्यांची * ठिगळ * ही कविता दिवस राञ शेतात राबणार्‍या बळीराजावर आहे.या कवितेत ते लिहीतात,
वस्ञ अस फाटलेल,
कोठे लावावी ठिगळ ?
कोणासाठी धनी तुम्ही,
सोसता हे सगळ ?
या ओळीमधुन बळी राजाची पत्नी आपल्या घरधन्याला म्हणत आहे की,तुम्ही कशाला हे सगळ काही सोसता.ज्यांच्या पोट भराव म्हणुन तुम्ही दिवसराञ काबाड कष्ट करता त्यांना तुमची काही फिकिर नाही.आपल वस्ञच इतक फाटलेल आहे की,कुठे कुठे ठिगळ लावाव.
कवी * माझी माय * या कवितेत लिहीतात,
त्या रखरखत्या 
जळत्या ऊन्हात 
डोईचा फाटका पदर सावरते
माझी माय.......
कवीने हा वेदनेचा हुंकार अनुभवलेला आहे.कवीची आई ही रखरखत्या ऊन्हात डोईवरला फाटका पदर सावरत जात असल्यामुळे ती वेदनेची झळ प्रत्यक्ष्य भोगलेली आहे.त्यामुळेच त्यांनी लिहीलेल्या कविता वेदनेची आणि ऊपेक्षेंची झुल पांघरुण येत आहे.
कवी * स्वैर माकडं * या कवितेत लिहीतात,
गांधीजी,तुमची ती तीन माकडं
केव्हाच विसरलीत.
कवीने या ओळीमधुन महात्मा गांधीच्या विचारांना आणि मानवी मुल्यांना आजची पीढी विसरलेली आहे.आपल्याला फक्त गांधीजी जंयतीपुरतेच आठवतात.आपल्यासाठी ही एक शोकांतिका आहे.
कवी * ऊजेड वाटा झोपड्यातही * या कवितेत लिहीतात,
तुमच्या त्या कडक रोषनाईला माझी मनाई नाही
पण त्या जवळच्या कुटीत एक पणती नेऊन ठेवा.
कवी वंचिताच्या वेदना मांडता मांडता अशा ही दुर्लक्षित घटकाकडे दृष्टी वळवित आहे की,जिथे अजुनही अंधाराचे साम्राज्य आहे.तिकडेही आपली कृपा दृष्टी ठेवावी असेही कवी सांगतो आहे.
कवी * वंचिताच्या वेदना * या कवितेत लिहीतात,
आजच्या घडीला सारेच आहेत वंचित
लाभापासुन.लाभाच्या पदरापासुन.
आज माणुस हा माणसापासुन दुर गेलेला आहे.प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेतच.आपल जगण कस सुखी,आंनदी होईल याकडेच तो लक्ष ठेवुन जीवन जगत आहेत.दुःख,संकटे,अडचनी यांनीही तो ञस्त झालेला आहे.
कवी * क्रांतीज्योत तू...* या कवितेत लिहीतात,
झालीस ज्योत तू
त्या महान ज्योतीबाची 
ज्योतीने चेतवुन ज्योत 
केली होळी अज्ञानाची....
ज्योतीबाच्या खांद्याला खांदा लावुन साविञीबाई फुले नी केलेले कार्य सगळ्यांना परिचीत आहे.ज्ञानाची पणती लावुन अज्ञानाला दुर सारले आणि शिक्षणरुपी कार्याची वेल विस्तारत ठेवली.अनेकांना ज्ञानाच तेज बहाल केल.शिक्षणांचा सुर्य दोघांनी मिळुन तळपत ठेवला.
त्यांची * आर्त * ही कविता आजच्या वास्तव घटनेच प्रतिबिंब आहे.
त्यांची * कास्तकार बाप,वादळातील दीपस्तंभ,भटक्याच जीणं,ज्योतीबाचे स्वप्न,मुखवटे,मन पाखरु * यासारख्या अनेक कवितेतुन त्यांनी सुंदर अस भाष्य केलेल आहे.
या काव्यसंग्रहाला लाभलेली आचार्य ना.गो.थुटे सरांची प्रस्तावना,तसेच या काव्यसंग्रहाला श्री.सुदर्शन बारापाञे,चंद्रपुर यांनी काढलेल सुंदर आणि बोलक मुखपुष्ट त्यामुळेच हा काव्यसंग्रह सुंदर झालेला आहे.
सुप्रसिद्ध साहित्यिक श्री.डहाके सरांच मार्गदर्शन कवीला लाभलेल आहे.
या काव्यसंग्रहाचे वाचकवर्गामध्ये स्वागत होत आहे.वाचकांना हा काव्यसंग्रह अतिशय आवडलेला आहे.असा हा सर्वांगसुंदर काव्यसंग्रह आपल्या संग्रही असायलाच हवा.कवी श्री.राजेंद्र घोटकर सरांचे मनपुर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरुन शुभेछा व्यक्त करतो.
कवितासंग्रह = वंचिताच्या वेदना
कवी            = राजेंद्र घोटकर
प्रकाशक      = शब्दजा प्रकाशन,अमरावती
पुष्ठे              = १२०
किमंत           = १८० रुपये

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know