Saturday, October 23, 2021

दैनंदिन भगवद्गीता

दैनंदिन भगवद्गीता

प्रतिदिन वाचन चिंतन आणि मनन करण्यासाठी

   जिज्ञासू वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभलेला ग्रंथ 

निवेदन /निरूपण : राजेंद्र खेर /सीमंतिनी खेर

गीता हे एक निश्चित शास्त्र आहे. वेद उपनिषदांचे दोहन करून गीता निर्माण झाली. भगवंतानी स्वमुखाने गीता सांगितली हे वैशिष्ट्य आहे. समृद्ध जीवन कसे जगावे हे गीता समजवते. ते समजवण्यासाठी निर्गुण निराकार परब्रह्म सगुण साकार झाले ; आणि त्याने अखिल मानवमात्रासाठी गीतेचे तत्त्वज्ञान सांगितले! सामान्य जन, श्रेष्ठ भक्त, संसारी, संन्यासी या सर्वांना गीतेने मार्गदर्शन केले आहे. गीतेमधला प्रत्येक श्लोक भगवंताच्या आश्वासनाने ओतप्रोत भरला आहे. त्यात व्यक्तीचा आणि समष्टीचा विचार केलेला आहे. प्रत्येक शब्द तोलून मापून वापरलेला आहे. तो बदलता येत नाही.

    गीते मधले सिद्धांत त्रिकालबाधित आहेत. मानवाचा राहणीमानात फरक पडला तरी समस्या त्याच त्याच असल्यामुळे भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळात गीता मार्गदर्शक ठरते. गीता भोगलाही प्रोत्साहन देत नाही आणि त्यागाचेही समर्थन करीत नाही. गीता संयम शिकवते. राजविद्या, ब्रह्मविद्या, अध्यात्मविद्या त्याचबरोबर ज्ञान, कर्म, भक्ती याचे दिग्दर्शन गीता करते. तसेच कामपावित्र्यही गीता समजावते. गीता माणसाला मूर्ख बनवत तर नाही  मुर्खांनाही ती सुजाण बनवते!

धर्माची पुनप्रस्थापना करायची होती हे श्रीकृष्णाच्या अवताराचे प्रयोजन होते. तेच युध्दाच्या पुढच्या तीस पस्तीस वर्षाच्या काळात त्याने साध्य करून दाखविली. 

  भगवान श्रीकृष्णाच्या एका अवतार समाप्ती मुळे भगवंताचे कार्य संपत नसते.सृष्टीचे रहाटगाडगे जोपर्यंत चालू असते तोपर्यंत भगवंतांना युगायुगात पुन्हा पुन्हा अवतार धारण करावाच लागतो. सर्वत्र अधर्म बोकाळला की त्याला जन्म घ्यावाच लागतो. पण श्रीकृष्ण- वतारने केवळ तत्कालीन धर्मसंस्थापनेचे कार्य केले नाही तर पुढे येणाऱ्या अनंत पिढ्यांसाठी गीतरुपी तत्त्वप्रणाली मानवाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी दिली. 

   वेद आणि उपनिषदे यांचे सारभूत संतुलित तत्त्वज्ञान असलेल्या या भगवद्गीतेला आज पाच हजार वर्षे पूर्ण झाली. मोठमोठ्या टीकाकारांनी, ज्ञानी पंडितांनी आजपर्यंत गीतेचे विविधांगांनी विवेचन केलेले आहे.      

    दैनंदिन भगवद्गीतेचे नियमित वाचन, मनन, चिंतन करावे असा या ग्रंथामागचा उद्देश आहे. या ग्रंथाचे श्रद्धेने नियमाने वाचन, मनन, चिंतन केल्यास ऐहिक संसारातील अनेक प्रश्न सुटतील मन:शांती लाभेल आणि आत्मविश्‍वास बळावेल असा विश्वास वाटतो.

३६५ दिवस ३६५ श्लोक आणि एका पानावर एक श्लोक अशी या ग्रंथाची रचना आहे.

मूल्य: ४८०₹ टपाल ४०₹ एकूण ५२०₹ 

संपर्क: हर्षल भानुशाली पालघर ९६१९८०००३०
G pay/ phone pay/ Paytm/ Bhim 


No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know