Saturday, October 16, 2021

पुस्तकाचे नाव : त्रिवेणी

वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य

पुस्तक क्रमांक : 31.

पुस्तकाचे नाव : त्रिवेणी.

कवी : मंगेश पाडगावकर.

पृष्ठसंख्या : 102.

स्वागतमूल्य : 100रुपये.

प्रकाशन : मौज प्रकाशन गृह.

     मराठी काव्य जगतातील एक प्रसिद्ध नाव म्हणजेच कवी मंगेश पाडगावकर होय .मंगेश पाडगावकरांच्या विविध गझलांनी युक्त असे त्रिवेणी हे पुस्तक आहे . संध्याकाळचे गझल ,न गझल, बोल गझल अशा विविध गझला त्रिवेणी या गझल संग्रहामध्ये मंगेश पाडगावकरांनी अतिशय उत्कृष्ट रीतीने रचलेले आहेत.  
    हा गझलसंग्रह कवींनी कुसुमाग्रज यांना प्रेम आदरपूर्वक समर्पित केला आहे.  तुमच्या कवितेचा हात धरून माझ्या कविता चालायला शिकल्या असे समर्पक विचार त्यांनी मांडले आहेत.  
     मूड या गझलेमधे कवी म्हणतात , 
    
     किर्र वेळी पाखरू कोठून आले? 
का असे हे कापते कोणास भ्याले?

    ऊब का घरट्यातली झाली नकोशी? थंड, काळा, कापरा काळोख प्याले ;

    स्वागताला वाकली फांदी फुलांनी, टाकून  सारे परंतु का निघाले?  
 
   काय होते आता हे सांगे न काही :
ओठ गाणारे कशाने बंद झाले ? 

     एका पक्षाची मनोवृत्ती येथे या गझलमधून पाडगावकरांनी चितारली आहे . 

    रस्ते चुकल्यावर नेमकी कशी मन: स्थिती होते, हे चुकल्यावर रस्ते या गझलेतून कवी मंगेश पाडगांवकर अतिशय सुंदर पद्धतीने मांडतात.  

    चूकल्यावरीच रस्ते या भेटतात वाटा 
नसतो जिथे किनारा भिडती तिथेच लाटा  

    शिवलेत ओठ माझे, काही नको विचारू, बुडला कुणी तरी ही सुखदु खं काय काठा  !

    थंडीत गोठलेली मी बाग पाहताना ओलीस तू फुलांचा मागावयास वाटा;  

    फुलांवरील गझलेत पाडगावकर उत्तम पद्धतीने विचार मांडतात , 

     नको ना रे फुला असा आणू भरुन तू गळा
 नको ना रे नाकारूस तूला लावि लेला  लळा  

    पाहतो मी काजळले सोनारान किरणांचे, 
नाही पण विझलेला माझ्या प्राणात सोहळा ; 
 
    काठावर  काळोखात गेल्या बुडून सावल्या,
 तुझ्यासाठी गाणे झाल्या वेदनेच्या सोळा  कळा
  

    दोन ओळींनी अतिशय सुंदर आशय व्यक्त करणाऱ्या या गझली खूप आकर्षक वाटतात आणि वाचनीय वाटतात,  

     ज्याने दु :ख जाणले तो सुखाला भाळत नाही असे मत दु: ख जाणी ले  या गझलेत कवी मांडतात  

    दु :ख ज्याने जाणले तो का सुखाला भाळतो 
तू मला सांभाळ आता, मी तुला सांभाळतो  

     लागले हातास काटे, रक्त आले पाहा ;
जो कोणी काट्यास भ्याला तो फुलांना टाळतो  

     गेय वाटणार्या गझली मनाला नवीन शिकवण देऊन जातात.  

    शहरातील वस्तुस्थिती व्यक्त करताना रंगवताना मंगेश पाडगांवकर गझल रचतात , 

     दिसते  दिवे भोवती तुला शहरात या,
 काळ्या गुहा गिळती मला शहरात या 
बघतोस तू भोवती तुझ्या ही माणसे 
ही श्वापदे छळती मला शहरात या  

     दिसते तुला प्रसाद हे, ऐश्वर्य हे,
 या झोपडय़ा भिडती  मला शहरात या  

  बघतोस तू बगीच्यात ही हसरी फुले,
 पण साप हे डसती मला शहरात या  

    दिसती तुला बाजार हे  सजले इथे
ही माणसे विकली मला शहरात या  

     शहराची खरी विदारक परिस्थिती कवी मंगेश पाडगावकर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेली आहे.  

      हास्यात हुंदक्यांना  या गझलेमधे पाडगावकर शब्द लालित्याची सुंदर पध्दतीने उधळण करतात , 

     हास्यात हुंदक्याना मी आवरून गेलो,
 शोधीत मी फुलांना काठावरून गेलो  ;

    होते इमानवाले गुडघ्यात वाकलेले ,
 मी बंद या घरांच्या दारावरून गेलो  ;

   वाटा अरुंद तेथे ढळला नं तोल माझा; 
येताच राजरस्ते मी सावरून गेलो  

    एके ठिकाणी कवी पाडगावकर म्हणतात,  

    गजर नाहीच हा या गझलेमधे ते मांडतात  ,

     म्हणाले ते," गझल नाहीच हा, हे गीत आहे ,नसे येथे कुठेही इश्क; पातळ प्रीत आहे ." 

    जुन्या चाळीत या कैसी तुला मी हाक घालू ?
नळाचा फाटला आवाज या खोलीत आहे  ;

   कुठे जाणार हाती हात हे गुंफून राणी?
 बुडाच्या खालती जळते गडे, कोलीत आहे ;

  खडे वास्तवाचे या गझलेत कवी अतिशय   अप्रतिम पध्दतीने शब्दरचना करतात  ,

   डोळे कुठे बघाया जे भोवती घडे ?
रस्त्यावरी  उभे हे  आयुष्य नागडे!  

   फिल्मी हिशोब अंती ठरलाच की  खरा ;
कुल्ले, स्तने नि  जांघा हे सत्य रोकडे !
 

   गेला लुटून कोणी रस्त्यावरही कुणा, 
दुमडून कायद्याचे शेपूट वाकडे!  

     भाषेचे अनेक कंगोरे, अनेक शलाका असतात, हे गझलीतून कवी मांडतात,  

भाषेला वणवा होऊन पेटताना पाहिली,
 लाजून कधी एकांतात भेटताना पाहिली;

  वांझोट्या विद्वत्तेच्या फांदीवरती बसून 
भाषेला कावळ्यासारखी शीटटताना पाहिली ; 

बाजारात नाणं होऊन  खणखणणारी भाषा 
स्वत: च्या आवाजाला विटताना पाहिली;  

   आयुष्याची वास्तविकता चितारताना पाडगावकर व्यक्त होतात  ,

      आयुष्याचा अजब अजब ढंग दिसतो ;
राखेतूनही ओठांचा रंग दिसतो; भीतीचं सावट पडतं घरांवर, फिकटलेला दिवस अगदी तंग दिसतो;  

   एकाकी या गझलमध्ये पाडगावकर माणसाचे मनोविज्ञान वर्णन करतात,

   माणसं ओळख देणार नाहीत, नावसुद्धा घेणार नाहीत;
 मैफिल खिन्न, रीती असेल,
 सूर जागे होणार नाहीत 
थंड ,थंड पानगळ सुरू ,
आता पाखरं गाणार नाहीत; प्रत्येक दिशा तिऱ्हाइत,
वाटा कुठेच नेणार नाहीत;  

    मानवी मनाच्या विविध बाजू, त्याचप्रमाणे संध्याकाळच्या नैसर्गिक परिस्थितीच्या स्थिती गझलमधून कवी मंगेश पाडगावकरांनी अतिशय मनोवेधक रीतीने  रचल्या आहेत  .

     अशा या महान गझलकारास विनम्र अभिवादन  !

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know