Saturday, May 29, 2021

स्वतः वर विश्वास ठेवा

स्वतः वर विश्वास ठेवा
                                                            लेखक - डाँ .जोसेफ मर्फी
                                                           अनुवाद - रवींद्र भयवाल
                                                          प्रकाशक -मंजुळ पब्लिकेशन

माणसाचा स्वतः वर विश्वास का नसतो कारण त्याने स्वतःला ओळखलेले नसते.
माणूस हा ईश्वराचे प्रतिरूप आहे 
ज्या शक्ती ईश्वराकडे आहे त्याच त्याच्याकडेही आहे पण त्या शक्तींची आणि त्यांच्या वापराविषयी मनुष्याला माहिती नाही.
आणि आपल्या हया अज्ञानास्तव तो नकारात्मक गोष्टीसाठी ईश्वराला जबाबदार धरतो.

प्रत्येक माणसाला स्वतःची अशी काही स्वप्ने असतात , 
प्रत्येकाच्या माणसाला त्याचे असे आदर्श असतात ,त्यांच्यासारखे आयुष्य , राहणीमान, श्रीमंती,बुद्धिमत्ता, आरोग्य आपल्याला लाभावी अशी त्याची इच्छा असते पण त्या ईच्छापूर्तीचा मार्ग त्याचेच नकारात्मक विचार ,शंकाकुशंका,भीती अडवत असतात, मर्यादा घालत असतात
 
हयावर मात करायची असेल तर 

1..#प्रबळ_ईच्छाशक्ती
सर्वप्रथम आपल्या अंतरीची यशस्वी होण्याची इच्छा प्रबळ हवी,
आपल्या स्वप्नांसाठी झोकून द्यायची तयारी हवी.

2.#ईश्वरावर_श्रद्धा
एखाद्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो आणि ती प्रत्यक्षात असो वा नसो आपल्याला काही फरक पडत नाही हयाला आपण श्रद्धा म्हणू शकतो.
आपली ईश्वरावर अखंड श्रद्धा हवी, तो जगन्नियंता आपल्याला मार्गदर्शन , सामर्थ्य, शांती यांच्या रूपाने आपल्या विचारांना नक्कीच प्रतिसाद देत असतो.

3. #चुकीच्या_धारणा_हटवणे
आपल्या कल्पना,धारणा,पूर्वग्रह तपासून पाहायला हव्यात,
जाणते अजाणतेपणी आपण चुकीच्या धारणा आणि कल्पना आपल्या आईवडील  गुरुजनांनी जसे सांगितले तसे स्वीकारलेले असतात.
जर धारणा चुकीच्या असतील तर खुल्या मनाने नवीन ज्ञान स्वीकारले पाहिजे.आणि त्या धारणा बदलल्या पाहिजे.

4.#मनाचा_योग्य_वापर 
आपल्याला दोन मन असतात एक असते बाहयमन आणि दुसरे असते ते अंतर्मन....
बाहय मन हे प्रत्येक गोष्टीत कठोर असते त्याला तुलना करता येते, विश्लेषण करता येते ,अनुमान लावता येते, तर्काधिष्ठीत विचार करता येतो
हयाउलट आपले अंतर्मन अतिशय शक्तीशाली असते पण ते बाहयमनाचे गुलाम असते आणि त्याच्याच आज्ञेने जगत असते म्हणून योग्य विचार अंतर्मनात पोहचवणे महत्त्वाचे आहे

विचार एकाग्र आणि एकदिशीय असतील तरच ते बाहयमनातून अंतर्मनात पोहचतात त्यामुळे ध्यानधारणेद्वारे मन एकाग्र करावे 
म्हणजे बाहयघटकांचा हया प्रक्रियेत व्यत्यय होणार नाही.

कल्पनाशक्तीद्वारे आपल्या इच्छित स्वप्नाचे चलचित्र तयार करून ते वारंवार कल्पना करत राहिल्याने त्याचे छाप अंतर्मनावर उमटतात

त्यानंतर इच्छा फलद्रूप झाल्याची कल्पना  वारंवार करत राहावी लागते आणि हे करत असताना कुठल्याही चिंता,नैराश्य हया प्रक्रियेत बाधा आणू शकतात त्यामुळे स्वतःला कायम आनंदी ठेवणे 
सुद्धा महत्त्वाचे असते त्यामुळे आवडीची कामे करत राहून हे साध्य करावे लागते

5.#यशाची_कल्पना
ईश्वर त्याच्या बुद्धिमत्ता, ज्ञान आणि सामर्थ्याने प्रत्येक कार्यात यशस्वी होतो ,मग आपण मनुष्यही ईश्वरी अंशच आहोत 
त्यामुळे आपणही यशस्वी होऊच शकतो
आपल्या कल्पनाशक्तीला आपले सामर्थ्य बनवा ,
आपल्या बुद्धिमत्तेने चुकीच्या धारणांवर घाव घाला, 
चांगले उदात्त उत्तम विचार मनात रूजवा 
सर्वांशी प्रेमाने वागा, 
यशस्वी झाल्याच्या कल्पनेत कायम तल्लीन रहा .
त्या जाणिवेची अवस्था वारंवार जगा आणि तिची सवयच जडवून घ्या,
प्रत्येक दिवशी रात्री झोपताना यशाची आणि समाधानाची भावना उरात ठेवून झोपा. 
एक दिवस असा उगवतो ज्या दिवशी आकर्षणाच्या नियमानुसार समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतील आणि तुमची स्वप्न नक्कीच वास्तवात उतरतील

Source :- Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know