Saturday, October 23, 2021

The Power (शक्ती)

The Power (शक्ती)
लेखक: रोंडा बर्न
प्रकाशन: मंजुळ पब्लिकेशन

एखाद्या विद्युतचुंबकीय शक्तीप्रमाणे 
प्रेम माणसाच्या जीवनात सकारात्मक 
गोष्टी घडवून आणते,त्यांना कार्यरत बनवते
प्रेमाच्या भावनेमुळे आपल्याला Feel Good वाटत असते.त्यामुळे प्रेमाचा आवेग कोणत्याही कारणास्तव रोखायचा नसतो.
टीका,टाँन्टिंग,ब्लेमगेम हया प्रेमाच्या शक्तीला क्षीण बनलतात हयाउलट निरपेक्ष मदत, सकारात्मक भावना हया प्रेमाला सहाय्यक ठरतात.
आपल्या भावना सुधारण्यासाठी दिवसाची सुरुवातच सकारात्मक विचारांनी करावी,नेहमी वर्तमानात जगावे आणि परिस्थिती कितीही आव्हानात्मक असेल तरीही इच्छित परिणाम सकारात्मक असतील हयाचीच आशा ठेवा.
इच्छांची कल्पना करताना जाणीव पंचेद्रीयांनी घ्यायला हवी, आपल्या इच्छांवर आपले प्रेम पाहिजे. 
सातत्याने जाणीवपूर्वक इच्छा कल्पनांद्वारे व्यक्त करत राहिलात तर ब्रम्हांड ती पूर्ण करतेच कारण आपल्या ईच्छा फक्त आपल्यासाठीच मोठ्या असतात. ब्रम्हांडासाठी त्या किरकोळ नगण्यच मानाव्या लागतील.
राग दुःख अशा वाईट भावनांपासून माणूस मुक्त होऊ शकत नाही पण त्यांना आपल्यावर वरचढ होऊ देऊ नका.
भूतकाळातील वाईट गोष्टी विस्मरणात टाकणेच उत्तम होईल. 
कोणत्याही परिस्थितीत आवडत्या व्यक्तीशी चांगलेच बोला.वागा 
आपल्या आयुष्यावर प्रेम करा, आवडीच्या गोष्टी करण्याला प्राधान्य द्या त्यासाठी मनाला चालना द्या.
आजवर मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहा आणि ज्या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात त्या आपल्याकडे आहेत अशाच अविर्भावात वागा.

पैश्यावरही प्रेम केले तरच आपण धनवान होऊ त्यासाठी पैशासाठी चांगल्या भावना, पैशाला कल्याणकारी वस्तू समजून यथोचित दान, कुटुंबासाठी वापर आणि मुख्य म्हणजे पैशाला जीवनाचे ध्येय न मानता उत्तम आयुष्य मिळवण्यासाठीचा मार्ग समजायला हवा.

नात्यांवर प्रेम करत असाल तर ती सुधारण्यासाठी आपण स्वतः हून पुढाकार घ्यायला हवा. इतरांच्या इच्छेचा मान राखत त्यांना योग्य गोष्टीसाठी मोकळीक ही द्यायला हवी. माणसाच्या चांगुलपणावर आपला विश्वास हवा.
जरी एखाद्याला काही देता नाही आले तरी प्रेम तर आपण देऊच शकतो ना....?
नात्यातील आपले पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन बदलायला हवेत त्यासाठी मनमोकळा संवाद घडणे गरजेचे आहे.
समोरच्याला माणूस म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा.
No Gossip Behind हे तत्त्व पाळत
मूडचेंजरचा वापर करून बिघडलेली मनस्थिती सुधारायला हवी पण वाईट मनस्थितीत मोठा निर्णय घेणं ,आपला संयम सुटू न देता त्यावर मात करायला हवी.

उत्तम आरोग्य हवयं तर आपल्या शरीरावर प्रेम करायला शिका .तेव्हाच उर्जैने परिपूर्ण तन, निर्मळ मन,शांत झोप लाभेल
प्रत्येक अवयवाच्या निरोगी प्रतिमेची कल्पना डोळयासमोर ठेवत ह्दयात प्रेम,कौतुक आणि कृतज्ञता बाळगत नकारात्मक गोष्टी पासून स्वतःला दूर ठेवत
आनंदी जीवन जगायला प्राधान्य द्यायला हवे. जीवन किती मिळालयं याची चिंता करण्यापेक्षा प्रत्येक दिवस भरभरून जगायला भर दिला तर तेच जीवनावरचे आपले प्रेम अधोरेखित करेल.

आपला मनुष्य जन्म काळजी,चिंता भयासह जगण्यासाठी झाला नाही तर इच्छा पूर्ती आणि आनंद प्राप्तीसाठी झालायं हे समजून उमजून जगलो तरच आपण सुखी होऊ.
Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know