लेखक : डॉ. विजया फडणीस
प्रकाशन : रोहन प्रकाशन
लेखमाला : भाग पाचवा
एखाद्या अवघड वळणावर गाडीचा जसा तोल जातो तसाच बेसावध क्षणी माणसाचा तोल जातो ,त्याच्याकडून चुका होतात,गैरवर्तन होते (बलात्कार, अत्याचार... इत्यादी)
झालेल्या चुकांमुळे माणूस स्वतःला शिक्षा करून घेतो अथवा त्याचे प्रियजन त्याला क्षमा करत नाही हयामुळे त्या माणसाचे मनं रक्तबंबाळ होते.
चुकीच्या गोष्टीचा गवगवा नको म्हणून स्त्रिया सोसत राहतात म्हणून आगळीक करणाऱ्यांचेही फावते त्यामुळे स्वैर वागणुकीवर अंकुश राहत नाही.लैंगिक शोषण होत राहते.
मुलींची छेडछाड, अश्लील वर्तन ,बलात्कार करण्याची दूषप्रवृत्ती
तसेच अनैतिक वर्तनामागची कारणे
1. तणावपूर्ण बालक- पालक संबंध,
2.पालक विसंवाद
3.पालकांकडून मिळालेली अतिमोकळीक /अतिशिस्त
4.सनसनाटी करून मित्रांवर छाप पाडण्याच्या नाद
5.नीतीमूल्यांचा झपाट्याने होणारा -हास
6.विकृत मानसिकतेची (सायकोपँथ) माणसे असतात ज्यांना आपल्या क्रूर कृत्याचा कसलाच पश्चाताप नसतो.
विकृत माणसांना इतरांच्या भावना ,संवेदना समजून घेण्याची क्षमता नसते आणि अनुकंपा तर नावापुरती पण नसते.
उपाय:
▪️अशा गुन्हेगारांची मानसिकता बदलण्यासाठी पीडीत लोकांच्या ह्रदय पिळवटून टाकणारया गोष्टी वाचायला /पाहायला देतात
▪️पीडीतेचा रोल करायला लावणारया नाटिका सादर करायला सांगणे
▪️शाळेपासून नितीमूल्य शिक्षण
▪️मुलांवर वागणुकीवर ,टीव्ही इंटरनेटचा योग्य वापरावर लक्ष
▪️ मुलांच्या संगतीवर पालकांचे लक्ष
▪️योग्य बालक-पालक सुसंवाद
▪️आईवडीलांमध्ये विसंवाद टाळून सुरक्षित ,सुशिक्षित, निरोगी समाज बनवण्यासाठी प्रयत्न
अपूर्ण
Nilesh Shinde
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know