लेखक : रोंडा बर्न
प्रकाशक : मंजुळ पब्लिशिंग हाऊस
ब-याच वर्षापूर्वी अल्फा मराठी वाहिनीवर नायक नावाची मालिका लागायची ज्याचे शीर्षकगीतच असे होते की
"माझ्या जीवनाचा नायक व्हायचयं मला
कुणी सांगेल का मला कसे जगायचे कसे वागायचं ? "
त्याच प्रश्नाचे उत्तर सिक्रेट पुस्तकाच्या लेखिका रोंडा बर्न यांनी लिहिलेल्या हया पुस्तकात मिळते
या पुस्तकात आपआपल्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांची मार्गदर्शन संकलित करण्यात आलेली आहे.
आपल्याला चित्रपटाच्या नायकाविषयी खूप आकर्षण असते
नायक चांगला तरच पिक्चर सुपरहिट असतो.
नायक अन्यायाविरुद्ध लढतो,सगळया अडथळयांवर मात करतो आणि शेवटी त्याला जे हवं ते मिळवतो.
चित्रपट पाहून प्रत्येकालाच आपणही असेच नायक व्हावे असे वाटते त्यामुळे काहीजण नायकासारखे कपडे हेअरस्टाईल यांचे अनुकरण केले जाते.
पण वास्तविक पाहता जीवनातील त्याचा संघर्ष मात्र तितकासा चर्चिला जात नाही आणि अनुकरला तर मुळीच जात नाही.
त्यामुळे फक्त हिरोसारखे दिसण्याऐवजी तसं असणे महत्त्वाचे आहे
त्यासाठी आपल्याला "मी जबाबदार" असे म्हणून स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःला घ्यावी लागेल आणि स्वतःच्या जीवनाचा नायक व्हावे लागेल.
सामान्य माणूस आणि नायक यांच्यातील फरक लेखकाने वेगवेगळ्या मुदयावरुन स्पष्ट केला आहे
1.स्वप्न :
नायकाला स्वतःची स्वप्ने असतात,उद्दिष्ट असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी तो आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर करतो
जबरदस्त इच्छाशक्तीने अशक्य गोष्टी शक्य
बनवतो. त्याउलट सामान्य माणसाला निरूद्देश जीवन जगतात , जीवनाचे ध्येय न कळाल्याने असमाधानी दुखदायक आयुष्य जगतात.
त्यामुळे लेखक सल्ला देतात की तुम्ही तुमच्या अंतकरणात डोकावून स्वतःची स्वप्ने शोधा आणि ती कशी पूर्ण करता येईल यावर विचार करा.
पैसा आणि सुरक्षिततेइतकेच आपला स्वतःचा आनंद ,समाधान हयालाही महत्त्व द्या.त्यासाठी टाळाटाळ न करता धाडस दाखवा आणि आनंदाच्या मार्गाने वाटचाल सुरु करा
2.विश्वास
नायकाचा स्वतः वर पूर्ण विश्वास असतो तो कुठल्याही गोष्टीला अशक्य समजत नाही
याउलट सामान्य माणसं नेहमी स्वतः बद्दल नकारात्मक दृष्टिकोन बाळगतात आणि कुढत राहतात.
त्यामुळे लेखक इथे सल्ला देतात की स्वतः वर स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा
कायम सकारात्मक स्वसंवाद करून अंतर्मनात आत्मविश्वासाचा नवीन प्रोग्राम डेव्हलप करा . एकदा अंतर्मनाने गोष्टी स्वीकारल्या की त्याच गोष्टी पुढे वैश्विक मनाकडे जातात आणि Law of Attraction तशा गोष्टी घडवून आणायला मदत करते. तेव्हा ठाम विश्वास , दृढ निश्चय, जिद्द चिकाटीने स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करा.
3.दूरदृष्टी
नायकाला दूरदृष्टी असते ज्याचा वापर करून तो भविष्यात जे काही घडवायचे आहे त्याचे मनचक्षूसमोर चित्र मांडतो
त्या स्वप्नांची स्पष्ट जाणीव अंतर्मनाला जाणीव करून देतो आणि मग ती स्वप्नप्रतिमा नायकाच्या प्रयत्नशीलतेने
सत्यात अवतरते
सामान्य माणसाला तशी कुठलीच दूरदृष्टी नसते त्यामुळे ती जशी जन्माला येतात तशीच नष्टही होतात.
4.मन
नायकाचे मन सकारात्मक वृत्तीने आणि आशावाद यांनी भरलेले असते.
त्यामुळे तो नेहमी यशश्री खेचून आणतो
त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा सोहळा असतो
ते कधीच स्वतःच्या स्वप्नांच्या विपरीत विचार करत नाही.
याउलट सामान्य माणूस आपल्या नकारात्मक वृत्तीने अपयश दुख आजारपण यातच गुंतलेला असतो
त्यासाठी इतरांना दोष देण्यात धन्यता मानतो, रडत कुढत संभ्रमात तो आयुष्य काढीत असतो
तो षड्रिपूंना सतत बळी पडत असतो
आपल्या आनंदासाठी सतत बाहय गोष्टीचा आधार शोधत असतो.
5.अंतःकरण
नायक भीती आणि शंकेला स्वतःच्या स्वप्नांच्या आड येऊ देत नाही
धाडसाने भीतीवर मात करत Comfort झोन वाढवायचा प्रयत्न करत असतो.
जे काही मिळवले आहे, मिळत आहे आणि मिळणार आहे त्याबद्दल कृतज्ञ असतो
सामान्य माणसे नेहमी कल्पनातीत भीतींचे शिकार झालेले असतात त्यामुळे धोका पत्करायलाच ते घाबरतात आणि मग कृतिशून्य राहतात
वैश्विक शक्तीकृतज्ञ राहण्याऐवजी ते अडचणी आव्हानांनाच मोठे समजतात
6. अंतःप्रेरणा :
नायक अंतःप्रेरणेला स्वप्नपूर्तीसाठी अंतप्रेरणेला यशप्राप्तीसाठीचे प्राथमिक साधन मानतो जी वैश्विक मनाच्या उच्च पातळीवरून अंतर्मनात पोहचलेली असल्याने तिच्यावर विश्वास ठेवून जागरूक मनाने तो मार्गक्रमण करत राहतो.
याउलट सामान्य माणूस अंतप्रेरणेला कमी लेखतो किंवा अज्ञानास्तव तो आतला आवाजाकडे दुर्लक्ष करतो.
7. वर्तन
नायकाला आपल्या कृतीच्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामाबाबत फार जागरूक असतो
त्यामुळे तो नेहमी सर्वांचा मान राखतो
सर्वार्थाने सदैव विनम्र राहतो.
माणसाची वर्तणूक हीच गोष्ट माणसाला प्रगती अधोगतीला कारणीभुत ठरते हे तो जाणतो
गुरूजन आणि थोरामोठ्याचे बोल ऐकण्यासाठी सदैव आतूर असतो
तसेच यशापयथाने हुरळून घाबरून जात नाही
याउलट सामान्य माणसे पैश्याच्या मोहाने आंधळी होतात मोठ्यांचा अनादर करतात
चांगलं असण्यापेक्षा चांगले दिसण्यावर भर देतात ,इतरांना दुख देऊन स्वतःच्या सुखाची कामना करतात
8.ध्येयनिष्ठा
नायक आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ असतो
स्वप्नपूर्तीसाठी कटिबद्ध असतो.
समोरच्या व्यक्तीच्या नकारात्मकतेला स्वतः मध्ये परावर्तित होऊ देण नाही
ठाम निश्चय ,ज्वलंत इच्छाशक्ती आणि कष्टाची तयारी यामुळे वैश्विक शक्ती त्याला
त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी आनंदाने मदत करतात
याउलट सामान्य माणसं भीतीच्या भावनेतून कटिबद्धता टाळतो.
निरनिराळ्या सबबी सांगून यशाच्या वाटेवरून माघारी परततो.त्याला सगळे रस्ते फसवे आणि अडथळ्यांची शर्यत वाटतात आणि जीवन चक्रव्यूह भासतो
नकारात्मक माणसांच्या जाळयात सहजपणे अडकतो
9.सत्वपरीक्षा
नायक त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक आव्हानाला सुधारण्याची शिकण्याची संधी समजतो तरीही काही अडथळे असे असतात जिथे नायकाचा कस लागतो
ती जणू त्याची सत्वपरीक्षा असतो
सातत्याने स्वतःच्या क्षमता वाढवून या अडथळयांवर आणि नकारात्मकतेवर वैश्विक शक्ती आणि स्वतःवर च्या विश्वासाच्या बळावर तो यशस्वीपणे मात करतो.
सामान्य माणूस सत्वपरीक्षेआधीच माघार घेतात ,
नकारात्मक मनस्थितीमुळे सुद्धा तो खचतो.
परिस्थितीला शरण जातो
10.बक्षीस
नायकाला त्याचे स्वप्न साकार होणे हे विश्वाकडून मिळालेले मोठे बक्षीस आहे
त्यासाठी लागणारी संसाधने तसेच त्याच्या प्रगतीचा विचार करणारी लोकांची सोबत हे त्याचे मोठे भाग्य असते.
स्वप्न तर सगळीच पाहतात पण फक्त नायक सगळ्या.अडथळयांना पुरून उरतो याचा आनंद अनुभवत आपले आयुष्य सुंदर आणि आनंदी बनवतो
सामान्य माणसं हया टप्प्यावर पोहचतच नाही
11. सामाजिक जाणीव
नायकाचे स्वप्न साकार होत असतानाच त्याचा कनवाळूपणा जागृत होत असतो
त्यामुळे तो इतर लोकांना निराशा यातनांपासून मुक्त ठेवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करतात
दुसऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी तो झटतो आणि त्यात त्याला समाधान मिळते
सामान्य माणसे नेहमी स्वतः साठी जगतात
पण इथेच नायकाचे वेगळेपण असते त्यामुळे मरावे परी किर्तीरूपी उरावे हया उक्तीप्रमाणे नायक कायम लोकांच्या स्मरणात राहतात
संदर्भ निलेश शिंदे
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know